शहरं
Join us  
Trending Stories
1
हात बदलेगा हालात.. जम्मू काश्मीरसाठी काँग्रेसचा जाहीरनामा; महिला, युवांसाठी विशेष आश्वासने
2
"...तर ना आइस्क्रीम खाता आलं असतं, ना बाइक चालवता आली असती"; अमित शाह यांचा राहुल गांधींवर निशाणा
3
ही 'सुपरहॉट' मॉडेल नक्की आहे तरी कोण? 'टीम इंडिया'शी आहे थेट कनेक्शन, पाहा Photos
4
"भारतात मुस्लिमांवर अत्याचार होतायत", इराणच्या सर्वोच्च नेत्याचं वादग्रस्त वक्तव्य; परराष्ट्र मंत्रालयानं स्पष्टच सुनावलं
5
'हा' देश मुस्लिमांना देश सोडण्यासाठी देणार लाखो रुपये, काय आहे प्रकरण? जाणून घ्या
6
मावस भावाच्या अत्याचारातून अल्पवयीन बहीण प्रसूत; वाई तालुक्यातील धक्कादायक घटना
7
VIDEO : अंबरनाथमध्ये दुचाकीस्वाराला डंपरने उडवलं, घटना सीसीटीव्हीत कैद
8
वंदे भारतची नागपूरला तिसरी दिमाखदार भेट; सिकंदराबादकडे रवाना; ३ तासांत गाठले बल्लारशाह
9
राहुल गांधींवर वादग्रस्त वक्तव्य भोवलं, शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल
10
"राहुल गांधींचे शिक्षक..."; भगवंत मान यांचं काँग्रेस नेत्याच्या शिक्षणावर भाष्य करत मोठं विधान
11
"तर कायदेशीर कारवाई करेन", सलमान खानची इन्स्टाग्रामवर ऑफिशियल पोस्ट, प्रकरण काय?
12
VIDEO: वंदे भारताला हिरवा झेंडा दाखवण्यासाठी बाचाबाची, भाजप आमदार ट्रेनसमोर पडल्या
13
Chirag Paswan : "मी कोणालाच घाबरत नाही..."; पंतप्रधान मोदींसोबतच्या नात्याबद्दल चिराग पासवान यांचा खुलासा
14
माझी प्रचंड खिल्ली उडवली गेली, पण मी गप्प राहिलो; कारण..., पंतप्रधान मोदी स्पष्टच बोलले
15
'फक्त 5 तासांचा कार्यक्रम, 10 दिवस काय केले?' BJP नेत्याची राहुल गांधींच्या US दौऱ्यावर टीका
16
Shikhar Dhawan Video: गब्बर इज बॅक!! निवृत्तीनंतर पुन्हा एकदा शिखर धवनच्या हाती बॅट, केली तुफान फटकेबाजी
17
CM शिंदे दक्ष, नाराजांवर लक्ष! विधानसभेआधी तीन नेत्यांचे राजकीय पुनर्वसन
18
"बासरीने काम चालणार नाही, सुदर्शन चक्र..."; असं का म्हणाले योगी आदित्यनाथ? कुणाचं नाव घेतलं?
19
Rohit Sharma Virat Kohli, IND vs BAN 1st Test: विराटचा केवळ २ गोलंदाजांसह सराव, रोहितचा तर वेगळाच प्लॅन! दिग्गजांच्या डोक्यात नक्की काय?
20
मुख्यमंत्र्यांनी शब्द पाळला, लोकसभेत तिकीट कापलेल्या हेमंत पाटलांना मंत्रिपदाचा दर्जा

Hathras Stampede :"भोले बाबा ढोंगी, कोणताच चमत्कार करत नाहीत; यापुढे कधीही सत्संगाला जाणार नाही"

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2024 9:26 AM

Hathras Stampede : हाथरस येथे ​​भोले बाबा यांच्या सत्संगाच्या वेळी झालेल्या चेंगराचेंगरीत १२१ जणांना आपला जीव गमवावा लागला होता.

२ जुलै रोजी हाथरस येथे ​​भोले बाबा यांच्या सत्संगाच्या वेळी झालेल्या चेंगराचेंगरीत १२१ जणांना आपला जीव गमवावा लागला होता. तेव्हापासून आजतागायत बाबा एकदाही समोर आले नाहीत. याच दरम्यान भोले बाबांचे वकील ए के सिंह यांनी 'आज तक'वर दावा केला आहे की, बाबा कुठेही लपलेले नाहीत. या घटनेने बाबा खूप दुखावले आहेत. यानंतर भोले बाबांच्या वतीने पीडितांना सर्वतोपरी मदत केली जाईल, असा दावा करण्यात आला.

भोले बाबांच्या या दाव्यांचा तपास करण्यासाठी, आज तकच्या टीमने हाथरस, एटा, जालेसर येथे आपल्या प्रियजनांना गमावलेल्या पीडित कुटुंबांच्या घरांना भेट दिली. भोले बाबांनी लोकांना मदत केल्याच्या सर्व दाव्यांमध्ये किती तथ्य आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. बाबांकडून त्यांच्या घरी काही मदत आली का? बाबांच्या समितीने त्यांच्याशी संपर्कही केला का? या सर्व प्रकाराबाबत लोकांनी माहिती दिली आहे. 

हाथरस घटनेत ६५ वर्षीय चंद्रप्रभा यांना गमावलेल्या कुटुंबाला भेटण्यासाठी टीम सर्वप्रथम एटाला पोहोचली. येथे राम दास यांनी सांगितलं की, भोले बाबांच्या बाजूने कोणतीही मदत आली नाही, परंतु आजनंतर ते बाबांच्या कोणत्याही सत्संगाला जाणार नाही आणि त्यांचं कधीही ऐकणार नाहीत.

जलेसर राज कुमार यांच्या घरी टीम पोहोचली. राजकुमार मजुरीचे काम करतो आणि बाबांची पूजाही करतो. तो पत्नी आणि १७ वर्षांची मुलगी खुशबूसोबत सत्संगाला आला होता. पण सत्संगात झालेल्या चेंगराचेंगरीत मुलीचा मृतदेह सापडला. त्यानंतर आजपर्यंत बाबांकडून कोणतीही मदत किंवा आश्वासन मिळालेलं नाही. मात्र, सरकारकडून 2 लाख रुपयांची मदत मिळत आहे.

एका कुटुंबाची अवस्थाही बिकट असून रडत आहे. इथे एकाच घरातील दोन मुली बाबांच्या सत्संगाला गेल्या होत्या, पण त्या परतल्याच नाहीत. मीरा आणि सुधा अशी मुलींची नावं होती. आज तकशी बोलताना त्यांच्या आईने सांगितलं की, बाबांच्या बाजूने कोणतीही मदत आली नाही, माझ्या दोन्ही मुली गेल्या. सरकारकडून मदत आली आहे, पण बाबांच्या बाजूने कोणीही आलं नाही.

हाथरसमध्ये आता बाबांना देव मानणारे भक्त आपल्या प्रियजनांना गमावल्यानंतर बाबांना ढोंगी म्हणू लागले आहेत. ज्यांच्या कुटुंबीयांचा मृत्यू झाला आहे त्यांची अवस्था अत्यंत वाईट झाली आहे. एका व्यक्तीने सांगितलं की, "दहा दिवस झाले, ना बाबा आले ना त्यांचं कोणी आलं. बाबा ढोंगी आहेत. बाबा काही चमत्कार करत नाहीत." आजतकने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेश