शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

CoronaVirus: पंतप्रधान मोदी केवळ ‘मन की बात’ करतात, ‘काम की बात’ नाही; हेमंत सोरेन यांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2021 11:08 IST

CoronaVirus: झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी केलेले एक ट्विट चर्चेचा विषय ठरत आहे.

ठळक मुद्देहेमंत सोरेन यांची पंतप्रधान मोदींवर टीकापंतप्रधान मोदी केवळ ‘मन की बात’ करतात, ‘काम की बात’ नाहीपंतप्रधान मोदींची फोन पे चर्चा

रांची: देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे थैमान सुरू आहे. कोरोनाबाधितांची संख्या नवीन उच्चांक गाठत असताना कोरोनामुळे होणारे मृत्यूही वाढताना पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर अनेक राज्यांचे मुख्यमंत्री पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करतायत. कोरोनावर नियंत्रण मिळवण्याबाबत काय उपाययोजना करता येतील, याबाबतही मते, सूचना, सल्ला यांचे आदान-प्रदान केले जाते. मात्र, आता झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी केलेले एक ट्विट चर्चेचा विषय ठरत आहे. (hemant soren criticised pm modi over corona situation) 

मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी ट्विटवर पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा केल्यासंदर्भात माहिती दिली. मात्र, यावेळी त्यांनी मोदींना खोचक टोला लगावला. आदरणीय पंतप्रधानांसोबत फोनवरून चर्चा झाली. पंतप्रधानांनी केवळ मन की बात केली. पंतप्रधानांनी काम की बात केली असती आणि ऐकली असती, तर फार चांगले झाले असते, असा खोचक टीका हेमंत सोरेन यांनी केली आहे. 

पंतप्रधान मोदींची फोन पे चर्चा

कोरोनाच्या गंभीर परिस्थितीसंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी अनेक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत फोनवरून चर्चा केली. यामध्ये झारखंड, आंध्र प्रदेश, तेलंगण यासह अनेक राज्यांचा समावेश होता. छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनीही यापूर्वी पंतप्रधान मोदींवर यासंदर्भात टीका केली होती. पंतप्रधानांसोबतची चर्चा केवळ वन-वे असते. आमच्या प्रश्नांची उत्तरे मिळत नाही, अशी टीका बघेल यांनी केली होती. 

...तर कोरोना रुग्णांना काळ्या बुरशीच्या आजाराचा धोका; टास्क फोर्स प्रमुखांकडून खबरदारीचा इशारा

केंद्र मदत करत नाही

केंद्र सरकारकडून अपेक्षित मदत केली जात नाही, असा आरोप झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी केला आहे. केंद्राकडून ५० हजार रेमडेसिवीर इंजेक्शनची मागणी केली होती. मात्र, केवळ २ हजार १८१ इंजेक्शन देण्यात आली, असा दावा यावेळी करण्यात आला. बांगलादेशमधून रेमडेसिवीर इंजेक्शन आयात करण्याची परवनागी मागितली होती. परंतु, त्यावरही अद्याप काहीच उत्तर आले नाही, असेही सोरेन यांनी सांगितले. 

लसीकरण कार्यक्रमाबद्दल अत्यंत असमाधानी: टास्क फोर्सच्या प्रमुखांचे स्पष्ट मत

दरम्यान, गेल्या २४ तासांत देशात ४ लाख १४ हजार १८८ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. सलग ११ व्या दिवशी तीन हजारांहून अधिक बळींची नोंद करण्यात आली आहे.  आतापर्यंत २ लाख ३४ हजार ८३ जणांनी कोरोनामुळे आपले प्राण गमावले आहेत. देशात सध्या ३६ लाख ४५ हजार १६४ रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत. देशात आतापर्यंत १६ कोटी ४९ लाख ७३ हजार ५८ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसprime ministerपंतप्रधानNarendra Modiनरेंद्र मोदीJharkhandझारखंडremdesivirरेमडेसिवीरPoliticsराजकारण