शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs BAN 1st Test : भारताची विजयी सलामी! अश्विनचा 'षटकार', जड्डूची साथ लाखमोलाची; बांगलादेशचा करेक्ट कार्यक्रम
2
पाकिस्तानी फवाद खानचा 'लिजेंड ऑफ मौला जट' सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही; राज ठाकरेंचा इशारा
3
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
4
पु्ण्याकडे येत होती ट्रेन, अचानक आला मोठा आवाज आणि रुळांवरून घसरलं इंजिन
5
IND vs BAN 4th Day Live : बांगलादेशने लय पकडली पण अश्विन-जडेजाने डोकेदुखी वाढवली; भारताची विजयाकडे वाटचाल
6
मोठा अनर्थ टळला! रेल्वे ट्रॅकवर गॅस सिलिंडर; लोको पायलटच्या प्रसंगावधानामुळे अपघात टळला 
7
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
8
चीन समर्थक दिशानायके यांनी श्रीलंकेच्या राष्ट्रपती निवडणुकीत घेतली विजयी आघाडी   
9
ENG vs AUS : इंग्लंडचे पुनरागमन पण मिचेल स्टार्क भिडला! यजमानांचा पुन्हा पराभव; ऑस्ट्रेलियाची गाडी सुस्साट
10
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
11
सिनेट निवडणूक मंगळवारी होणार; सरकारच्या परिपत्रकाला स्थगिती
12
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
13
परतीचा पाऊस देणार महामुंबईला तडाखा; २६ ते २९ सप्टेंबर मुसळधारेचा अंदाज
14
१४ दिवसांतच संग्राम चौगुलेची 'बिग बॉस मराठी'मधून एक्झिट, पोस्ट शेअर करत म्हणाला- "मला..."
15
स्वाभिमानी मणका तंदुरुस्त करून घ्या!; राज ठाकरेंची पुन्हा मराठी माणसांना हाक
16
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: महत्त्वाचा निर्णय घेण्यास दिवस अनुकूल नाही!
17
याही वेळी मुंबईत अपक्षांची संख्या लक्षणीय असणार? इच्छुकांमध्ये तिकिटासाठी रस्सीखेंच
18
राष्ट्रवादीचे कार्यालय शरद पवार गटाचेच; लोकसभा सचिवालयाने दिले स्पष्टीकरण
19
तिरूपती लाडूबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हा; भेसळयुक्त तूप ‘अमूल’चे असल्याच्या पोस्ट
20
मुख्य निवडणूक आयुक्त ३ दिवस मुंबई दौऱ्यावर; विधानसभा निवडणुकीसाठी घेणार बैठका

पाकिस्तान, बांगलादेशातील हिंदूंना मिळणार भारतीय नागरीकत्व

By admin | Published: June 03, 2016 8:44 AM

हिंसाचाराच्या भितीने आश्रयासाठी भारतात आलेल्या पाकिस्तान, बांगलादेशातील अल्पसंख्यांकांना लवकरच भारतीय नागरीकत्व मिळू शकते.

ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. ३ - धर्माच्या आधारावर होणा-या हिंसाचाराच्या भितीने आश्रयासाठी भारतात आलेल्या पाकिस्तान, बांगलादेशातील अल्पसंख्यांकांना लवकरच भारतीय नागरीकत्व मिळू शकते. केंद्रीय गृहमंत्रालय त्यासाठी भारतीय नागरीकत्व कायद्यामध्ये सुधारणा करण्यास तयार आहे. 
 
नागरीकत्व कायदा १९५५ मधील प्रस्तावित बदलांमुळे शरणार्थींना भारतात रहाण्याचा कायदेशीर अधिकार मिळणार असून, त्यांना नागरीकत्वासाठी दावा करता येईल. कायद्यातील प्रस्तावित बदल प्रत्यक्षात आल्यानंतर आपले सरकार हिंदूचे संरक्षणकर्ते असल्याचा संदेश जाणार असून, त्यातून राजकीय उद्देशही साध्य होणार आहे. 
 
पाकिस्तान, बांगलादेशात हिंदू अल्पसंख्यांक असून तेथे धर्माच्या आधारावर होणा-या हिंसाचारामुळे अनेक हिंदूंनी भारतात आश्रय घेतला आहे. या निर्णयाचा पाकिस्तान-बांगलादेशातून आलेल्या दोन लाख हिंदूंना फायदा होणार आहे.
 
कायद्यात बदल करुन हिंदूंना नागरीकत्व दिले तर, आर्थिक कारणांमुळे बांगलादेशातूनही अनेक मुस्लिम भारताच्या सीमावर्ती राज्यांमध्ये आले आहेत. सरकारने फक्त हिंदूंना नागरीकत्वाचा लाभ दिला तर, सरकार जाणीवपूर्वक शरणार्थींमध्ये भेदभाव करत असल्याचाही संदेश जाईल. २०१४ लोकसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यामध्ये भाजपने हिंदू शरणार्थींना नागरीकत्व देण्याचे वचन दिले होते.