शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद गंभीर धोका; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावरुन पीएम नरेंद्र मोदींनी दिला इशारा
2
"शाळेचे संचालक अजूनही का सापडलेले नाहीत?", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर आदित्य ठाकरेंचा सवाल
3
"जगन मोहन रेड्डींचे मन शुद्ध असेल तर...", तिरुपती लाडू वादावरून पवण कल्याण यांचा निशाणा
4
Devendra Fadnavis on Badlapur Case Akshay Shinde Encounter: "पोलिसांवर गोळ्या चालवल्या तर..."; देवेंद्र फडणवीसांचे अक्षय शिंदे एन्काऊंटरवर रोखठोक मत
5
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी व्हावी, नातलगांची मागणी 
6
बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदे एन्काऊंटरवर नाना पटोले यांचे सरकारला ३ महत्त्वाचे प्रश्न
7
Sharad Pawar on Akshay Shinde Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर शरद पवारांचे ट्विट, काय म्हणाले?
8
"प्रकरण दडपण्यासाठी हे एन्काऊंटरचे फेक नॅरेटिव्ह", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर अनिल देशमुखांचा आरोप
9
"पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आहे का?", बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार, विजय वडेट्टीवारांचा सवाल
10
CM Eknath Shinde on Akshay Shinde Encounter: "ज्याने माणुसकीला काळीमा फासला..."; CM एकनाथ शिंदे अक्षयच्या एन्काऊंटरवर स्पष्टच बोलले
11
अक्षय शिंदे आणि पोलिसांची चकमक ठाण्यात नेमकी कुठे झाली? Inside Story
12
Badlapur Case Accused Akshay Shinde, Police Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: आरोपी अक्षय शिंदे पोलीस चकमकीत ठार! पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केला गोळीबार
13
बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार! उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
14
अनिल अंबानी यांच्या मुलावर SEBI ची कारवाई; 'या' प्रकरणात ठोठावला कोट्यवधीचा दंड
15
"माझ्या पोराला पैसे देऊन मारून टाकलं", अक्षय शिंदेच्या आईचे गंभीर आरोप, दुपारीच घेतली होती भेट
16
भारतात मंकीपॉक्सचा रुग्ण आढळला, क्लेड १ बी व्हायरसची लागण, आरोग्य यंत्रणा सतर्क
17
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
18
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
19
Video: बापरे! अजगराचा महिलेला विळखा, दोन तास मृत्यूशी झुंज, श्वास घेणेही कठीण; अखेर...
20
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा

आरोग्य मंत्रा : डाएट करताना या 7 गोष्टी टाळा

By admin | Published: March 09, 2017 1:48 PM

डाएटिंग करत असताना काही महत्वाच्या गोष्टी टाळण्याची गरज असते

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 9 - वाढत्या वयासोबत होणारे शारिरीक त्रास, वाढतं वजन यासारखे अनेक प्रश्न सर्वांना भेडसावत असतात. आपलं वय कितीही झालं तरी आपण एकदम फिट आणि परफेक्ट दिसावं असं प्रत्येकालाच वाटत असतं. पण त्यासाठी योग्य ती काळजी घेतली नाही. मग शेवटी सर्वाचं लक्ष जात ते डाएटवर. पण तसं पाहायला गेलं तर व्यस्त आणि धावपळीच्या आयुष्यात आपण कधी आणि काय खातो याकडे लक्ष देणं तसं कठीणच जातं. तसंच आपण कशाप्रकारे खातो याकडे लक्ष देणंही सहसा जमत नाही. डाएट करणं तशी सोपी गोष्ट नाही, पण ते इतकं कठीणही नाही. डायटिंग करत असताना काही गोष्टी टाळण्याची गरज असते. त्या गोष्टी पुढीलप्रमाणे -
 
1) योग्य व्यायाम न करणे 
आपल्याला एक वर्कआऊट रुटीन तयार करण्याची गरज आहे जेणेकरुन आपल्या दैनंदिन जीवनात कोणताही बदल करता आपल्या रोजच्या टाईमटेबलमध्ये त्याचा समावेश होऊ शकतो. पुर्णवेळ नोकरी करताना शरिराची काळजी घेणं आणि फिट राहणं तसं कठीणच आहे. अनेकदा दिवसभर ऑफिसमध्ये काम केल्यानंतर घरी थकून भागून आल्यावर जिममध्ये जाण्यास वेळ मिळतच नाही. खरंतर फक्त 30 मिनिटांचा वर्कआऊट आपल्याला निरोगी ठेवण्यासाठी खूप आहे. त्यामुळे असा वर्कआऊट प्लान करणं आपल्या फायद्याचं आहे. 
 
2) घाई-घाईत जेवणे
जेव्हा तुम्ही जेवता तेव्हा पोट भरलं आहे की नाही हे समजण्यासाठी आपल्या मेंदूला 20 मिनिटांचा वेळ लागतो. त्यामुळे नेहमी जेवताना हळू हळू जेवलं पाहिजे जेणेकरुन आपल्या मेंदूला पोट भरल्याचा सिग्नल देण्यासाठी वेळ मिळेल. घाई घाईत खाल्याने पोट जास्त भरतं आणि वजन वाढतं. घाई घाईत जेवणारे शरिराने जाड असणं गरजेचं नाही, पण त्यांना अपचन सारख्या समस्या जाणवू शकतात. 
 
3) ब्रेकफास्ट न करणे 
ब्रेकफास्ट हा आहारातील एक अत्यंत महत्वाचा भाग आहे. रात्रभर निद्रावस्थेत असल्याने आपलं शरीर फार थकलेलं असतं, त्यामुळे त्याला भूक लागलेली असते. ती मिटवण्यासाठी ब्रेकफास्ट करणं गरजेचं आहे. सोबतच आपल्या दिवसाची सुरुवात एनर्जी आणि न्यूट्रीशनसोबत होते. ब्रेकफास्ट सोडल्यास सकाळच्या वेळी थकवा जाणवतो आणि त्यामुळे स्नॅक्स आणि कॅलरीज घेतल्या जातात. जे लोक चांगला ब्रेकफास्ट करतात ते दिवसाला कमी जेवतात. 
 
4) जास्त कॅलरीज कमी करणे
कॅलरीज कमी केल्याने वजन कमी होतं, पण त्यांचं प्रमाण जास्त झालं तरी त्याचा वजन कमी करण्यात काहीही फायदा होत नाही. याचा उलटा परिणाम होण्याची शक्यता असते. कॅलरीज मोठ्या प्रमाणात कमी केल्याने वजन वाढतं. आपल्या शरिराला एका बेसलाईन कॅलरीज लेव्हलची गरज असते जेणेकरुन बेसिक फिजिऑलॉजिकल फंक्शन्स कायम राहावेत.  जर तुम्ही या बेसलाईनच्या खाली गेलात तर तुमचा मेटाबॉलिजम कमी होतो. जर तुम्ही अत्यंत लो कॅली डाएट घेत असाल तर तुमचा मेटाबॉलिक रेट डाएट घेतल्यानंतर 48 तासांच्या आता 10 टक्क्यांनी कमी होतो. 
 
5) गरजेइतकं पाणी न पिणे 
शरीराला पाण्याची गरज असते, त्याशिवाय काही प्रक्रिया पुर्ण होत नाहीत. पाणी किती प्यावं यावर वाद-विवाद चर्चा होऊ शकते, पण आपल्या शरिराला पाण्याची गरज असते इतकं मात्र नक्की. थोड्याश्या डिहायड्रेशनमुळेही तुमचा मेटाबॉलिजम 3 टक्क्यांनी खाल येतो. जर तुम्ही डाएटवर असाल तर कमी पाणी पिणं टाळा. 
 
6) लिक्विड डाएट
लिक्विड कॅलरीज फळांच्या रसमधून मिळत असल्या तरी त्या फक्त कॅलरीज आहेत. फळांच्या रस पोषक असतो मात्र त्यामध्ये फायबरचा अभाव असतो. यामधून आपल्या रक्तात हलकी साखर मिसळली जाते. क्रीम, साखर असणारं पेय, कॉफी, सोडा असणारे पेय याच्यामध्ये खूप कॅलरीज असतात ज्या तुमच्या डाएटसाठी अजिबात फायद्याच्या नसतात. जर वजन कमी करायचं असेल तर पाण्याची मदत घेणं सर्वोत्तम.
 
7) तणावात जेवणे
दुखी: किंवा तणावात असताना जेवल्याने डाएट आणि कॅलरीजचं संतुलन बिघडतं. जेव्हा तुम्ही तणावात असता तेव्हा तुम्ही जंक आणि आरोग्यासाठी योग्य नसलेले स्नॅक्स खाता. तणावात जेवल्याचा तुमच्या वेस्टलाईनवर नकारार्थी प्रभाव पडतो. पुर्ण झोप आणि निरोगी अन्नसेवन करणं नेहमी फायद्याचं असतं.