शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
3
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
4
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
5
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
6
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
7
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
9
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
10
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
11
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
12
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
13
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
14
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
15
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
16
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
17
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
18
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
19
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
20
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!

राहुल गांधींच्या विधानावरुन लोकसभेत गदारोळ; काँग्रेस खासदार केंद्रीय मंत्र्यांच्या दिशेने धावून गेले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2020 13:32 IST

सभागृहात कॉंग्रेसच्या खासदारांची वर्तवणूक गुंडगिरीची होती, भाजपाचा आरोप

नवी दिल्ली - कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष खासदार राहुल गांधी यांनी दिल्लीच्या हौझ काझी निवडणुकीच्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केलेल्या वादग्रस्त विधानावर लोकसभेत शुक्रवारी गदारोळ झाला. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी राहुल गांधी यांच्या या वक्तव्यास आक्षेप घेत संपूर्ण सभागृहाने याचा तीव्र निषेध करावा अशी मागणी केली. राहुल यांच्या विधानाचा सभागृहात उल्लेख होताच कॉंग्रेसचे खासदार संतापले. 

हर्षवर्धन यांच्या मागणीवरुन काँग्रेस खासदारांनी गोंधळ करत केंद्रीय मंत्र्याच्या दिशेने धावत गेले आणि त्यांना घेराव घातला. सभागृहात गोंधळ संपत नसल्याने अखेर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सभागृहाचं कामकाज स्थगित केले.

या प्रकरणावर संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी म्हणाले की, सभागृहात कॉंग्रेसच्या खासदारांची वर्तवणूक गुंडगिरीची होती. 'राहुल गांधींच्या भडकाऊ भाषणानंतर  ते हिंसेच्या मार्गावर चालले आहेत. डॉक्टर हर्षवर्धन यांच्याशी गैरवर्तन करण्याचा हा प्रयत्न होता. यातून कॉंग्रेसची निराशा आणि गुंडगिरी दिसून येते असं त्यांनी सांगितले तर भाजपा खासदार जगदंबिका पाल म्हणाले की, कॉंग्रेसच्या खासदारांची वृत्ती लोकशाहीसाठी दुर्दैवी आहे. केंद्रीय मंत्री हर्षवर्धन राहुल गांधींचे विधान वाचत होते, त्यावेळी कॉंग्रेसचे खासदार माणिकम टागोर त्यांच्या दिशेने आले. देशाच्या लोकशाहीसाठी हे दुर्दैवी आहे असं सांगत त्यांनी काँग्रेसवर टीका केली. 

राहुल गांधी यांच्या प्रश्नावर उत्तर देण्यासाठी डॉ. हर्षवर्धन सभागृहात उभे होते. यावेळी त्यांनी सुरुवात करताना राहुल गांधी यांनी ज्या असभ्य भाषेचा वापर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी केला त्याचा निषेध करतो असं म्हटल्यानंतर काँग्रेसचे खासदारांनी सभागृहात गोंधळ घालण्यास सुरुवात केली. 

काँग्रेस खासदारांच्या गोंधळानंतरही हर्षवर्धन यांनी आपलं निवेदन सुरुच ठेवले. त्यांनी सांगितले की, या देशातील युवावर्ग सहा महिन्यानंतर नरेंद्र मोदी यांना काठीने मारुन देशाच्या बाहेर काढतील असं राहुल गांधी म्हणतात. स्वत: राहुल गांधी यांचे वडील राजीव गांधी पंतप्रधान होते. त्यामुळे वडील पंतप्रधान राहिले असताना इतर कोणत्याही पंतप्रधानांसाठी अशी निंदनीय भाषा कशी वापरू शकतात असा सवाल त्यांनी केला. 

हौझ काझीच्या सभेत काय म्हणाले राहुल गांधी?दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान राहुल गांधींनी बुधवारी हौझ काझी येथील आपल्या सभेत पंतप्रधानांसाठी आक्षेपार्ह विधान केले होतं. 'हे नरेंद्र मोदी भाषण देत आहेत, 6 महिन्यांनंतर ते घराबाहेर पडू शकणार नाहीत. भारतातील युवा त्यांना अशा काठीने मारतील, ते त्यांना समजावून सांगतील की हा देश तरुणांना रोजगार दिल्याशिवाय पुढे जाऊ शकत नाही असं राहुल गांधी म्हणाले होते.  

टॅग्स :lok sabhaलोकसभाRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदीBudget Sessionअर्थसंकल्पीय अधिवेशन