शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs BAN 1st Test : भारताची विजयी सलामी! अश्विनचा 'षटकार', जड्डूची साथ लाखमोलाची; बांगलादेशचा करेक्ट कार्यक्रम
2
पाकिस्तानी फवाद खानचा 'लिजेंड ऑफ मौला जट' सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही; राज ठाकरेंचा इशारा
3
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
4
पु्ण्याकडे येत होती ट्रेन, अचानक आला मोठा आवाज आणि रुळांवरून घसरलं इंजिन
5
IND vs BAN 4th Day Live : बांगलादेशने लय पकडली पण अश्विन-जडेजाने डोकेदुखी वाढवली; भारताची विजयाकडे वाटचाल
6
मोठा अनर्थ टळला! रेल्वे ट्रॅकवर गॅस सिलिंडर; लोको पायलटच्या प्रसंगावधानामुळे अपघात टळला 
7
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
8
चीन समर्थक दिशानायके यांनी श्रीलंकेच्या राष्ट्रपती निवडणुकीत घेतली विजयी आघाडी   
9
ENG vs AUS : इंग्लंडचे पुनरागमन पण मिचेल स्टार्क भिडला! यजमानांचा पुन्हा पराभव; ऑस्ट्रेलियाची गाडी सुस्साट
10
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
11
सिनेट निवडणूक मंगळवारी होणार; सरकारच्या परिपत्रकाला स्थगिती
12
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
13
परतीचा पाऊस देणार महामुंबईला तडाखा; २६ ते २९ सप्टेंबर मुसळधारेचा अंदाज
14
१४ दिवसांतच संग्राम चौगुलेची 'बिग बॉस मराठी'मधून एक्झिट, पोस्ट शेअर करत म्हणाला- "मला..."
15
स्वाभिमानी मणका तंदुरुस्त करून घ्या!; राज ठाकरेंची पुन्हा मराठी माणसांना हाक
16
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: महत्त्वाचा निर्णय घेण्यास दिवस अनुकूल नाही!
17
याही वेळी मुंबईत अपक्षांची संख्या लक्षणीय असणार? इच्छुकांमध्ये तिकिटासाठी रस्सीखेंच
18
राष्ट्रवादीचे कार्यालय शरद पवार गटाचेच; लोकसभा सचिवालयाने दिले स्पष्टीकरण
19
तिरूपती लाडूबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हा; भेसळयुक्त तूप ‘अमूल’चे असल्याच्या पोस्ट
20
मुख्य निवडणूक आयुक्त ३ दिवस मुंबई दौऱ्यावर; विधानसभा निवडणुकीसाठी घेणार बैठका

Har Ghar Tiranga: 'हर घर तिरंगा' अभियान वादात, कर्मचाऱ्यांच्या पगारातून कापले जाणार 38 रुपये

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2022 2:42 PM

सरकारच्या या अभियान आणि देशाच्या स्वातंत्र्यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवानिमित्ताने आज प्रत्येक घरात तिरंगा मोहीम राबवली जात आहे

नवी दिल्ली/मुंबई - हर घर तिरंगा मोहिमेच्या माध्यमातून भारतातील प्रत्येक घरात तिरंगा फडकवण्याची सरकारची योजना आहे. त्यासाठी सरकारने २० कोटी घरांचे उद्दिष्ट ठेवले आहे. १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान जन भारत सोबत हे लक्ष्य साध्य करण्यास सुरुवातही झाली आहे. त्यानिमित्ताने घरोघरी तिरंगा फडकला असून अनेक गावात, शहरात आणि महानगरांमध्ये तिरंगा रॅलीचे आयोजनही करण्यात आले आहे. मात्र, या मोहिमेसाठी खरेदी केलेल्या झेंड्यांवरुन टिका होत आहे. त्यातच, आता रेल्वे कर्मचाऱ्यांच्या पगारातून तिरंगा ध्वजाची रक्कम म्हणून 38 रुपये पगारीतून कपात करण्यात येणार आहेत. त्यामुळे, हे अभियान चर्चेचे आणि वादाचा मुद्दा बनले आहे. 

सरकारच्या या अभियान आणि देशाच्या स्वातंत्र्यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवानिमित्ताने आज प्रत्येक घरात तिरंगा मोहीम राबवली जात आहे, पण, एक काळ असा होता की प्रत्येक घरावर तिरंगा फडकवता येत नव्हता, असे अनेक बदल घडले, ज्यानंतर सामान्य माणूस घर, कार्यालय, शाळांमध्ये तिरंगा फडकवू शकत आहे. त्यासाठी, मोठ्या प्रमाणा तिरंगा ध्वज बनविण्यात आले असून ते विकतही घेण्यात आले आहेत. विशेष म्हणजे रेल्वे कर्मचाऱ्यांच्या पगारातून या ध्वजासाठी 21 ते 38 रुपये कपात होणार आहेत. ऑगस्ट महिन्याच्या पगारातून ही रक्कम कपात होईल. यासंदर्भात संबंधित विभागाच्या अधिकाऱ्याने पत्रही जारी केले आहेत. मात्र, रेल्वे कर्मचारी युनियनने या निर्णयावर नाराजी दर्शवली आहे. 

युनियनचे नेते चंदन सिंह यांनी सरकारने हा निर्णय आमच्यावर थोपवू नये. रेल्वे कर्मचारी राष्ट्रभक्त आहेत, ते स्वत: तिरंगा ध्वज घेऊन येतील, असे म्हटले आहे. 

देशात चैतन्यमय वातावरण

‘हर घर तिरंगा’ मोहिमेअंतर्गत विविध राज्यांमध्ये तिरंगा हाती घेऊन शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी मिरवणुका काढल्या. विविध पक्षांचे राजकीय नेते, मंत्री, सरकारी अधिकारी, सर्वसामान्य जनांच्या घरांवर तिरंगा डौलाने फडकत आहे. ठिकठिकाणच्या बाजारांमध्ये नागरिक तिरंगी कपडे खरेदी करताना दिसत आहेत. मोठ्या रहिवासी सोसायट्यांनीही तिरंगी रोषणाई करून या उत्साहात भर घातली आहे. अनेक विक्रेत्यांनही तीन रंगांची मिठाई तयार करण्यावर भर दिला आले. विविध चॅनेल्सवरही देशभक्तीपर गीते आणि सिनेमे दाखविले जात आहेत. एकूणच ‘हर घर तिरंगा’ मोहिमेमुळे साऱ्या देशात चैतन्यमय वातावरण निर्माण झाले आहे. 

स्वातंत्र्यप्राप्तीचा अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या ‘हर घर तिरंगा’ मोहिमेला समाजातील सर्व स्तरांतील लोकांनी प्रचंड प्रतिसाद दिला आहे. देशभरातील लोकांनी तिरंगा ध्वजासोबतची आपली छायाचित्रे harghartiranga.com या वेबसाइटवर शेअर करावीत. - नरेंद्र मोदी, पंतप्रधान

तिरंगा हा साऱ्या भारताचा अभिमान आहे. स्वातंत्र्यलढ्यामध्ये असंख्य देशभक्तांनी बलिदान दिले. त्यांच्याच प्रयत्नांमुळे आपला देश स्वतंत्र झाला. ‘हर घर तिरंगा’ या मोहिमेद्वारे या स्वातंत्र्यसैनिकांना सर्व भारतीयांनी आदरांजली अर्पण केली आहे.- अमित शहा, गृहमंत्री

टॅग्स :railwayरेल्वेEmployeeकर्मचारीMumbaiमुंबई