शहरं
Join us  
Trending Stories
1
"निवडणूक लढलो नाही याचा अर्थ…’’, हरियाणात मुख्यमंत्रिपदावरून काँग्रेस नेत्याचं सूचक विधान
2
Eknath Shinde : "मोदीजी देशाची शान; महाराष्ट्रात येतात तेव्हा रिकाम्या हाताने येत नाहीत, भरभरून देतात"
3
अजितदादांना धक्का बसणार, रामराजे नाईक निंबाळकर तुतारी फुंकणार?
4
"गुंडांनी आमचा पाठलाग सुरू केला अन्..."; मुलींनी सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
5
"आता भाजपाकडूनही मोघलशाही सुरू", संभाजीराजे छत्रपती पोलिसी कारवाईनंतर भडकले
6
"आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवणार, जातीनिहाय जनगणना कायदेशीरपणे मंजूर करून घेणार’’, राहुल गांधींची घोषणा  
7
पहिल्या T20 आधी बांगलादेशच्या संघात घबराट? मशिदीत न जाता 'या' ठिकाणी केलं नमाज पठण
8
भाजपाची जम्मू काश्मिरात मोठी खेळी! 'या' पाच आमदारांमुळे सत्तेचं समीकरण बदलणार?
9
अजिंक्य रहाणेला तोड नाय! मुंबईच्या विजयाची 'गॅरंटी' देणारा दिग्गज कर्णधार, पाहा आकडेवारी
10
Irani Cup 2024 : रहाणेच्या नेतृत्वात मुंबई 'अजिंक्य'! २७ वर्षांचा दुष्काळ संपवला अन् इराणी चषक उंचावला
11
IndiGo Airlines: इंडिगोची यंत्रणा ठप्प; देशभरात अडकले प्रवासी, एअरलाइन्सने मागितली माफी!
12
"आधी इराणच्या अणुकेंद्रांवर हल्ले करा", डोनाल्ड ट्रम्प यांचा इस्रायलला सल्ला
13
बाळासाहेबांचा निष्ठावंत शिवसैनिक हरपला; माजी आमदार सीताराम दळवींचं मुंबईत निधन
14
"रोहित शर्मा अन् टीम इंडियाला माझा सलाम..."; ऑस्ट्रेलियन क्रिकेटरने केला कौतुकाचा वर्षाव
15
हरियाणात काँग्रेस किती जागा जिंकणार? अशोक तंवर यांचं मोठं भाकीत
16
₹९९ च्या इश्यू प्राईजच्या IPO ला जबरदस्त प्रतिसाद, ३१ वर्ष जुनी आहे कंपनी; जाणून घ्या
17
Narendra Modi : "काँग्रेसपासून सावध राहा, कारण..."; महाराष्ट्रातून पंतप्रधान मोदींनी केलं आवाहन
18
कोण आहेत शैलजा पाईक?; ज्यांना मिळाली तब्बल ७ कोटींची फेलोशिप, पुण्याशी कनेक्शन
19
सेबी प्रमुख माधबी बूच यांच्या अडचणी वाढल्या, संसदेच्या वरिष्ठ समितीने बजावले समन्स
20
इस्रायल-इराण संघर्षाचा परिणाम भारतावर होणार, सर्वसामान्यांच्या अडचणी वाढणार!

"मी कारगिल युद्ध लढलो, माझा मुलगा..."; नूंह हिंसाचारात मारल्या गेलेल्या जवानाच्या वडिलांचं दु:ख

By ऑनलाइन लोकमत | Published: August 02, 2023 12:29 PM

नीरजचे संपूर्ण कुटुंब संरक्षण आणि होमगार्डच्या पार्श्वभूमीतून आले आहे. नीरजचे वडील भावूक झाले.

हरियाणातील मेवात-नूंह येथे सोमवारी झालेल्या हिंसाचारात दोन होमगार्डसह 6 जणांचा मृत्यू झाला आहे. या हिंसाचारात होमगार्ड नीरज यांना आपला जीव गमवावा लागला. नीरजचं कुटुंब गढ़ी बाजीदपूर, गुरुग्राम येथे राहतं. हे हिंदूबहुल गाव आहे, जिथे 50 मुस्लिम कुटुंबही राहतात. 'आज तक'शी केलेल्या संभाषणात नीरजच्या कुटुंबीयांनी सांगितले की, त्यांच्या गावातील लोक नेहमीच शांतता आणि सौहार्दाने एकत्र राहतात. अशा हिंसाचाराचा विचारही त्यांनी केला नव्हता.

नीरजचे संपूर्ण कुटुंब संरक्षण आणि होमगार्डच्या पार्श्वभूमीतून आले आहे. नीरजचे वडील भावूक झाले. ते म्हणाले, "मी देशाची सेवा केली, मी कारगिलमध्ये लढलो, माझा मुलगा कर्तव्य बजावताना शहीद झाला याचा मला अभिमान आहे. नीरजवर काल पूर्ण आदराने अंत्यसंस्कार करण्यात आले."

नीरजचे वडील म्हणाले, "जे लोक जातीय तणाव निर्माण करतात ते चुकीचे आहेत, कोणताही धर्म असे म्हणत नाही. मी माझ्या नातवंडांनाही देशसेवेसाठी पाठवणार आहे." दुसरीकडे, नीरजच्या पत्नीने सांगितले की, "मी सरकारला आवाहन करते की, दोन समुदायांमधील हे भांडण थांबवा. माझ्यासारखी एखादी महिला विधवा होऊ नये किंवा कोणाच्याही मुलांनी वडील गमावू नये असं मला वाटत आहे. 

हिंसाचारात ठार झालेल्या चार नागरिकांमध्ये शक्तीचेही नाव आहे. शक्ती हा नूहपासून 18 किलोमीटर अंतरावर असलेल्या भादस गावचा रहिवासी होता. या गावात हिंदूंची लोकसंख्या फक्त दोन टक्के आहे. मात्र आजपर्यंत येथे कधीही हिंसाचार किंवा गोंधळ झाला नाही. शक्तीच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, शक्ती हा बडकल भागातील एका मिठाईच्या दुकानात काम करायचा. गवंडी म्हणूनही काम करायचे. बडकल भागातून हिंसाचार सुरू झाला तेव्हा शक्ती घरी आला होता. 

हिंसाचारानंतर गावातील सर्व हिंदू कुटुंबे घाबरली, मग कळले की गावातील मोठ्या गुरुकुलावर (आश्रम) दंगलखोरांनी हल्ला केला आहे. माहिती मिळताच शक्ती त्या बाजूला गेले, त्यानंतर तो घरी परतलेच नाहीत. यानंतर त्याचा मृतदेह रस्त्यात सापडल्याची माहिती कुटुंबीयांना मिळाली. शक्तीच्या डोक्यात जड वस्तूने मागून हल्ला करण्यात आला. 300-400 च्या जमावाने गुरुकुलावर हल्ला केल्याचे सांगण्यात येत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.