शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
3
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
4
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
5
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स
6
सिंधू पाणी करार थांबवल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
7
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
8
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
9
"गेल्या महिन्यात काश्मीरला जायचा विचार करत होतो...", पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर प्रसाद खांडेकरची पोस्ट
10
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
11
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
12
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
13
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
14
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
15
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
16
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
17
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
18
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
19
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
20
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा

"आम्ही महाराष्ट्र, हरयाणा आणि दिल्ली जिंकलो, आता...", शाहनवाज हुसैन यांचा मोठा दावा; CM नितीश कुमारांबद्दल म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2025 12:11 IST

बेगुसराय येथे गुरुवारी (दि.२०) शाहनवाज हुसैन यांनी माध्यमांशी संवाद साधला.

बेगुसराय : भाजपने महाराष्ट्र, हरयाणा आणि आता दिल्ली देखील जिंकली आहे. आता बिहारची वेळ आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार (CM Nitish Kumar) यांच्या नेतृत्वाखाली आम्ही बिहार निवडणूक लढवणार आणि जिंकणार आहोत. नितीश कुमार यांच्यासारखा अनुभवी मुख्यमंत्री कोणाकडेही नाही, असे विधान भाजपचे ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रीय प्रवक्ते शाहनवाज हुसैन (Shahnawaz Hussain) यांनी केले आहे. 

बेगुसराय येथे गुरुवारी (दि.२०) शाहनवाज हुसैन यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी शाहनवाज हुसैन यांनी रेखा गुप्ता यांचे दिल्लीच्या मुख्यमंत्री झाल्याबद्दल अभिनंदन केले. तसेच, आज देशातील महिला आनंदी आहेत. भाजपचे अनेक राज्यांमध्ये मुख्यमंत्री आहेत, पण दिल्लीत एक महिला मुख्यमंत्री बनल्या आहेत, असे शाहनवाज हुसैन यांनी म्हटले आहे.

नरेंद्र मोदी हे बिहारमधील भागलपूरमध्ये येणार आहेत. याबाबतची माहिती देताना शाहनवाज हुसैन यांनी सांगितले की, पंतप्रधान भागलपूरमध्ये येत आहेत. येथे ते शेतकऱ्यांना भेटतील. पंतप्रधानांनी शेतकऱ्यांसाठी जास्तीत जास्त काम केले आहे. त्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी काम केले जात आहे. बिहारमध्ये इथेनॉल प्लांट बसवले आहेत. बिहारमध्ये १७ इथेनॉल प्लांट उभारण्याची परवानगी देण्यात आली होती, त्यापैकी १२ ते १३ प्लांट उभारण्यात आले आहेत.

पुढे शाहनवाज हुसैन म्हणाले की,  नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली बिहारमध्ये एनडीए सरकार सुरू आहे आणि ते चांगले काम करत आहे. नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली बिहार पुढे जात आहे. याचबरोबर, लालू यादव यांना भारतरत्न देण्याबाबत तेजस्वी यादव यांच्या विधानाबाबत शाहनवाज हुसैन म्हणाले की, माजी मुख्यमंत्री जननायक कर्पुरी ठाकूर यांना भारतरत्न मिळाला, त्यांची लालू यादवांशी तुलना करणे योग्य नाही. लालू यादव अजूनही जामिनावर आहेत.

टॅग्स :BJPभाजपाBiharबिहारNitish Kumarनितीश कुमारNarendra Modiनरेंद्र मोदी