शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता मी एकालाही जिवंत सोडणार नाही", अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरपूर्वी काय घडलं?
2
"अक्षय शिंदेला गोळ्या घालून मारणं फारच सहज झालं, त्याला...", उदयनराजेंची संतप्त प्रतिक्रिया
3
Harini Amarasuriya : हरिणी अमरसूर्या बनल्या श्रीलंकेच्या नव्या पंतप्रधान
4
दिंडोरीत 'आत्राम' पॅटर्न? अजित पवारांचं गोकूळ झिरवळांनी वाढवलं टेन्शन!
5
"ठोकलं अक्षय शिंदेला आणि एन्काऊंटर विरोधकांचा"; आशिष शेलारांचा सणसणीत टोला
6
“शरद पवारांनी सुपारी दिली अन् संजय राऊतांनी ठाकरे गटाचा एन्काउंटर केला”; शिंदे गटाची टीका
7
"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य
8
अक्षय शिंदेचा पोलिसांकडून स्वसंरक्षणार्थ एन्काउंटर की ‘कुछ गडबड है’? CID तपास करणार
9
लैंगिक छळाच्या घटनांवर SC नाराज; केंद्राच्या मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी करण्याचे निर्देश
10
वांद्रे पश्चिम मतदारसंघातून विधानसभेसाठी प्रिया दत्त? आशिष शेलारांविरोधात काँग्रेसची नवी खेळी
11
Irani Cup 2024 : दोन मराठमोळे कर्णधार! १ तारखेपासून थरार; मुंबईला ऋतुराजचा संघ भिडणार
12
"आधी म्हणत होते अक्षय शिंदेला फाशी द्या, आता...", अजित पवार 'मविआ'वर बरसले
13
Amazon Great Indian Festival Sale मध्ये 15 हजारांपेक्षा कमी किमतीत मिळतील 'हे' स्मार्टफोन
14
Exclusive: 'निक्कीला छत्रपती संभाजीनगरला घेऊन जाणार'; अरबाज म्हणतो, 'दोघांचंही बालपण...'
15
बदलापूरसारखीच घटना; मुख्याध्यापकाने सहा वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; अत्याचाराला विरोध केला म्हणून...
16
वेड्या बहिणीची वेडी ही माया! भाऊ अर्जुन तेंडुलकरच्या वाढदिवशी बहीण सारा भावुक, म्हणाली...
17
आपच्या पाठिंब्याशिवाय हरियाणात सरकार स्थापन होऊ शकणार नाही, अरविंद केजरीवाल यांचा दावा 
18
'आयफा'मुळे राजस्थानमधील पर्यटन क्षेत्रात गुंतवणूक वाढेल - उपमुख्यमंत्री दिया कुमारी
19
भीषण अपघात! मध्य प्रदेशमध्ये ट्रकखाली आली ऑटो; ७ जणांचा मृत्यू, ४ जखमी
20
दुधाच्या अनुदान वाढीवरून अजित पवार आणि विखे पाटलांमध्ये खडाजंगी; बैठकीत नेमकं काय घडलं?

'हवालाबाज' विकासात अडथळे आणत आहेत - मोदींचे काँग्रेसला प्रत्युत्तर

By admin | Published: September 10, 2015 11:35 AM

केंद्र सरकारने काळ्या पैशाविरोधात केलेल्या कारवाईमुळे 'हवालाबाजां'च्या पायाखालची वाळू सरकली असून ते विकासात अडथळे आणत आहेत अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसच्या टीकेला प्रत्युत्तर दिले.

ऑनलाइन लोकमत

भोपाळ, दि. १० - केंद्र सरकारने काळ्या पैशाविरोधात केलेल्या कारवाईमुळे 'हवालाबाजां'च्या पायाखालची वाळू सरकली असून ते विकासात अडथळे आणत आहेत अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. मोदींनी निवडणूक प्रचाराच्या वेळी दिलेली आश्वासने केवळ ‘हवाबाजी’ आणि निवडणूक जुमला असल्याचे सिद्ध झाले असल्याची टीका सोनिया गांधींनी केली होती. त्या पार्श्वभूमीवर भोपाळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना मोदींनी काँग्रेसवर टीकास्त्र सोडले.
 
लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवामुळे बसलेल्या धक्क्यातून काँग्रेस अद्याप सावरलेली नाही. सरकार विकासाच्या मार्गावर पुढे जाण्याचा प्रयत्न करत असताना काँग्रेस देशाच्या विकासात अडथळा आणत आहे. काँग्रेसच्या आडमुठी धोरणामुळेच संसदेचे कामकाज ठप्प झालं आणि संपूर्ण पावसाळी अधिवेशन वाया गेले. देशासाठी महत्वाचे असलेले जीएसटी ( वस्तू व सेवा कर) विधेयक मंजूर होऊ शकले नाही,  असा आरोप मोदी यांनी केला. काँग्रेस वगळता उर्वरित सर्व पक्षांना संसदेचे कामकाज चालावे असे वाटत होते, काँग्रेसमुळेच विशेष अधिवेशन बोलावण्याचा प्रस्तावही रद्द करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
शिकण्याची तयारी नसल्यामुळे एकेकाळी ४०० जागा जिंकणा-या काँग्रेसकडे आता फक्त ४० जागा उरल्या आहेत असे टीकास्त्र त्यांनी सोडले.  तसेच आमचे सरकार नुसती आश्वासने देत नाही तर ती आश्वासने प्रत्यक्षात आणण्याच्या योजना आमच्याकडे तयार असतात असेही ते म्हणाले. 
दरम्यान महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या ( २ऑक्टोबर) निमित्ताने स्वच्छ भारत अभियानांतर्गत देशातील गावागावांमध्ये स्वच्छतेचा प्रसार करावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.