शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
2
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
3
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
4
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
5
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
7
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
8
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
9
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
10
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
11
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
12
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
13
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
14
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
15
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
16
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
17
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
18
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
19
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
20
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन

राहुल गांधींच्या केंब्रिजमधील भाषणाची हिमंता बिस्वा सरमांकडून चिरफाड, प्रत्येक आरोपाला दिलं उत्तर, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2023 10:48 IST

Himanta Biswa Sarma Vs Rahul Gandhi: भाजपाचे फायरब्रँड नेते, आसामचे मुख्यमंत्री आणि राहुल गांधींचे कडवे विरोधत हिमंता बिस्वा सरमा यांनी राहुल गांधींच्या केंब्रिजमधील भाषणावर जोरदार पलटवार केला आहे.

लंडनमधील केंब्रिज विद्यापीठामध्ये काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केलेल्या भाषणावरून आता वादाला तोंड फुटले आहे. त्यातच आता भाजपाचे फायरब्रँड नेते, आसामचे मुख्यमंत्री आणि राहुल गांधींचे कडवे विरोधत हिमंता बिस्वा सरमा यांनी राहुल गांधींच्या केंब्रिजमधील भाषणावर जोरदार पलटवार केला आहे. हिमंता बिस्वा सरमा यांनी राहुल गांधींच्या प्रत्येक आरोपाला घणाघाती भाषेत प्रत्युत्तर दिलं आहे.  आधी परकीय एजंट आम्हाला लक्ष्य करायचे, आता आमचेच लोक परदेशात जाऊन आम्हाला लक्ष्य करत आहेत, केंब्रिजमध्ये जाऊन राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रतिमेवर शिंतोडे उडवण्याचं काम केलं आहे, असा टोला हिमंता बिस्वा सरमा यांनी लगावला आहे. हिमंता बिस्वा सरमा यांनी ट्विट करून लिहिलं की, राहुल गांधी म्हणालेत लोकशाही धोक्यात आहे. त्यामुळे ते आपलं म्हणणं उघडपणे मांडू शकत नाहीत.  मात्र वास्तव हे आहे की, त्यांनी ४ हजार किमी यात्रा केली. मात्र यादरम्यान, त्यांच्यासोबत कुठेही कुठल्याही प्रकारची दुर्घटना झालेली नाही. मोदी सरकारने पुरवलेल्या सुरक्षेमुळे हे शक्य झाले. मात्र काँग्रेसच्या सत्ताकाळात भाजपा नेत्यांच्या यात्रेमध्ये काय व्हायचे याची आठवण राहुल गांधींना करून दिली पाहिजे.

यावेळी पेगाससवर बोलणाऱ्या राहुल गांधींवरही हिमंता बिस्वा सरमा यांनी निशाणा साधला. राहुल गांधी म्हणतात की, त्यांच्या फोनमध्ये पेगासस सॉफ्टवेअर होता. याबाबत त्यांना एका अधिकाऱ्याने इशारा दिला होता. मग त्यांनी त्यांचा फोन सुप्रीम कोर्टाने तपासासाठी मागितल्यावर जमा का केला नाही. त्यानंतर सुप्रीम कोर्टाने पेगासस असल्याचे कुठलेही पुरावे नसल्याचा निकाल दिला होता.

दरम्यान, राहुल गांधींनी केलेल्या चीनच्या कौतुकावरूनही हिमंता बिस्वा सरमा यांनी निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, बीआरआय आज जगातील अनेक देशांमधील कर्जासाठी कारणीभूत आहे. अंकल पित्रोदा यांनी याबाबत सांगितलं नाही? राहुल गांधी यांनी लोकशाहीमध्ये मॅन्युफॅक्चरिंगबाबत प्रश्न उपस्थित केले. मात्र त्यांच्या आजी इंदिरा गांधी यांनी लोकशाहीच सस्पेंड करून ठेवली होती. तेव्हा खरोखरच मॅन्युफॅक्चरिंग वाढली नव्हती. मात्र आज नरेंद्र मोदींनी पीएलआय स्किम सुरू केली आहे. त्यामुळे ती वाढली आहे, असेही सरमा यांनी सांगितले.  

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसBJPभाजपा