शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत हायअलर्ट! धार्मिक स्थळे दहशतवाद्यांच्या निशाण्यावर; पोलीस सतर्क, चोख बंदोबस्त
2
निर्मला सीतारामन यांच्याविरोधात FIR दाखल करा; न्यायालयाचे आदेश, खंडणी प्रकरण काय?
3
"आम्ही योग्य बँकर निवडला नाही..," Paytm च्या फ्लॉप IPO वर शर्मा यांनी सांगितली कुठे झाली चूक
4
सदस्य नोंदणीत टार्गेट अपूर्ण, भाजपा नेतृत्व नाराज; पक्षातील नेत्यांची कानउघडणी
5
Babita Phogat : विनेशच्या राजकारणावर नाही तर 'या' गोष्टीमुळे महावीर फोगाट नाराज, बबिताने सांगितलं मोठं कारण
6
"मी जिंकेल याची 100 टक्के खात्री नव्हती", सुप्रिया सुळेंचं निवडणुकीबद्दल विधान
7
पितृपक्ष: घरात पुरुष नाही, मग श्राद्ध कुणी करावे? महिलांना आहे का अधिकार? शास्त्र सांगते...
8
हत्येचा आरोप अन् सुरक्षा! शाकिबच्या अडचणी वाढल्या; बांगलादेश क्रिकेट बोर्डानं स्पष्टच सांगितलं
9
आयफोन बनवणाऱ्या टाटा इलेक्ट्रॉनिक कंपनीत भीषण आग; १५०० कामगारांना काढलं बाहेर
10
देश सोडला, भारतात आली, ओळख लपवली...; एडल्ट स्टार बन्ना शेख कशी बनली रिया बर्डे?
11
'डॉली चायवाला'ची क्रेझ! भारताच्या हॉकी संघाकडे केलं दुर्लक्ष; खेळाडूंनी व्यक्त केली खंत
12
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या एन्काउंटर प्रकरणी सुप्रीम कोर्टात याचिका
13
"दिवट्या आमदार...", पोर्शे प्रकरणावरून सुनील टिंगरे शरद पवारांच्या 'रडार'वर!
14
अत्याचारी राक्षस पुन्हा नको, यासाठी माझी लढाई; उमेश पाटील करणार NCP ला रामराम?
15
Musheer Khan Accident: टीम इंडियाचा क्रिकेटर सर्फराज खानचा भाऊ मुशीरचा अपघात
16
Solar Eclipse 2024: सूर्यग्रहण भारतातून दिसणार नाही पण परिणाम होतो हे नक्की; जाणून घ्या उपाय!
17
पितृपक्ष: चतुर्दशी श्राद्ध एवढे महत्त्वाचे का? केवळ ‘या’ पितरांचा करतात विधी; पाहा, मान्यता
18
काश्मीरच्या कुलगाममध्ये दहशतवाद्यांशी चकमक; 3 जवान जखमी, सर्च ऑपरेशन सुरू
19
Indira Ekadashi 2024: नोकरी व्यवसायात यशप्राप्तीसाठी आज इंदिरा एकादशीला करा 'हे' खास उपाय!
20
"मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनामागील सूत्रधार..."; नरेंद्र पाटलांचा गंभीर आरोप

सत्तासंघर्षाची सुनावणी आता २९ नोव्हेंबरला; दोन्ही बाजूंच्या वकिलांशी चर्चा करुन निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: November 02, 2022 6:29 AM

सध्याच्या स्थितीमुळे जनतेच्या मनात अस्वस्थता असून, सर्वच राजकीय पक्ष ‘घटनात्मक नैतिकता’ टिकविण्यात अपयशी ठरले आहेत.

नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाबाबत सुप्रीम कोर्टात घटनापीठासमोर सुरू असलेल्या प्रकरणांची पुढील सुनावणी २९ नोव्हेंबरला होईल. सुप्रीम कोर्टाचे न्या. डॉ. धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील घटनापीठासमोर मंगळवारी सुनावणी झाली. 

या प्रकरणी आता प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते डॉ. विश्वंभर चौधरी यांनी मतदारांच्या वतीने घटनात्मक नैतिकतेचा मुद्दा उपस्थित करीत याचिका दाखल केली. त्यांच्या वतीने वकील असीम सरोदे व ज्येष्ठ विधिज्ञ अशोककुमार गुप्ता यांनी मतदारांच्या वतीने हस्तक्षेप याचिका दाखल केली. याचिकाकर्त्यांचे म्हणणे ऐकण्याची विनंती घटनापीठाने मान्य केली.

सध्याच्या स्थितीमुळे जनतेच्या मनात अस्वस्थता असून, सर्वच राजकीय पक्ष ‘घटनात्मक नैतिकता’ टिकविण्यात अपयशी ठरले आहेत.  अनेक नेत्यांनी घटनात्मक नैतिकतेचे उल्लंघन केल्याचे या सर्व घटनाक्रमात उघड झाले आहे. नेत्यांना राज्यघटनेबद्दल आता काही आस्था आहे, असे वाटत नाही, असे याचिकेत म्हटले आहे. 

याचिकाकर्त्याने ऐतिहासिक केशवानंद भारती निकालाचा दाखला यावेळी दिला. ‘घटनात्मक परंपरांचे उल्लंघन हे घटनात्मक नैतिकेतेचा भंग’ असल्याचे मत केशवानंद भारती खटल्याचा निकाल देताना कोर्टाने नोंदविले होते. घटनापीठाने यासंदर्भातील बाजू लिखित स्वरूपात मांडण्याची सूचना केली. दोन्ही बाजूंच्या वकिलांनी सहमतीने चर्चा करून जे महत्त्वाचे मुद्दे आहेत ते लिखित स्वरूपात द्यावेत, अशी सूचना घटनापीठाने केली. यासाठी घटनापीठाने चार आठवड्यांचा वेळ दिला.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार