शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
2
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
3
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
4
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ
5
या गावातील प्रत्येकाकडे स्वतःचे विमान; साखर-चहा पत्ती आणण्यासाठी विमानाचा वापर, कारण...
6
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु
7
"मुलाच्या फीससाठी लोकांसमोर हात पसरावे लागले", मनीष सिसोदियांनी सांगितला 'तो' प्रसंग
8
कामगिरी सुधारण्यासाठी पाकिस्तानची वेगळी 'रणनीती', पाकिस्तान क्रिकेट बोर्ड लागले कामाला
9
सावधान! ऑफिस असो किंवा वर्क फ्रॉम होम; सतत खुर्चीवर बसणं खतरनाक, 'या' आजारांचा धोका
10
चंद्राबाबू नायडूंनी TTD वर केलेले आरोप बिनबुडाचे, त्यांच्यावर कारवाई व्हावी, जगनमोहन रेड्डींचं PM मोदींना पत्र 
11
Mamata Banerjee : "पश्चिम बंगालमधील पूर मानवनिर्मित, DVC ने न सांगता सोडलं पाणी"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
12
इराणच्या कोळसा खाणीत गॅस गळतीनंतर भीषण स्फोट; ५१ जणांचा मृत्यू
13
भारताला अमेरिका देणार 31 किलर ड्रोन्स; नरेंद्र मोदी आणि जो बायडेन यांच्यात 'डील डन'
14
सत्ता कुणाचीही येऊ देत, रामदास आठवलेंची जागा पक्की आहे- नितीन गडकरी
15
'यूपीआय'मध्ये मार्केटमध्ये PhonePe सुसाट! Google Pay, Paytm किती मागे?
16
video: दोन लाख रुपये देऊन बिहारचा तरुण बनला 'IPS' अधिकारी; पाहून पोलीसही चक्रावले...
17
"आम्ही कुणालाही सोडणार नाही!’’, तिरुपती लाडू भेसळीप्रकरणी आंध्र प्रदेश सरकार आक्रमक   
18
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोनाचा 'हा' नवा व्हेरिएंट किती खतरनाक, भारताला कितपत धोका?
19
"तुम्हाला दुःख झाले नाही का? देशाला सांगा", केजरीवालांचे मोहन भागवतांना पाच सवाल
20
IND vs BAN : "मला कोणी गिफ्ट दिलं नाही...", 'सामनावीर' अश्विनची मिश्किल प्रतिक्रिया, संघाला जिंकवलं

हाय अॅलर्ट ! देशात घुसले 25 दहशतवादी, 26/11सारखा हल्ला करण्याचा कट

By admin | Published: May 30, 2017 12:29 PM

लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेकडून देशात 26/11 मुंबई हल्ल्याप्रमाणे घातपात करण्याचा मोठा कट रचला जात आहे.

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. 30 - सीमा रेषेवर घुसखोरीच्या प्रयत्नात असलेल्या दहशतवाद्यांना 27 मे रोजी यमसदनी धाडले.  काश्मीर खोऱ्यात 24 तासांत तीन वेगवेगळ्या चकमकींमध्ये 10 दहशतवाद्यांना ठार करण्यात आले, त्यात गेल्या वर्षी चकमकीत ठार झालेल्या बुरहान वानीची साथीदार व हिजबुल मुजाहिद्दीनचा कमांडर  सबजार अहमद भट्ट हाही ठार झाला होता.
 
यामुळे बिथरलेल्या लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेकडून देशात 26/11 मुंबई हल्ल्याप्रमाणे घातपात करण्याचा मोठा कट रचला जात आहे. गुप्तचर सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, लष्कर-ए-तोयबाचे जवळपास 20 ते 25 दहशतवादी मोठा रक्तपात घडवण्यासाठी देशात घुसले आहेत. 
 
मिळालेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांकडून रेल्वे स्टेशन, विमानतळ, हॉटेल, पर्यटन स्थळं आणि मॉल्स यांसारख्या गजबजलेल्या ठिकाणांना टार्गेट केले जाण्याची शक्यता आहे. 
 
या पार्श्वभूमीवर सुरक्षा यंत्रणांकडून सर्व रेल्वे स्टेशन आणि विमानतळांवर हायअॅलर्ट जारी करण्यात आला आहे. पाकिस्तान सीमेशेजारी असणा-या राज्यांतही सुरक्षा यंत्रणांनी सुरक्षा व्यवस्थेत वाढ केली आहे. 
 
गृह मंत्रालयाकडून मिळालेल्या संदेशानुसार, सर्व सुरक्षा दलांनाही सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 
पाकिस्तानमधील ""लष्कर ए तोयबा""चे दहशतवादी दिल्ली व मुंबईमध्ये किंवा पंजाब आणि राजस्थानच्या सीमावर्ती भागात हल्ला करू शकतात, असा इशारा गुप्तचर संस्थांनी दिला आहे. तोयबाचे २० ते २१ हस्तक भारतात असावेत. दहशतवादी आत्मघाती बॉम्बस्फोट घडवून आणण्याची भीतीही व्यक्त होत आहे.