शहरं
Join us  
Trending Stories
1
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
2
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
3
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
4
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
5
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
6
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
7
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
8
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
9
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
10
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
11
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
12
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ
13
या गावातील प्रत्येकाकडे स्वतःचे विमान; साखर-चहा पत्ती आणण्यासाठी विमानाचा वापर, कारण...
14
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु
15
"मुलाच्या फीससाठी लोकांसमोर हात पसरावे लागले", मनीष सिसोदियांनी सांगितला 'तो' प्रसंग
16
कामगिरी सुधारण्यासाठी पाकिस्तानची वेगळी 'रणनीती', पाकिस्तान क्रिकेट बोर्ड लागले कामाला
17
सावधान! ऑफिस असो किंवा वर्क फ्रॉम होम; सतत खुर्चीवर बसणं खतरनाक, 'या' आजारांचा धोका
18
चंद्राबाबू नायडूंनी TTD वर केलेले आरोप बिनबुडाचे, त्यांच्यावर कारवाई व्हावी, जगनमोहन रेड्डींचं PM मोदींना पत्र 
19
Mamata Banerjee : "पश्चिम बंगालमधील पूर मानवनिर्मित, DVC ने न सांगता सोडलं पाणी"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
20
इराणच्या कोळसा खाणीत गॅस गळतीनंतर भीषण स्फोट; ५१ जणांचा मृत्यू

हिंदू कैदी का फरार होत नाहीत ? दिग्विजय सिंह यांचा सवाल

By admin | Published: November 01, 2016 12:15 PM

भोपाळ चकमकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी नेहमी मुस्लिम कैदीच का फरार होत असतात, हिंदू का नाही ? असा सवाल विचारला आहे

ऑनलाइन लोकमत
भोपाळ, दि. 1 - सिमी (स्टुडंट इस्लामिक मुव्हमेंट ऑफ इंडिया) दहशतवाद्यांच्या चकमकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी नेहमी मुस्लिम कैदीच का फरार होत असतात, हिंदू का नाही ? असा सवाल विचारला आहे. दिग्विजय सिंह यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली या प्रकरणाचा तपास एनआयएकडे (राष्ट्रीय तपास यंत्रणा)  सोपवण्यात यावा अशी मागणीदेखील केली आहे. याअगोदर बोलताना आरएसएस आणि मुस्लिम कट्टरपंथी मिळून दंगली घडवून आणतात असा आरोप त्यांनी केला होता. 
 
'फक्त मुस्लिम कैदीच जेल तोडून फरार का होतात, हिंदू का नाही ? एनआयएने याचा तपास करायला हवा, आणि न्यायालयाने या तपासावर लक्ष ठेवायला हवं. तसंच फक्त मुस्लिमच फरार का होतात, काय समस्या आहे, याचाही तपास व्हावा', असं दिग्विजय सिंह बोलले आहेत. 
 
दुसरीकडे मध्यप्रदेशचे गृहमंत्री भुपेंद्र सिंह यांनी कोणत्याही तपासाची गरज नसून पोलिसांनी सर्व माहिती पुरवली असल्याचं सांगितलं आहे. एनआयए फक्त कारागृहातून फरार झालेल्या दहशतवाद्यांसंबंधी तपास करणार आहे. देशात जेव्हा चकमकीत एखादा दहशतवादी मारला जातो, तेव्हा काही लोक खासकरुन काँग्रेस लगेच संशय घेतात असं भुपेंद्र सिंह बोलले आहेत. केंद्रीय गृहराज्यमंत्री किरेन रिजिजू यांनीदेखील भोपाळ चकमकीवर बोलताना आपल्याला पोलीस आणि प्रशासनावर संशय घेण्याची प्रवृत्ती सोडली पाहिजे असं म्हटलं आहे. 
 
 
हेड कॉन्स्टेबलची हत्या केल्यानंतर सोमवारी पहाटे भोपाळच्या मध्यवर्ती कारागृहातून पळून गेलेले सिमीचे आठ अतिरेकी भोपाळलगत इटखेडी भागातील अचारपुरा येथे चकमकीत मारले गेले. दहशतवाद्यांनी कारागृहातून पलायन केल्याचे वृत्त धडकताच खळबळ उडाली होती. दरम्यान, केंद्रीय गृहमंत्रालयाने सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेत या प्रकरणी मध्य प्रदेश सरकारला अहवाल मागितला आहे. राज्य सरकारने तडकाफडकी कारवाई करताना कारागृह अधीक्षक अखिलेश तोमर यांच्यासह पाच अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे.