शहरं
Join us  
Trending Stories
1
अंबाबाईच्या चरणी १ कोटी ८४ लाखांचे दान; कोल्हापुरच्या देवस्थान समितीकडून मोजणी
2
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
3
Bigg Boss Marathi फेम अभिनेत्रीचं क्रॉप टॉप अन् डेनिम शॉर्ट्समध्ये बोल्ड फोटोशूट (Photos)
4
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
5
पुण्याहून लातूरकडे निघालेली भरधाव ट्रॅव्हल्स उलटली; गाढ झाेपेत असलेले ५ प्रवासी जखमी!
6
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
7
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
8
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
9
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
10
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
11
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
12
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
13
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
14
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
15
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
16
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
17
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
18
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
19
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव
20
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण

Afghanistan Taliban Crisis: “शेजारी राष्ट्रामधील अस्थिरता CAA ची गरज अधोरेखित करते”; केंद्रीय मंत्र्यांचे स्पष्ट मत

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2021 4:10 PM

Afghanistan Taliban Crisis: एका केंद्रीय मंत्र्यांनी भारताच्या शेजारील राष्ट्रांमधील अस्थिर स्थिती नागरिकत्व दुरुस्ती कायद्याची (CAA) गरज अधोरेखित करत असल्याचे मत व्यक्त केले आहे.

नवी दिल्ली:तालिबाननेअफगाणिस्तानवर ताबा मिळवल्यानंतर तेथे सरकार स्थापन करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर तालिबान सरकारला मान्यता द्यावी की नाही, यावर संमिश्र प्रतिक्रिया जगभरातून उमटताना दिसत आहे. भारतही या सर्व घडामोडींवर बारीक लक्ष ठेवून आहे. यातच आता एका केंद्रीय मंत्र्यांनी भारताच्या शेजारील राष्ट्रांमधील अस्थिर स्थिती नागरिकत्व दुरुस्ती कायद्याची (CAA) गरज अधोरेखित करत असल्याचे मत व्यक्त केले आहे. (hardeep singh puri says caa necessary over afghanistan taliban crisis)

अफगाणिस्तानमध्ये आताच्या घडीला अराजकासारखी स्थिती आहे. तालिबान अफगाणिस्तानमध्ये सरकार स्थापन करत असून, आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याला मान्यता मिळावी यासाठी प्रयत्नशील आहे. यातच केंद्रीयमंत्री हरदीप सिंग पुरी यांनी ट्विट करून नागरिकत्व दुरुस्ती कायद्याची गरज अधोरेखित झाल्याचे म्हटले आहे. 

Taliban ला मोठा धक्का! आर्थिक कोंडी करण्यासाठी IMF ने घेतला महत्त्वाचा निर्णय

CAA गरजेचे आहे

अफगाणिस्तानमधून मायदेशात परतलेल्या काही शिख आणि हिंदू बांधनांबाबतचे एक वृत्त शेअर करत हरदीप सिंग पुरी यांनी म्हटले आहे की, आपल्या शेजारी म्हणजे अफगाणिस्तानधील अस्थिर परिस्थिती आणि ताज्या घटनांचा आढावा घेतला, तर आपले शिख आणि हिंदू बांधव अत्यंत कठीण परिस्थितीतून जात आहे, याची केवळ कल्पनाच केली जाऊ शकते. अशा परिस्थिती भारताने केलेला नागरिकत्व दुरुस्ती कायदा किती महत्त्वाचा आहे, हे अधोरेखित होते, असे ट्विट हरदीप सिंग पुरी यांनी केले आहे. 

तालिबानने भारतातून होणारी आयात-निर्यात रोखली; अफगाणिस्तानातील सत्तांतरानंतर निर्णय

अफगाणिस्तानातील हिंदू, शीख बांधवांना आश्रय देणार

अफगाणिस्तानातील परिस्थितीसंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी एक मोठी बैठक झाली. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, भारताने केवळ आपल्या नागरिकांचेच संरक्षण नव्हे, तर ज्या शीख आणि हिंदू अल्पसंख्यकांची भारतात येण्याची इच्छा आहे, त्यांचेही संरक्षण करायला हवे आणि त्यांना आश्रयही द्यायला हवा. एढेच नाही, तर आपण त्यांना शक्य ती सर्व प्रकारची मदतही करायला हवी. तसेच मदतीसाठी भारताकडे डोळे लावून बसलेल्या आपल्या अफगान भाऊ आणि बहिणींना मदद केली जाईल, असे पंतप्रधान मोदींनी म्हटले आहे. 

टॅग्स :TalibanतालिबानAfghanistanअफगाणिस्तानIndiaभारतcitizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयक