शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी
2
टँकर अचानक खड्ड्यात! सुदैवानं चालक बचावला, पुण्यातील 'त्या' घटनेमागचं कारण आलं समोर
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
4
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
5
लाचखोर वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात; पाच हजार रूपयांची लाच भोवली!
6
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
7
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
8
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
9
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
10
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
11
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
12
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
13
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
14
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
15
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
16
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
17
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
18
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
19
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई
20
पुरी जोधपूर एक्सप्रेसमधून पाच लाखांचा सुमारे ३३ किलो गांजा जप्त; अल्पवयीन आरोपी जेरबंद

दिल्ली व परिसरात हाय अ‍ॅलर्ट घोषित

By admin | Published: October 02, 2016 2:43 AM

पाकव्याप्त काश्मीरमधे भारतीय सैन्य दलाने यशस्वी सर्जिकल स्ट्राइक्स केल्यानंतर नवरात्र व दिवाळीत दिल्ली व परिसरात विपरित घटना घडू नये, यासाठी केंद्रीय गृहमंत्रालयाने

- सुरेश भटेवरा, नवी दिल्ली पाकव्याप्त काश्मीरमधे भारतीय सैन्य दलाने यशस्वी सर्जिकल स्ट्राइक्स केल्यानंतर नवरात्र व दिवाळीत दिल्ली व परिसरात विपरित घटना घडू नये, यासाठी केंद्रीय गृहमंत्रालयाने हाय अ‍ॅलर्ट जारी केला असून, गर्दीची ठिकाणे, प्रमुख इमारती, मंदिरे व प्रार्थना स्थळांची सुरक्षा वाढवली आहे.सर्जिकल स्ट्राइक्सनंतर इंटेलिजन्स ब्युरोचे दिल्ली व परिसरातून होणाऱ्या तमाम फोन कॉल्सकडे लक्ष होते. आयबीच्या अहवालानुसार, सर्जिकल स्ट्राइक्सनंतर दहशतवादी खवळले असून, दिल्ली व परिसरावर त्यांची नजर आहे. दिल्लीत मोठा दहशतवादी हल्ला घडवण्याचा त्यांचा इरादा असेल. त्यामुळे राजधानी व परिसरातील बस स्टँड्स, रेल्वे स्थानके, दोन्ही विमानतळे, बाजारपेठा व प्रमुख इमारतींची सुरक्षा व्यवस्था कडक करण्याचे आदेश दिले आहेत. नवरात्र व दिवाळीत दिल्लीच्या बाजारपेठांमध्ये गर्दी असते. दहशतवादी गट अशाच ठिकाणांना लक्ष्य बनवण्याचा प्रयत्न करतात, असा पूर्वाअनुभव आहे.दिल्लीत दिवाळीत, २९ आॅक्टोबर २00५ साली लष्कर ए तोयबाने पहाडगंज, सरोजिनीनगर मार्केट व गोविंदपुरीत ३ बॉम्बहल्ले घडवले. त्यात ६२ लोक ठार, तर २१0 लोक गंभीर जखमी झाले होते. अशा हल्ल्यांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी कडक सुरक्षेचे आदेश दिले आहेत.