शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात कट्टरतावादाला चिथावणी देणाऱ्या घटनांमध्ये अचानक वाढ"; सरसंघचालकांनी व्यक्त केली चिंता
2
"OTT प्लॅटफॉर्ममुळे तरुणांवर वाईट परिणाम"; नियंत्रणासाठी कायदा करण्याची सरसंघचालकांची मागणी
3
प्रेमासाठी काय पण! गर्लफ्रेंडला खूश करण्यासाठी ३ मित्रांचा कारनामा; खावी लागली जेलची हवा
4
Video - रस्त्यावरुन जात होती २ लहान मुलं, अचानक कोसळलं घर; थरकाप उडवणारी घटना
5
Zerodha Nithin Kamath : ब्रोकर्स कधीही करू शकणार नाही 'हे' काम, SEBI च्या नव्या नियमांवर काय म्हणाले नितीन कामथ
6
"गेली पाच वर्षे तुमचा अपमान करुन..."; पॉडकास्टमधून राज ठाकरेंचे मतदारांना आवाहन
7
सूर जुळले! अखेर अंकिताने दाखवला कोकण हार्टेड बॉयचा चेहरा, कोण आहे तो?
8
कमी पैशांमध्ये अधिक व्हॅलिडिटीचा प्लॅन शोधताय? BSNL चा हा प्लॅन ठरेल बेस्ट
9
७५ किमीचा वेग, मेन लाईन ऐवजी लूप लाईनमध्ये एन्ट्री अन् धडक; नेमका कसा झाला अपघात?
10
Ratan Tata Successor Noel Tata : बुर्ज खलिफाशी आहे 'टाटा'चं कनेक्शन; Tata Trust चे अध्यक्ष नोएल टाटांवर आहे जबाबदारी
11
खळबळजनक! ऑनलाईन गेममध्ये अडकला जवान; रायफलसह आर्मी कँपमधून झाला फरार अन्...
12
भयंकर! जमीन हडपण्यासाठी स्वतःवर झाडली गोळी; पोलिसांच्या मदतीने रचला फिल्मी कट, अखेर...
13
दसरा मेळाव्यात ‘आव्वाज’ कुणाचा? उद्धवसेना वि. शिंदेसेना जुगलबंदी; गर्दीचा उच्चांक कोण मोडेल?
14
जामनेरमधून गिरीश महाजनांऐवजी त्यांच्या पत्नीला उमेदवारी; देवेंद्र फडणवीसांची घोषणा
15
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: अनियंत्रित रागाला लगाम घाला, आर्थिक चणचण भासेल
16
म्हैसूर-दरभंगा एक्स्प्रेसची मालगाडीला धडक; ट्रेनच्या डब्यांनी घेतला पेट
17
युद्धाने समस्या सुटणार नाहीत, शक्य तितक्या लवकर शांतता, स्थिरता पुनर्स्थापित करावी: PM मोदी
18
उड्डाणानंतर विमानात बिघाड, काही तास घिरट्या, सुखरूप लॅंडिंग; पायलटमुळे प्रवाशांचे प्राण वाचले
19
सीमेपलीकडून १५० दहशतवादी भारतात घुसखोरीच्या तयारीत; सुरक्षा दलांना अधिक सतर्कतेचा इशारा
20
फ्लाइट अन् फाइटसाठीही तयार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विधानसभेसाठी सज्जतेचे संकेत

फक्त ३५ रुपयांच्या ‘रिफंड’साठी तो ५ वर्षे लढला; आता रेल्वे देणार २.४३ कोटी रुपये

By ऑनलाइन लोकमत | Published: June 01, 2022 8:13 AM

३ लाख लोकांना फायदा

कोटा : राजस्थानच्या कोटा येथील एका व्यक्तीने अवघ्या ३५ रुपयांच्या रिफंडसाठी भारतीय रेल्वेशी पाच वर्षे लढा दिला आणि अखेरीस तो जिंकला. त्याच्या संघर्षाचा फायदा त्यालाच नाही तर सुमारे तीन लाख लोकांना झाला आहे. त्याच्यामुळे रेल्वे बोर्डाने २.९८ लाख वापरकर्त्यांना २.४३ कोटी रुपयांचा परतावा मंजूर केला आहे. 

जीएसटी लागू होण्यापूर्वीच रद्द केले होते तिकीट

पाच वर्षांच्या संघर्षादरम्यान आरटीआय कार्यकर्ते आणि व्यवसायाने अभियंता असलेल्या सुजित स्वामी (वय ३०) यांनी सुमारे ५० आरटीआय दाखल केले होते, तसेच चार सरकारी विभागांना एकामागून एक पत्रे लिहिली होती. सुजितने एप्रिल २०१७मध्ये गोल्डन टेंपल मेलचे कोटा ते नवी दिल्लीचे ७६५ रुपयांचे तिकीट बुक केले होते. तिकीट त्यावर्षी २ जुलै रोजीच्या प्रवासाचे होते. मात्र, वेटिंगमुळे ते प्रवास करू शकले नाहीत आणि तिकीट रद्द केल्यावर त्यांना ६६५ रुपये परत मिळाले. १ जुलैला जीएसटी व्यवस्था लागू होण्यापूर्वीच तिकीट रद्द करूनही रेल्वेने सेवाकर म्हणून ६५ रुपये कापण्याऐवजी ३५ रुपये जास्त म्हणजे १०० रुपये कापले होते. 

२.९८ लाख लोकांना झाला फायदा 

सुजितने ट्विटरद्वारेही पंतप्रधानांसह अन्य अधिकाऱ्यांना टॅग करुन लाखो लोकांकडून वसूल केलेला कर परत करण्याची मागणी केली. प्रकरण वाढत असल्याचे पाहून मे २०१९मध्ये आयआरसीटीसीने त्याला ३५ ऐवजी ३३ रुपये परत केले. पण, रेल्वेच्या मनमानीला बळी पडलेल्या इतर लोकांनाही परतावा मिळवून देण्यासाठी पुढील तीन वर्षे लढा सुरू ठेवला.त्यानंतर सुजित स्वामी यांनी माहिती अधिकार कायद्यांतर्गत प्रश्न पाठवून ३५ रुपयांचा परतावा मिळविण्यासाठी लढा सुरू केला.

सातत्याने आरटीआय अर्ज केल्यानंतर मिळालेल्या उत्तरानुसार, रेल्वेने २.९८ लाख लोकांकडून तिकिटे रद्द करताना प्रतिप्रवासी ३५ रुपये सेवा कर आकारला. ही माहिती समोर आल्यानंतर सुजितने आपला संघर्ष आणखी पुढे नेत रेल्वेमंत्री आणि पंतप्रधानांना रिफंडबाबत पत्रे लिहिली. अखेरीस गेल्या आठवड्यात शुक्रवारी त्याचे फळ मिळाले. पाच वर्षांनंतर रेल्वे बोर्डाने ३५ रुपये प्रतिप्रवासी दराने २.९८ लाख ग्राहकांना २.४३ कोटी रुपयांचा परतावा मंजूर केला. सोमवारी आयआरसीटीसीकडून उरलेल्या २ रुपयांचा परतावादेखील मिळाल्याचे सुजित स्वामी यांनी सांगितले.

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेCourtन्यायालय