शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
3
सिंधू पाणी करार मोडल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
4
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
5
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
6
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
7
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
8
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
9
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
10
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
11
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
12
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
13
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
14
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
15
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
16
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
17
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
18
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
19
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
20
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली

"जर मी 3-4 महिने आधी सुटलो असतो तर...", अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2024 20:24 IST

केजरीवाल पुढे म्हणाले, "यांचा हेतू केजरीवालचे मनोधैर्य तोडणे हता. पण यांना माहीत नाही, मी हरयाणाचा मुलगा आहे. आपण कुणाचेही मनोधैर्य तोडू शकता, पण हरियाणातील लोकांचे नाही. आज तुमचा मुलगा तुमच्यात आहे. हे लोक मला तोडू शकले नाही."

हरियाणामध्ये आम आदमी पक्षाशिवाय सरकार स्थापन होणार नाही आणि ज्याचे कुणाचे सरकार येईल त्याला आम आदमी पक्षाचा पाठिंबा असेल, असा दावा दिल्लीचे माजी मुख्यमंत्री तथा आपचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी केला आहे. ते शनिवारी हरियाणातील कॅथलमधील कलायत येथे एका जाहीर सभेला संबोधित करत होते.

अरविंद केजरीवाल म्हणाले, "मला येथेही (हरियाणा) काम करून दाखवायचे आहे. कारण ही माझी जन्मभूमी आहे. मी पाच गॅरंटी देऊन जात आहे. लोक विचारतात, गॅरंटी देत आहात, पण जिंकणार का? जर यांनी मला 3-4 महिने आधी सोडले असते, तर आम्ही हरियाणात सरकार स्थापन केले असते. मला 10 दिवसांपूर्वी सोडले. पण, मी आजही सागत आहे की, आमच्याशिवाय सरकार स्थापन होणार नाही, एवढ्या जागा आम्हाला मिळणार आहेत. कुणाचेही सरकार आले, तरी आमचा त्यांना पाठिंबा असेल. जी गॅरंटी दिली आहे, ती पूर्ण करू."

मला कारागृहात त्रास दिला गेला - केजरीवालभाजपवर हल्ला चढवताना केजरीवाल म्हणाले, "या लोकांनी मला तुरुंगात टाकले होते. पाच-सहा महिने तुरुंगात होतो. काही दिवसांपूर्वीच तुरुंगातून बाहेर आलो आहे. आपल्याला तुरुंगात विविध प्रकारे त्रास देण्याचा प्रयत्न केला गेला. त्यांनी आपला मानसिक आणि शारीरिक प्रकारचा छळ केला. मी शुगर पेशन्ट आहे. मला रोज चार वेळा इन्सुलिनचे इंजेक्शन घ्यावी लागतात. त्यांनी माझे औषध आणि इंजेक्शनही बंद केले होती. त्यांना काय करायचे होते माहीत नाही."

केजरीवाल पुढे म्हणाले, "यांचा हेतू केजरीवालचे मनोधैर्य तोडणे हता. पण यांना माहीत नाही, मी हरयाणाचा मुलगा आहे. आपण कुणाचेही मनोधैर्य तोडू शकता, पण हरियाणातील लोकांचे नाही. आज तुमचा मुलगा तुमच्यात आहे. हे लोक मला तोडू शकले नाही." 

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालAam Admi partyआम आदमी पार्टीPoliticsराजकारण