शहरं
Join us  
Trending Stories
1
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
2
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
3
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
5
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
6
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
7
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
8
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
9
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
10
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
11
अमेरिकेत भेटलेल्या तरुणाच्या घरी पहाटेच पोहोचले राहुल गांधी; भारतातील बेरोजगारीला कंटाळून तरुणाने अमेरिकेत केली होती घुसखोरी
12
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
13
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
14
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
15
आयटीवाल्यांना पुढील वर्षी भरभरून पगारवाढ नाहीच; आघाडीच्या कंपन्या देणार ५ ते ८ टक्के वाढ
16
सणासुदीच्या तोंडावर तेल महागाईची चाहूल; अनेक जीवनावश्यक वस्तू चढ्या दराने
17
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
18
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
19
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
20
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी

बळीरामपेठेतील हॉकर्सचा मनपात तीन तास ठिय्या आयुक्तांनी नाकारले निवेदन: सुनावणीकडे पाठ फिरविल्याने कोर्टात बाजू मांडण्याचा दिला सल्ला

By admin | Published: July 08, 2016 9:17 PM

जळगाव: बळीरामपेठेतील हॉकर्सची ५ रोजी सुनावणी घेऊन त्यांना ओटे ताब्यात देण्याचे आदेश उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने ४ रोजी झालेल्या सुनावणीप्रसंगी दिले होते. मात्र त्या सुनावणीकडे पाठ फिरविणार्‍या २००च्या आसपास हॉकर्सनी शुक्रवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास मनपात ९व्या मजल्यावर ठिय्या देत सुनावणी घेण्याची मागणी केली. मात्र तब्बल तीन तास ठिय्या दिल्यानंतर आयुक्तांनी दोन मिनिटे या शिष्टमंडळाशी चर्चा केली. त्यात हॉकर्सचे निवेदन घेण्याचे नाकारत त्यांना कोर्टातच याबाबत आता बाजू मांडण्याची सूचना आयुक्तांनी केली.

जळगाव: बळीरामपेठेतील हॉकर्सची ५ रोजी सुनावणी घेऊन त्यांना ओटे ताब्यात देण्याचे आदेश उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने ४ रोजी झालेल्या सुनावणीप्रसंगी दिले होते. मात्र त्या सुनावणीकडे पाठ फिरविणार्‍या २००च्या आसपास हॉकर्सनी शुक्रवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास मनपात ९व्या मजल्यावर ठिय्या देत सुनावणी घेण्याची मागणी केली. मात्र तब्बल तीन तास ठिय्या दिल्यानंतर आयुक्तांनी दोन मिनिटे या शिष्टमंडळाशी चर्चा केली. त्यात हॉकर्सचे निवेदन घेण्याचे नाकारत त्यांना कोर्टातच याबाबत आता बाजू मांडण्याची सूचना आयुक्तांनी केली.
मनपाने शहरातील सर्व प्रमुख वर्दळीच्या रस्त्यावरील हॉकर्सचे सवार्ेच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार स्थलांतर करून रस्ते वाहतुकीसाठी मोकळे करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार शिवाजीरोड, गोलाणी मार्केटसमोरील रस्ता, सुभाष चौक रस्ता आदी प्रमुख रस्त्यांवरील हॉकर्सचे स्थलांतर करण्यात आले. मात्र बळीरामपेठेतील हॉकर्सचे गोलाणीतील ओट्यांवर स्थलांतर करण्यात येणार असताना या हॉकर्सनी त्याविरोधात न्यायालयात धाव घेतली. जिल्हा न्यायालयाने दावा फेटाळल्याने उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात अपिल केले. त्यात ४ जुलै रोजी झालेल्या सुनावणी खंडपीठाने मनपाला ५ रोजी या हॉकर्सची सुनावणी घेऊन मनपाने आधी पाडलेल्या लॉटनुसार या हॉकर्सला गोलाणीतील ओटे ताब्यात देण्याचे व त्याचा अहवाल १३ जुलै रोजी न्यायालयात सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार मनपाने तातडीने ५रोजी शहर अभियंतांना प्राधिकृत करीत त्यांच्या ९व्या मजल्यावरील दालनात सकाळी ११ ते २ या वेळात या हॉकर्सची सुनावणी ठेवण्यात आली होती. त्याबाबत हॉकर्सला लाऊडस्पीकरवरून आवाहनही करण्यात आले होते. मात्र त्याकडे हॉकर्सने पाठ फिरविली.
जमावबंदी असल्याने फिरविली पाठ
याबाबत हॉकर्स असोसिएशनचे खजिनदार रवी महाजन यांनी सांगितले की, ४ रोजी रात्रीपर्यंत जळगावात आल्यानंतर ५ रोजीच्या सुनावणीसाठी सर्व हॉकर्सला निरोप देणे शक्य नव्हते. तरीही ५रोजी सकाळी १० वाजता पदाधिकारी मनपात आले. मात्र त्यांना पावत्या व नोटरी आदी कागदपत्रे आणण्याचे सांगण्यात आले. त्यातच ईदमुळे जमावबंदी आदेश होता. त्यामुळे ८रोजी हॉकर्स मनपात येईल, असे सांगितले होते, असा दावा महाजन यांनी केला.
हॉकर्सचा दावा खोटा
शहर अभियंता दिलीप थोरात यांना याबाबत विचारणा केली असता त्यांनी हॉकर्सचा दावा खोटा असल्याचे सांगितले. ५ रोजीची सुनावणी न्यायालयाच्या आदेशाने घेण्यात आली. त्यास हॉकर्सने एकेक करून यायचे होते. त्यामुळे जमावबंदीचा विषयच नव्हता,असे स्पष्ट केले.