शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

सरकार गेले तरी चालेल, अयोध्येत राम मंदिर हवेच! हिंदू संतांचा सरकारकडे आग्रह

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2018 07:11 IST

अयोध्येतील बाबरी मशिद-राम मंदिराच्या वादावरील सुनावणी सर्वोच्च न्यायालायने लांबणीवर टाकल्यानंतर आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी राम मंदिर उभारणीसाठी ठोस पावले टाकण्यासाठी केंद्र सरकारवर हिंदूंचा दबाव दिवसेदिवस वाढत आहे.

नवी दिल्ली : अयोध्येतील बाबरी मशिद-राम मंदिराच्या वादावरील सुनावणी सर्वोच्च न्यायालायने लांबणीवर टाकल्यानंतर आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी राम मंदिर उभारणीसाठी ठोस पावले टाकण्यासाठी केंद्र सरकारवर हिंदूंचा दबाव दिवसेदिवस वाढत आहे. ‘आता संयम संपत चालला आहे. गरज पडली तर राम मंदिरासाठी पुन्हा १९९२ प्रमाणे आंदोलन सुरु करावे लागेल’ अशी निर्वाणीची भाषा रा. स्व. संघाने केल्यानंतर आता हिंदू संतांनी सरकारला वेठीस धरले आहे.गेले दोन दिवस येथील तालकटोरा स्टेडियममध्ये भरलेल्या अखिल भारतीय संत समितीच्या अधिवेशनात देशभरातून आलेल्या तीन हजारांहून अधिक संतांनी अयोध्येतील राम मंदिराखेरीज गोरक्षा व गंगा शुद्धिकरणाची एकमुखाने मागणी केली. येत्या ६ डिसेंबरपूर्वी केंद्र सरकारनेयासाठी निर्णायक पाऊल उचलावे, असा एकूण सूर होता.अधिवेशनाचा समारोप करताना समितीचे निमंत्रक रामानंद हंसदेवाचार्य यांनी तर आवाहन न करता केंद्र सरकारने राम मंदिरासाठी येत्या अधिवेशनात कायदा करावा किंवा वटहुकूम काढावा, असा आदेशच देऊन टाकला. सध्याच्या केंद्र सरकारचे काम समाधानकारक असले तरी आगामी निवडणुकीत ‘गाय’ ‘गंगा’ व ‘गोविंद’ यांचे रक्षण करणाऱ्यांनाच जनतेने निवडून द्यावे, असे आवाहन संतांनी केले.अधिवेशनात भाषण करताना जगद््गुरु रामभद्राचार्य यांनी आक्रमक पवित्रा घेतला. ते म्हणाले की, आपलीच माणसे सत्तेवर बसवूनही ते इतरांसारखे वागतात हे पाहून धक्का बसला. अयोध्येत राम मंदिर उभे राहायलाच हवे. मग त्यासाठी (पान २ वर)मशिदीच्या आग्रहाने हिंदूंना असहिष्णू करू नकामुस्लिमांच्या मदिना शहरात एकही मंदिर नाही. ख्रिश्चनांच्या व्हॅटिकन सिटीमध्येही एकही मंदिर नाही. मग अयोध्येतील राम मंदिराशेजारी मशिद उभारण्याचा आग्रह कशासाठी? हिंदू हे जगातील सर्वातसहिष्णू आहेत.रामजन्मभूमीवर मशिदीच्या आग्रहाने त्यांना असहिष्णू व्हायला भाग पाडू नका, असे इशारावजा आवाहन केंद्रीय मंत्री उमा भारती यांनी केले. त्या म्हणाल्या की, अयोध्येतील वादग्रस्त जागा हेच प्रभू रामाचे जन्मस्थान आहे, हे निर्विवाद सत्य आहे.त्यामुळे आता तेथे मंदिरबांधणे हा श्रद्धेचा विषय नसून फक्त जमिनीचा वाद आहे. तो न्यायालयाबाहेर सोडविण्यासाठी सर्व पक्षांनी एकत्र यावे आणि खास करून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी राम मंदिराचा शिलान्यास करून त्यांच्या पक्षाने पूर्वी केलेल्या पापांचे प्रायश्चित्त घ्यावे, असेही त्या म्हणाल्या. 

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्या