शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी
2
टँकर अचानक खड्ड्यात! सुदैवानं चालक बचावला, पुण्यातील 'त्या' घटनेमागचं कारण आलं समोर
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
4
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
5
लाचखोर वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात; पाच हजार रूपयांची लाच भोवली!
6
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
7
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
8
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
9
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
10
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
11
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
12
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
13
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
14
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
15
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
16
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
17
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
18
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
19
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई
20
पुरी जोधपूर एक्सप्रेसमधून पाच लाखांचा सुमारे ३३ किलो गांजा जप्त; अल्पवयीन आरोपी जेरबंद

उत्तराखंड, हिमाचल अन् दिल्लीत पावसाचे थैमान; यमुनेसह बहुतेक नद्यांना उधाण, अनेकांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2023 8:45 AM

दिल्लीत अनेक ठिकाणी सोमवारी शाळांना सुटी देण्यात आली. 

नवी दिल्ली: उत्तर भारतात मुसळधार पावसाने अक्षरश: थैमान घातले आहे. दिल्ली, हिमाचल, उत्तराखंडसह देशातील उत्तरेकडील राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. दिल्लीत पावसाने ४१ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला. १९८२ पासून जुलैमध्ये एकाच दिवसात सर्वाधिक १५३ मिमी पाऊस झाला. देशभरात पावसामुळे झालेल्या विविध दुर्घटनांत लष्कराच्या दोन जवानांसह १६ जणांचा मृत्यू झाला. यमुनेसह बहुतेक नद्यांना उधाण आले आहे. दिल्लीत अनेक ठिकाणी सोमवारी शाळांना सुटी देण्यात आली. 

उत्तराखंडची परिस्थिती सुद्धा सारखीच आहे. राज्यात गेल्या २४ तासांत सरासरीपेक्षा २.५ ते ३ पट जास्त पाऊस झाला आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. अनेक ठिकाणी दरड कोसळल्याने रस्ते बंद झाले असून त्यामुळे जनजीवन विस्कळीत होत असून चार धाम यात्रेलाही अडथळा निर्माण होत आहे. खराब हवामानाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना देत लोकांना अनावश्यक हालचाली टाळण्यास सांगितले.

हिमाचल प्रदेशात भूस्खलनामुळे २५० हून अधिक रस्ते बंद झाले आहेत. अनेक ठिकाणी वाहने वाहून गेली. कोटगढच्या माधवनी पंचायतीच्या पानेवली गावात एका घरावर दरड कोसळल्याने तिघांचा मृत्यू झाला, इतर दोन दुर्घटनांत दोघांचा मृत्यू झाला. पुरामुळे अनेक ठिकाणचे पूलही वाहून गेले आहेत. उत्तर रेल्वेनुसार सुमारे १७ गाड्या रद्द करण्यात आल्या, तर बारांचा मार्ग वळवण्यात आला. हिमाचल प्रदेशातील कांगडा, चंबा, हमीरपूर, कुल्लू, मंडी येथे मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. सोलन, शिमला, सिरमौरमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून लाहौल स्पितीमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. लाहौल स्पितीच्या लोसारमध्ये हिमवृष्टीमुळे तापमानात मोठी घट नोंदवण्यात आली आहे.    

यमुनेच्या पाण्याची पातळी झपाट्याने वाढत आहे

राजधानीत यमुनेच्या पाण्याची पातळी झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे दिल्लीच्या जुन्या लोखंडी पुलाजवळ यमुना धोक्याच्या चिन्हाजवळ पोहोचली आहे. केंद्रीय जल आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारी १ वाजता यमुनेची पाण्याची पातळी २०३.१८ मीटर होती. इशारा पातळी २०४.५ मीटर आहे, जी मंगळवारी २०५.३३ मीटर पार करेल. त्यामुळे राजधानीतील सखल भागात पुराचा धोका वाढला असून त्यामुळे येथील सुमारे ३७ हजार लोक प्रभावित होऊ शकतात. दुसरीकडे हरियाणातून आणखी पाणी सोडल्यास परिस्थिती आणखी बिघडू शकते.   

यात्रेकरूंची जीप नदीत पडली

ऋषिकेश-बद्रीनाथ राष्ट्रीय महामार्गावर गुलरजवळ दरड कोसळल्याने तीन भाविकांची जीप नदीत पडल्याने गंगेत बुडाले. राज्य आपत्ती प्रतिसाद दल आणि पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, जीपमध्ये ११ जण होते. त्यांनी सांगितले की, पाच जणांना वाचवण्यात यश आले आहे, तर इतर तिघांचा शोध सुरू असून बचाव कर्मचार्‍यांनी तीन मृतदेह बाहेर काढले आहेत. राज्याच्या काशीपूर भागात दोन घरे कोसळून एका जोडप्याचा मृत्यू झाला, तर त्यांची नात जखमी झाली, तर उत्तरकाशी जिल्ह्यातील बरकोट येथील यमुनोत्री राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक व्यवस्थापनात गुंतलेल्या एका पोलिसाचा डोंगरावरून पडलेल्या दगडाचा धक्का लागून मृत्यू झाला. 

टॅग्स :RainपाऊसHimachal Pradeshहिमाचल प्रदेशUttarakhandउत्तराखंडdelhiदिल्ली