शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

पंतप्रधान मोदींवर जगभरातून होतोय शुभेच्छांचा वर्षाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2019 04:05 IST

अमेरिका, रशियासह अनेक राष्ट्रप्रमुखांनी मोदींच्या नेतृत्वाखालील भारत सरकारशी विविध क्षेत्रांत सहकार्यासह मैत्रीपूर्ण संबंध दृढ करण्याचा मनोदय व्यक्त केला आहे.

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या दमदार विजयाबद्दल जगभरातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन होत असून चीनसह शेजारील राष्ट्रासह महाशक्ती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमेरिका, रशियासह अनेक राष्ट्रप्रमुखांनी मोदींच्या नेतृत्वाखालील भारत सरकारशी विविध क्षेत्रांत सहकार्यासह मैत्रीपूर्ण संबंध दृढ करण्याचा मनोदय व्यक्त केला आहे. पंतप्रधान मोदी यांनी जगभरातील नेत्यांचे आभार मानले आहेत.नेपाळ, चीन, भूतान, म्यान्मा, बांगलादेश, श्रीलंका, पाकिस्तान आणि मालदीव या शेजारी देशांनी विभागीय शांतता, विकास आणि समृद्धीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत काम करण्याची तयारी दाखविली आहे. मोदी यांच्या नेतृत्वाखालील दुसऱ्यांदा स्थापन होणाºया सरकारमुळे भारत-पाकिस्तानदरम्यान संबंधाची दिशा निश्चित होणार आहे. पंतप्रधान इम्रान खान यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन करून विभागीय शांतता, विकास आणि समृद्धीसाठी मोदींसोबत काम करण्यास उत्सुक असल्याचे म्हटले आहे. नेपाळ आणि भारतादरम्यान भावबंध सर्वश्रुत आहेत. नेपाळचे पंतप्रधान के. पी. शर्मा यांनी ट्विट करून नरेंद्र मोदी यांना शुभेच्छा देत परस्परांदरम्यान संबंध दृढ होतील, अशी आशा व्यक्त केली आहे. श्रीलंकेचे अध्यक्ष मैत्रिपाल सिरिसेना आणि पंतप्रधान रणिल विक्रमसिंघे यांनीही अशीच भावना व्यक्त केली आहे. चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनीही मोदी यांचे अभिनंदन केले आहे. दोन्ही देशांच्या द्विपक्षीय संबंधांना नवा आयाम देण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.>मोदी-इम्रान यांच्यात चर्चा?पंतप्रधान पदावर पुन्हा विराजमान झाल्यानंतर नरेंद्र मोदी आपला पहिला विदेश दौरा जूनच्या मध्यात किर्गिस्तानचा करू शकतील. किर्गिस्तानची राजधानी बिश्केक येथे शांघाय कॉर्पोरेशन आर्गनायझेशनची (एससीओ) बैठक होणार आहे. बैठकीस पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान हजर राहण्याची अपेक्षा आहे. येथे उभय नेत्यांत चर्चा होऊ शकते.>जूनमध्ये ट्रम्प-मोदी भेट...अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फोनवरून अभिनंदन केले. या वेळी दोन्ही नेत्यांनी २८, २९ जून रोजी जपानमध्ये (ओसाका) होणाºया जी-२० शिखर परिषदेच्या निमित्ताने भेटण्याचे मान्य केले.>पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागच्या पाच वर्षांत भारतीय अर्थव्यवस्थेच्या वृद्धीसाठी आणि भारतीयांचे जीवनमान सुधारण्यासाठी खूप प्रयत्न केले. मोदी यांच्या मागील पाच वर्षांच्या कार्यकाळात भारतातील शासनप्रणाली सुधारली, अशा शब्दांत चीनच्या सत्तारूढ कम्युनिस्ट पार्टी आॅफ चायनाने प्रशंसा केली.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९