शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी
2
टँकर अचानक खड्ड्यात! सुदैवानं चालक बचावला, पुण्यातील 'त्या' घटनेमागचं कारण आलं समोर
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
4
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
5
लाचखोर वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात; पाच हजार रूपयांची लाच भोवली!
6
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
7
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
8
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
9
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
10
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
11
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
12
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
13
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
14
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
15
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
16
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
17
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
18
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
19
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई
20
पुरी जोधपूर एक्सप्रेसमधून पाच लाखांचा सुमारे ३३ किलो गांजा जप्त; अल्पवयीन आरोपी जेरबंद

'सोनिया गांधींनी पाठिंबा दिला नसता, तर तेलंगणाची निर्मिती झाली नसती'

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2023 5:29 AM

काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे वक्तव्य

हैदराबाद : काँग्रेसच्या तत्कालीन अध्यक्ष सोनिया गांधी यांनी पाठिंबा दिला नसता तर तेलंगणा राज्याची निर्मिती झाली नसती, असे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी सांगितले. तेलंगणा विधानसभा निवडणुकांमध्ये प्रचारासाठी काँग्रेसने विजयाभेरी यात्रेचे आयोजन केले आहे. त्यात सहभागी झालेले राहुल गांधी विविध ठिकाणी प्रचारसभा घेत आहेत.त्यांनी एका सभेत सांगितले की, तेलंगणासह, राजस्थान, मध्य प्रदेश, राजस्थानमध्ये काँग्रेस भाजपचा पराभव करणार आहे. काँग्रेसकडून तेलंगणात भारत राष्ट्र समिती पराभूत होईल. भारत राष्ट्र समितीच्या सरकारने या राज्याचा विकास केलेला नाही. तेलंगणात मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी जितक्या पैशांची लूट केली, तो सारा पैसा आम्ही जनतेला परत देणार आहोत. के. चंद्रशेखर राव यांच्या नेतृत्वाखालील बीआरएस पक्ष संसदेत भाजपला पाठिंबा देतो. या गोष्टी जनतेने नीट समजून घ्याव्यात, असे राहुल गांधी यांनी जगतियाल येथील प्रचारसभेत सांगितले. (वृत्तसंस्था)

ही सरंजामदार विरुद्ध जनता अशी लढाईराहुल गांधी म्हणाले, माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी यांचे तेलंगणाशी (त्यावेळी हा प्रदेश आंध्र प्रदेश राज्याचा भाग होता) जिव्हाळ्याचे संबंध होेते. तेलंगणातील विधानसभा निवडणूक म्हणजे सरंजामदार विरुद्ध सामान्य जनता अशी लढाई आहे. 

राहुल गांधी यांनी बनविला डोसाविजयाभेरी यात्रेदरम्यान राहुल गांधी जगतियालनजीक एका खाद्यपदार्थांच्या स्टॉलवर थांबले. तिथे त्यांनी स्वत: डोसा बनविला आणि साेबतच्या लाेकांना खाऊ घातला. त्यांनी परिसरातील मुलांना चॉकलेटही वाटली, असे काँग्रेसच्या सूत्रांनी सांगितले. 

हळद उत्पादकांना प्रति क्विंटल १२-१५ हजार रुपयेतेलंगणामध्ये काँग्रेस सत्तेत आल्यास हळद उत्पादक शेतकऱ्यांना प्रति क्विंटल १२ ते  १५ हजार रुपये आधारभूत किंमत देण्याचे आश्वासन त्या पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी दिले आहे. या राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या प्रचारासाठी काँग्रेस पक्षाने राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली विजयाभेरी यात्रेचे आयोजन केले आहे. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीTelanganaतेलंगणा