शहरं
Join us  
Trending Stories
1
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
2
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
3
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
5
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
6
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
7
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
8
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
9
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
10
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
11
अमेरिकेत भेटलेल्या तरुणाच्या घरी पहाटेच पोहोचले राहुल गांधी; भारतातील बेरोजगारीला कंटाळून तरुणाने अमेरिकेत केली होती घुसखोरी
12
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
13
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
14
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
15
आयटीवाल्यांना पुढील वर्षी भरभरून पगारवाढ नाहीच; आघाडीच्या कंपन्या देणार ५ ते ८ टक्के वाढ
16
सणासुदीच्या तोंडावर तेल महागाईची चाहूल; अनेक जीवनावश्यक वस्तू चढ्या दराने
17
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
18
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
19
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
20
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी

"संपूर्ण गाव डोळ्यासमोर वाहून गेलं, फक्त माझं घर उरलं पण..."; मन हेलावून टाकणारी घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: August 03, 2024 12:48 PM

शिमला जिल्ह्यातील रामपूरच्या समेज येथे अशीच एका मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. अनिता देवी यांची हृदयद्रावक घटना सर्वांच्याच डोळ्यात पाणी आणत आहे. 

हिमाचल प्रदेशमध्ये ढगफुटीमुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. या घटनेने लोकांच्या मनावर खोलवर जखमा झाल्या आहेत. काहींनी आपलं कुटुंब गमावलं आहे, तर काहींचं अख्ख गाव वाहून गेलं आहे. शिमला जिल्ह्यातील रामपूरच्या समेज येथे अशीच एका मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. अनिता देवी यांची हृदयद्रावक घटना सर्वांच्याच डोळ्यात पाणी आणत आहे. 

अनिता देवी यांनी दिलेल्या माहितीनुसार, संपूर्ण गावात आता फक्त माझंच घर राहिलं आहे. बाकी सर्व माझ्या डोळ्यासमोर वाहून गेलं. बुधवारी रात्री मी माझ्या कुटुंबासोबत झोपले होते. ढगांचा गडगडाट झाला आणि घर हादरलं. काही लोक धावत आमच्या घराकडे आले. बाहेर पाहिलं तर संपूर्ण गाव वाहून गेल्याचे दिसलं. आम्ही घरातून निघालो आणि गावातील भगवती काली माता मंदिरात गेलो आणि संपूर्ण रात्र तिथेच घालवली.

समेज गावातील बक्शी राम यांनी पाणावलेल्या डोळ्यांनी सांगितलं की, त्यांच्या कुटुंबातील १४ ते १५ जण पुरात वाहून गेले आहेत. रात्री दोन वाजता घटनेची माहिती मिळाली. समेजमध्ये पूर आला होता, मी रामपूरला होतो. त्यामुळेच मी वाचलो आहे. पहाटे चार वाजता येथे पोहोचलो तेव्हा सगळं संपलं होतं. आता मी माझ्या कुटुंबातील सदस्यांचा शोध घेत आहे. अजूनही मदतकार्य सुरू आहे. 

बुधवारी रात्री राज्यातील कुल्लू, मंडी आणि शिमला या तीन जिल्ह्यांमध्ये ढगफुटी झाली होती. त्यानंतर अचानक पूर आला. या दुर्घटनेत आतापर्यंत आठ जणांचा मृत्यू झाला आहे. तर या तीन जिल्ह्यांत ढगफुटीमुळे आलेल्या पुरानंतर ४९ लोक बेपत्ता आहेत. त्यांच्या शोधासाठी बचाव कर्मचाऱ्यांनी ड्रोन तैनात केले आहेत. एनडीटीव्हीने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

टॅग्स :Himachal Pradesh Rainsहिमाचल प्रदेश पूरfloodपूरRainपाऊस