शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआकडून लाडकी बहीण योजनेच्या कालावधीबाबत शंका; देवेंद्र फडणवीस ठामपणे म्हणाले...
2
भारतविरोधी षड्यंत्रात काँग्रेस सामील; समाजाला कमकुवत करण्याचा प्रयत्न, PM मोदींचा घणाघात
3
भक्तांसाठी आनंदाची बातमी: निमगाव खंडोबा क्षेत्र विकासासाठी २४ एकर जमीन; शासन निर्णय जारी 
4
"सकाळी नऊ वाजताचा भोंगा, रात्रीच तयारी करून बसला होता"; फडणवीसांनी राऊतांना डिवचलं
5
धक्कादायक! प्रेमाच्या त्रिकोणातून तरुणीने केली तरुणीची हत्या
6
"खोट्याच्या कडू घोटावर विकासाची गॅरंटी भारी पडली’’, हरयाणातील विजयानंतर मोदींचा टोला 
7
वडील-काकाची दहशतवाद्यांनी केलेली हत्या; मुस्लिमबहुल मतदारसंघातून शगुन परिहार विजयी
8
"हरयाणात भाजपा EVMमध्ये छेडछाड करून जिंकला, हा निकाल मान्य नाही’’, काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया
9
हरयाणात झाली रोमांचक लढत, अवघ्या ३२ मतांनी फैसला, अखेरीस जिंकलं कोण? पाहा 
10
"...यामुळेच हा ऐतिहासिक विजय झाला"; हरयाणाच्या निकालावर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया
11
Haryana Assembly Election Results 2024 : दिल्लीच्या जवळपास कमळाची कमाल, आम आदमी पार्टी बेहाल; डिपॉझिटही वाचलं नाही!
12
J&K मध्ये फुटीरतावादाचा सुपडा साफ, एआयपी आणि जमात-ए-इस्लामीला मतदारांनी नाकारले
13
हरयाणा निवडणुकीचे 'मॅन ऑफ मॅच' ठरलेल्या CM नायबसिंग सैनी यांची संपत्ती किती?
14
Ola नंतर Ather नं इलेक्ट्रिक स्कूटरच्या किंमती केल्या कमी, आता स्वस्तात खरेदी करण्याची संधी!
15
जुन्नरमध्ये आयात उमेदवाराच्या हाती तुतारी दिल्यास बंड अटळ?; मविआतील नाराज निष्ठावंतांच्या गोटात हालचालींना वेग
16
गेल्या महिन्यात कोणत्या कंपनीनं सर्वाधिक विकल्या Electric Scooters?
17
"महाराष्ट्रातील जनताही अशा फेक..."; हरयाणातील निकालानंतर CM शिंदेंचा MVA वर 'वार'
18
"आपण तर खरोखरच मोठी 'पनौती' निघालात, हुड्डांनाही..."; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा राहुल गांधींवर निशाणा
19
बुलेट ट्रेन जितकी खास, तितकीच स्टेशनही... वीज बचत अन् प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य!
20
नायब सिंह सैनींनी मारली बाजी; विजयादशमीला घेऊ शकतात मुख्यमंत्रीपदाची शपथ?

चिंताजनक! भारतातील 90% लोकांना छळणार उष्णतेची लाट! केंब्रिज विद्यापीठाचा अहवाल; मृत्यूचे प्रमाण वाढण्याची भीती

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2023 5:27 AM

Heat wave In India: हवामान बदलामुळे तसेच उसळलेल्या उष्णतेच्या लाटेमुळे भारतातील ९० टक्के लोकांना सार्वजनिक आरोग्याचे प्रश्न भेडसावतील. तसेच देशात अन्नधान्य टंचाईचे प्रश्न निर्माण होतील.

लंडन : हवामान बदलामुळे तसेच उसळलेल्या उष्णतेच्या लाटेमुळे भारतातील ९० टक्के लोकांना सार्वजनिक आरोग्याचे प्रश्न भेडसावतील. तसेच देशात अन्नधान्य टंचाईचे प्रश्न निर्माण होतील. या गोष्टींमुळे मृत्यूच्या प्रमाणात वाढ होण्याची भीती असल्याचे ब्रिटनमधील केंब्रिज विद्यापीठाने एका अहवालात म्हटले आहे. पीएलओएस क्लायमेट या नियतकालिकात हा अहवाल प्रसिद्ध झाला आहे. यासंदर्भात संशोधक रमित देबनाथ यांनी सांगितले की, उष्णतेच्या तीव्र लाटेचा भारताच्या कोणत्या भागावर, तेथील लोकांवर काय परिणाम होतो याचा अभ्यास क्लायमेट व्हल्नेरॅबिलिटी इंडिकेटरच्या मदतीने करता येतो. 

लोकांचे हालल्ली तसेच आणखी काही भागांमध्ये उष्णतेच्या लाटांचा मोठा परिणाम आढळतो. उकाड्यापासून वाचण्यासाठी अनेकांकडे पंखा, एसी अशा सुविधा असतात. पण ज्यांच्याकडे साध्या पंख्याचीही सुविधा उपलब्ध नाही अशा लोकांचे उन्हाळ्यात विलक्षण हाल होतात. 

उष्णतेची लाट वाढणारगेल्यावर्षी हवामान बदलामुळे उष्णतेची लाट आली होती. त्याचे परिणाम अद्यापही जाणवत आहेत. उष्णतेची लाट नजीकच्या काळात आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.

शाश्वत विकासात पिछाडीशाश्वत विकास साधण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या देशांच्या क्रमवारीत गेल्या दोन दशकांत भारताची घसरण झाली आहे. संयुक्त राष्ट्रांनी शाश्वत विकासासाठी निश्चित केलेल्या १७ पैकी ११ उद्दिष्टांची भारताने पूर्तता केलेली नाही, असेही केंब्रिज विद्यापीठाने या अहवालात म्हटले.

३० कोटी भारतीयांच्या आयुष्यावर परिणाम?n उष्णतेच्या लाटांचा २०५० सालापर्यंत ३० कोटी भारतीयांच्या आयुष्यावर विपरित परिणाम होईल. n २१०० पर्यंत ६० कोटी भारतीयांच्या जीवनमानाचा दर्जा उष्णतेच्या लाटांच्या तडाख्याने खालावेल, असा अंदाज आहे.

टॅग्स :weatherहवामानHeat Strokeउष्माघातIndiaभारत