शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
2
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु
3
"मुलाच्या फीससाठी लोकांसमोर हात पसरावे लागले", मनीष सिसोदियांनी सांगितला 'तो' प्रसंग
4
चंद्राबाबू नायडूंनी TTD वर केलेले आरोप बिनबुडाचे, त्यांच्यावर कारवाई व्हावी, जगनमोहन रेड्डींचं PM मोदींना पत्र 
5
Mamata Banerjee : "पश्चिम बंगालमधील पूर मानवनिर्मित, DVC ने न सांगता सोडलं पाणी"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
6
इराणच्या कोळसा खाणीत गॅस गळतीनंतर भीषण स्फोट; ३० जणांचा मृत्यू, १७ जखमी
7
भारताला अमेरिका देणार 31 किलर ड्रोन्स; नरेंद्र मोदी आणि जो बायडेन यांच्यात 'डील डन'
8
सत्ता कुणाचीही येऊ देत, रामदास आठवलेंची जागा पक्की आहे- नितीन गडकरी
9
'यूपीआय'मध्ये मार्केटमध्ये PhonePe सुसाट! Google Pay, Paytm किती मागे?
10
video: दोन लाख रुपये देऊन बिहारचा तरुण बनला 'IPS' अधिकारी; पाहून पोलीसही चक्रावले...
11
"आम्ही कुणालाही सोडणार नाही!’’, तिरुपती लाडू भेसळीप्रकरणी आंध्र प्रदेश सरकार आक्रमक   
12
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोनाचा 'हा' नवा व्हेरिएंट किती खतरनाक, भारताला कितपत धोका?
13
"तुम्हाला दुःख झाले नाही का? देशाला सांगा", केजरीवालांचे मोहन भागवतांना पाच सवाल
14
IND vs BAN 1st Test : भारताची विजयी सलामी! अश्विनचा 'षटकार', जड्डूची साथ लाखमोलाची; बांगलादेशचा करेक्ट कार्यक्रम
15
IND vs BAN : "मला कोणी गिफ्ट दिलं नाही...", 'सामनावीर' अश्विनची मिश्किल प्रतिक्रिया, संघाला जिंकवलं
16
'गोळीला गोळीनेच उत्तर देणार; कलम 370 कधीही मागे घेणार नाही', अमित शाहंची गर्जना...
17
ENG vs AUS ODI : मिचेल स्टार्कचा अप्रतिम यॉर्कर! इंग्लंडचा कर्णधार 'चारीमुंड्या चीत', Video
18
पुण्यातील नवीन विमानतळाला 'हे' नाव देण्यासाठी प्रयत्न करणार; गडकरींचं आश्वासन
19
Bengaluru Murder : फ्रीजमध्ये सर्वात खालच्या कप्प्यात होतं शिर, पोलिसांनाही फुटला घाम
20
"वर्षा उसगावकर कोण हे मला माहितच नव्हतं", निक्की पुन्हा बरळली, म्हणाली- "बिग बॉसमध्ये आल्यानंतर..."

हिंदू धर्म खराब, सत्यनारायण पूजेबाबतही माजी मुख्यमंत्र्यांचं वादग्रस्त विधान

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2021 3:34 PM

बाबासाहेब आंबेडकर यांचा दाखला देत मांझी म्हणाले की, सन 1956 मध्ये जीवनाच्या शेवटच्या काळात बाबासाहेबांनी हिंदू धर्माला खराब म्हटलं होतं. त्यांचे निधन बौद्ध धर्मातच झाले. त्यांनी मृत्युपूर्वी बौद्ध धर्म स्विकारल्याचेही त्यांनी सांगितले.

ठळक मुद्देमांझी यांनी एका कार्यक्रमात बोलताना हिंदू धर्म आणि सत्यनारायण पूजासंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केलं. त्यांच्या या वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

पाटणा - बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि एचएएम (हिंदुस्तानी आवाम मोर्चा) पक्षाचे प्रमुख जीतनराम मांझी नेहमीच आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत असतात. प्रभू श्रीराम हे काल्पनिक व्यक्तीमत्व असल्याचं यापूर्वी मांझी यांनी म्हटलं होत. आता, पुन्हा एकदा मांझींनी हिंदू धर्माबाबत वादग्रस्त विधान केलं असून ब्राह्मण समाजाबद्दलही अपशब्द वापरले आहेत. हिंदू धर्म खराब असल्याचे सांगत सत्यनारायणाच्या पूजेवरही त्यांनी अनेक सवाल उपस्थित केले आहेत.

मांझी यांनी एका कार्यक्रमात बोलताना हिंदू धर्म आणि सत्यनारायण पूजासंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केलं. त्यांच्या या वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यानंतर, ट्विटरवरुन त्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. पाटणा येथील मुसर भुइया समाजाच्यावतीने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात बोलतानाचा त्यांचा हा व्हिडिओ आहे. त्यामध्ये, आता प्रत्येक ठिकाणी आमच्या इथे टोलामध्येही सत्यनारायणाची पूजा घालण्यात येते. त्यासाठी, ब्राह्मण येतात आणि म्हणतात आम्ही जेवण करणार नाहीत, तुम्ही रोख रक्कम द्या. पूर्वी गरिबांच्याघरी ही पूजा होत नसत. मात्र, आजकाल मोठ्या प्रमाणात होत आहे, असे मांझी यांनी म्हटले. 

बाबासाहेब आंबेडकर यांचा दाखला देत मांझी म्हणाले की, सन 1956 मध्ये जीवनाच्या शेवटच्या काळात बाबासाहेबांनी हिंदू धर्माला खराब म्हटलं होतं. त्यांचे निधन बौद्ध धर्मातच झाले. त्यांनी मृत्युपूर्वी बौद्ध धर्म स्विकारल्याचेही त्यांनी सांगितले. मांझी यांचा या वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर वाद निर्माण झाला आहे. त्यामुळे, मांझी यांनी ट्विट करुन स्पष्टीकरण दिलंय. माझ्या व्हायरल झालेल्या व्हिडिओत ब्राह्मणांसदर्भात केवळ तितकंच सांगण्यात आलंय, ज्यातून वाद निर्माण होईल. त्यामुळे, माझा संपू्र्ण व्हिडिओ पाहावा, असे मांझी यांनी म्हटलंय. तसेच, समाजातील प्रत्येक घटकाबद्दल माझ्या मनात माझ्या कुटुंबाप्रमाणे इज्जत, आदर आहे. मी ब्राह्मण समाजाला नाही, तर आमच्याच समाजाला शिवी दिली होती, अशी सारवासारव त्यांनी केली. 

यापूर्वीही श्री राम यांच्याबद्दल वादग्रस्त विधान

रामायण रचणाऱ्या महर्षी वाल्मिकी यांना देशाने श्रद्धांजली अर्पण केली तेव्हा मांझी यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केले होते. भगवान राम हे एक काल्पनिक पात्र होते, असे ते म्हणालेले. संतहे रामापेक्षा हजारो पटींनी मोठे होते. हा माझा व्यक्तीगत विचार होता, मी कोणाच्या भावना दुखवत नाहीय, असही त्यांनी यापूर्वी म्हटलं होतं

टॅग्स :BiharबिहारChief Ministerमुख्यमंत्रीHinduहिंदू