शहरं
Join us  
Trending Stories
1
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
2
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
3
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
4
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
5
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
6
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
7
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
8
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
9
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
10
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
11
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
12
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
13
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
14
‘जे. जे.’ नर्सिंग होमला येणार कॉर्पोरेट लूक; खासगी रुग्णालयाप्रमाणे रचना, रुग्णांसाठी अत्याधुनिक सुविधा
15
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
16
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
17
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
18
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
19
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
20
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई

उद्यापासूनचे अर्धे वर्ष आचारसंहितेचे!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2023 10:58 AM

प्रत्येकी ४ ते ५ मतदान केंद्रामागे एक प्रभाग अधिकारी असतो. त्यामुळे २५ ते ३० हजार अतिरिक्त कर्मचारी लागतात.

रविकिरण देशमुख, वृत्त संपादकउद्यापासून सुरू होणारे २०२४ हे नवीन वर्ष निवडणुकांचे वर्ष आहे. पुढील काही महिने देशपातळीवर लोकसभा निवडणुकांची धामधूम असेल तर त्यानंतर राज्यात विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम असेल. या दोन्ही निवडणुकांचा कार्यक्रम एकत्रितपणे राबविला गेला तर उत्तमच, पण स्वतंत्रपणे झाला तर मात्र नव्या वर्षातील अर्धे दिवस हे आचारसंहिता, सार्वजनिक आणि शासकीय सुट्ट्यांमध्येच जातील. 

लोकशाही बळकट करण्यासाठी मतदान करा, असा संदेश घरोघरी पोहोचवत लोकांनी मतदानाचे पवित्र कार्य पार पाडावे, असे आवाहन केले जाते. पण यासाठी आवश्यक निवडणूक प्रक्रिया राबवत असताना त्याच लोकांची शासनदरबारी असलेली महत्त्वाची कामे माणसांपेक्षा नियम मोठे या तत्त्वाने बासनात गुंडाळली जातात, हे दुर्लक्षिता येणार नाही.  

आगामी वर्षात ३६६ दिवस आहेत, त्यापैकी २५ दिवस शासकीय सुट्ट्यांचे आहेत. तीन सुट्ट्या शनिवारी अथवा रविवारी येत असल्याने २२ सुट्ट्या कामकाजाच्या दिवशी येतात. जोडीला तब्बल १०४ शनिवार आणि रविवार, त्यादिवशी शासकीय कार्यालयांना सुट्टी असल्याने कामाचे दिवस उरतात २४०. 

२०१९ साली लोकसभानिवडणूक कार्यक्रमाची घोषणा ते निवडणूक निकाल हा ७३ दिवसांचा कार्यक्रम होता. या कालावधीत देशभरात आदर्श आचारसंहिता होती. २०१४ साली हे दिवस ७१ भरले होते. याहीवेळी निवडणूक कार्यक्रमाची घोषणा आणि निकालांचा दिवस असे ७० दिवस गृहीत धरले तर या कालावधीत आचारसंहितेमुळे जनसामान्यांचे कामाचे दिवस आणखी कमी म्हणजे १७० होतात. 

महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक ऑक्टोबरमध्ये होते. २०१९ मध्ये निवडणूक कार्यक्रम घोषणा आणि निकालाचा दिवस जाऊन नवे सरकार येईपर्यंत साधारणपणे ६० दिवस गेले. यावेळी निवडणुकीचे ५० दिवस गृहीत धरले तर कामकाजाचे दिवस १२० (चार महिने) उरतात. लोकसभेसोबतच विधानसभा निवडणूक झालीच तर मात्र कामकाजाचे दिवस जास्त मिळतील.

निवडणुकीसाठीची आदर्श आचारसंहिता हा कायदा नाही; पण त्याची अंमलबजावणी कायद्यातील अत्यंत कठोर तरतूद असल्यासारखी होते. काय केल्यामुळे निवडणूक आचारसंहिता भंग होत नाही आणि काय केल्यामुळे भंग होतो, याचे स्पष्टीकरण स्वयंस्पष्ट असले, तरी कशाला जोखीम घ्या म्हणून शासकीय कार्यालयांमध्ये जनसामान्यांच्या निवेदनांना आणि विनंत्यांना स्पर्श करण्याचीही तयारी नसते. ज्या गोष्टी कार्यालयीन कामकाजाचा भाग म्हणून पार पाडावयाच्या असतात त्याही फाइलबंद होतात. 

एखादा विषय सार्वजनिक हिताचा किंवा संवेदनशील वाटल्याने निर्णय घेण्याची वेळ आलीच तर तो निवडणूक आयोगाच्या मान्यतेसाठी राज्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडे पाठविला जातो. तिथेही अशा फाइलचे गठ्ठेच्या गठ्ठे जमा करून निवडणूक कार्यक्रम संपल्यानंतर जसेच्या तसे परत केल्याचे दिसून आले आहे. एकूणच फारसे कोणी जोखीम घेण्यास तयार होत नाही. आदर्श आचारसंहितेचा नेमका अर्थ जिथे प्रशासनातच नीट लावला जात नाही, तिथे सर्वसामान्यांना तो कळण्याची शक्यता नसते.  निवडणूक झाल्यानंतरही नवे सरकार तरी येऊ द्या, त्यांना कार्यभार तरी स्वीकारू द्या, त्यांच्याकडून सूचना येऊ द्या, अशी कारणे पुढे केली जातात. थोडक्यात काय तर ‘लोकांनी लोकांसाठी चालविलेली व्यवस्था म्हणजे लोकशाही’ या तत्त्वाला जणू चिकटपट्टीच लावली जाते. 

निवडणूक कामात शासकीय यंत्रणा मोठ्या प्रमाणात गुंतलेली असते. एका मतदान केंद्रासाठी साधारणपणे ५ कर्मचारी लागतात. महाराष्ट्रात सध्या ९७ हजार ३२५ मतदान केंद्र आहेत. यावेळी मतदारांची संख्या वाढणार असल्याने या केद्रांची संख्या १ लाखांच्या घरात जाईल. म्हणजेच साधारणपणे पाच लाख शासकीय अधिकारी, कर्मचारी निवडणूक कामात गुंततील. प्रत्येकी ४ ते ५ मतदान केंद्रामागे एक प्रभाग अधिकारी असतो. त्यामुळे २५ ते ३० हजार अतिरिक्त कर्मचारी लागतात. याशिवाय प्रत्येक मतदान केंद्रावर पोलिसांची देखरेख असते. त्यासाठी पोलिसांचा फौजफाटा मोठ्या प्रमाणावर उपलब्ध करून द्यावा लागतो. या काळात केवळ अतिशय तातडीच्या आणि अतिसंवेदनशील विषयांकडेच पोलिस दलाचे लक्ष असते. निवडणूक विभागाच्या मते साधारणपणे सात ते आठ लाख शासकीय अधिकारी-कर्मचारी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे या प्रक्रियेत गुंतलेले असतात. लोकशाही व्यवस्था चालविणे किती महाग आहे, याचीच ही प्रचिती आहे.

टॅग्स :Electionनिवडणूकlok sabhaलोकसभा