शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणं युद्धासारखंच!
2
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
3
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
4
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
5
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
6
सलग ७ दिवसांच्या वाढीला ब्रेक! एफएमसीजी आणि रिअल्टीमुळे बाजार कोसळला; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
7
WhatsApp वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! अ‍ॅडव्हान्स्ड चॅट प्रायव्हसी फीचर आले, कसे वापरायचे जाणून घ्या
8
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
9
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार
10
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
11
दुसऱ्यांचा विनाश करणे हा धर्म नाही अधर्म आहे, शिक्षा झालीच पाहिजे - प्रेमानंद महाराज
12
‘पत्नीचे अनेक तरुणांशी अनैतिक संबंध, नशेच्या धुंदीत घालतात धिंगाणा, करतात अश्लील चाळे ’, पतीचे गंभीर आरोप, पुरावेही दिले   
13
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
14
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
15
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
16
जिद्द असावी तर अशी! अंगणवाडी ते IAS अधिकारी; ३ वेळा अपयश, मानली नाही हार, रचला इतिहास
17
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
18
भारतात फुलटाइम स्टॉक ट्रेडर बनण्यासाठी जवळ किती पैसे असायला पाहिजे?
19
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
20
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला

Gujarat Election: भाजपानं जुना फॉर्म्युला बदलला; प्रत्येक घरातून ३ मते घेण्याची रणनीती आखली

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2022 14:57 IST

या निवडणुकांमध्येही पक्ष तिकीट वाटपासाठी नो रिपीट फॉर्म्युला लागू करू शकतो

अहमदाबाद - गुजरात विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. भाजपा-काँग्रेससोबतच यावेळी आम आदमी पक्षही निवडणुकीच्या रणांगणात उतरलं आहे. मात्र, २७ वर्षांनंतर सत्ताधारी भाजपाने आपला बालेकिल्ला वाचवण्यासाठी जुना फॉर्म्युला बदलला आहे. या निवडणुकीत पक्ष नवा फॉर्म्युला घेऊन रिंगणात उतरला आहे. याला पन्ना कमिटी असं नाव देण्यात आले आहे. मतदार यादीच्या प्रत्येक पानासाठी एका समितीमध्ये पाच सदस्य निवडले आहेत. यामध्ये प्रत्येक कुटुंबातील तीन सदस्यांची मते भाजपाला मिळवून देण्याची जबाबदारी प्रत्येक सदस्याची असेल. पक्षाने संपूर्ण राज्यात ८२ लाख पन्ना सदस्य केले आहेत. यामध्ये प्रत्येक पेज सदस्याला तीन मते मिळावीत, असं लक्ष्य ठेवण्यात आले आहे.

गुजरात निवडणुकीचे काम पाहणारे पक्षाचे पदाधिकारी आणि ज्येष्ठ खासदार यांनी सांगितले की, "जुलै २०२० मध्ये ८ विधानसभा जागांच्या पोटनिवडणुकीत पक्षाने पहिल्यांदा हे मॉडेल स्वीकारलं." या पोटनिवडणुकीत पक्षाने सर्व जागा जिंकल्या. त्यानंतर २०२१ च्या गुजरात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या  निवडणुकीत हे मॉडेल पुन्हा लागू करण्यात आले. यामध्ये भाजपला ८० टक्क्यांहून अधिक जागांवर यश मिळाले. या नव्या सूत्रानुसार भाजपाने सर्व पन्ना सदस्यांना ओळखपत्र जारी केले आहे. यामध्ये ते भाजपचे अधिकृत कार्यकर्ता म्हणून ओळखले जातील. मतदानापूर्वी मंडळ किंवा जिल्हा स्तरावरील नेते त्यांच्या भागातील सर्व पन्ना सदस्यांच्या घरी एकदा तरी भेट देतील.

भाजपाचा नो रिपीट फॉर्म्यूला लागू होणार?या निवडणुकांमध्येही पक्ष तिकीट वाटपासाठी नो रिपीट फॉर्म्युला लागू करू शकतो. नुकतेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले होते की, आगामी गुजरात विधानसभा निवडणुकीत पक्ष २५ टक्के नव्या चेहऱ्यांना तिकिटे देईल, मात्र तिकिटासाठी उमेदवाराची विजयी क्षमता हाच एकमेव निकष आहे. इतर उमेदवारांपेक्षा जास्त जिंकण्याची क्षमता असेल तर पक्ष तीन ते चार वेळा निवडून येणाऱ्या उमेदवारांना तिकीट देऊ शकतो, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले होते. मिळालेल्या माहितीनुसार, भाजपाने गुजरातमध्ये २५ टक्के नव्या चेहऱ्यांना तिकीट दिल्यास विद्यमान आमदारांची मोठ्या प्रमाणात तिकिटे कापावी लागतील. अशा स्थितीत निवडणुकीतील महत्त्वाची जबाबदारी माजी आमदार आणि उमेदवारांवर सोपविण्याचा निर्णयही पक्षाने घेतला आहे.

गुजरातवर आपली पकड कायम ठेवण्यासाठी भाजपानं पुन्हा चारही विभागात मोर्चेबांधणी केली आहे. जातीय आणि भौगोलिक समीकरण लक्षात घेऊन राज्यातील १८२ जागांची चार भागांमध्ये (सौराष्ट्र, उत्तर, पश्चिम, मध्य प्रदेश) विभागणी करण्यात आली आहे. सौराष्ट्रातील उत्तर प्रदेश, पश्चिमेला महाराष्ट्र, उत्तरेकडील राजस्थान आणि मध्य प्रदेशातील भाजप नेत्यांना ड्युटी लावण्यात आली आहे. या चार भागात मंत्री, आमदार, माजी आमदार आणि केंद्रीय नेते प्रचाराला उतरवण्यात येणार आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :BJPभाजपाGujaratगुजरात