शहरं
Join us  
Trending Stories
1
हरयाणात BJP, जम्मू-काश्मिरात इंडिया; महाराष्ट्रात काय होणार? महायुती-मविआत कोणाचा दबाव वाढेल?
2
हरयाणात घडले तेच महाराष्ट्रातही घडणार; भाजपच्या जल्लोष सभेत देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास
3
अखेर ठरले... अजित पवार बारामतीतूनच लढणार; प्रफुल्ल पटेल यांनी जाहीर केली उमेदवारी
4
जम्मू-काश्मीरमध्ये 'इंडिया', ओमर अब्दुल्ला होणार मुख्यमंत्री; आपनेही खाते उघडले
5
हरयाणात भाजपची हॅट्ट्रिक; काँग्रेसच्या पाच जागा वाढल्या, पण बहुमताची हुलकावणी
6
मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करा; उद्धव ठाकरे यांचे काँग्रेस, शरद पवार गटाला आवाहन
7
ओमर हेच मुख्यमंत्री, वाटेकरी कुणीच नाही; फारूख अब्दुल्लांनी केले जाहीर, काँग्रेसचे ६ विजयी
8
०.८५ टक्के कमी मते अन् गमावल्या ११ जागा; भाजप-काँग्रेसच्या मतांची टक्केवारी जवळपास सारखीच
9
जम्मू-काश्मीर विधानसभा निकालात ‘इंडिया’ने मारली बाजी, तरी भाजप ठरला बाजीगर
10
हरयाणामध्ये भाजप जिंकण्यामागचे गणित काय? काँग्रेसच्या हातात असलेला विजय हिसकावला
11
मागासवर्गीय मतदारांनी काँग्रेसकडे फिरविली पाठ; हरयाणात जाट-बिगर जाट मतांचे ध्रुवीकरण
12
काँग्रेसच्या मनोबलावर परिणाम होणार नाही; हरयाणा निकालावर रमेश चेन्नीथलांचे मत
13
बहिणीच्या दसरा मेळाव्याला भाऊ उपस्थित राहणार का? पंकजा, धनंजय मुंडे महायुतीत असल्याने चर्चा
14
मविआकडून लाडकी बहीण योजनेच्या कालावधीबाबत शंका; देवेंद्र फडणवीस ठामपणे म्हणाले...
15
भारतविरोधी षड्यंत्रात काँग्रेस सामील; समाजाला कमकुवत करण्याचा प्रयत्न, PM मोदींचा घणाघात
16
भक्तांसाठी आनंदाची बातमी: निमगाव खंडोबा क्षेत्र विकासासाठी २४ एकर जमीन; शासन निर्णय जारी 
17
"सकाळी नऊ वाजताचा भोंगा, रात्रीच तयारी करून बसला होता"; फडणवीसांनी राऊतांना डिवचलं
18
धक्कादायक! प्रेमाच्या त्रिकोणातून तरुणीने केली तरुणीची हत्या
19
"खोट्याच्या कडू घोटावर विकासाची गॅरंटी भारी पडली’’, हरयाणातील विजयानंतर मोदींचा टोला 
20
वडील-काकाची दहशतवाद्यांनी केलेली हत्या; मुस्लिमबहुल मतदारसंघातून शगुन परिहार विजयी

हिंदूंनी चार मुलांना जन्म दिला पाहिजे - साक्षी महाराज

By admin | Published: January 07, 2015 10:53 AM

हिंदू धर्माचे रक्षण करायचे असेल तर देशातील प्रत्येक हिंदू महिलेने किमान चार मुलांना जन्म दिला पाहिजे अशी मुक्ताफळे उधळत भाजपा खासदार साक्षी महाराज नव्या वादाला तोंड फोडले आहे.

ऑनलाइन लोकमत
मेरठ, दि. ७ -  नेत्यांनी लक्ष्मणरेषा ओलांडू नये असा इशारा खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिला असतानाही भाजपा नेत्यांची वादग्रस्त वक्तव्ये अद्याप सुरूच आहेत. ' देशातील प्रत्येक हिंदू महिलेने किमान चार मुलांना जन्म दिला पाहिजे' असा सल्ला देत भाजपा खासदार साक्षी महाराज यांनी नव्या वादाला तोंड फोडले आहे. 
मेरठमधील एका कार्यक्रमादरम्यान बोलताना त्यांनी हम दो हमारा एका हा नारा बेकार असल्याचे सांगितले. ' भारतात आता चार बायका आणि ४० मुले ही संकल्पना चालणार नाही. हिंदू धर्माचे रक्षण करायचे असेल तर प्रत्येक हिंदू महिलेने कमीतकमी चार मुलांना जन्म दिला पाहिजे,' असे ते म्हणाले.
याच साक्षी महाराजांनी यापूर्वी नथुराम गोडसे यांना राष्ट्रभक्त म्हटल्याने मोठा वाद निर्माण झाला होता. भाजपा नेत्यांच्या वक्तव्यांमुळे विरोधकांनी सरकारला धारेवर धरत संसदेचे कामकाजही अनेक ठप्प पाडले होते. त्यानंतर पंतप्रधानांनी सर्व नेत्यांना वादग्रस्त वक्तव्ये न करण्याची तसेच आपले काम चोखपणे करण्याची ताकीद दिली होती. मात्र त्यानंतरही भाजप नेत्यांनी मुक्ताफळे उधळणे सुरूच ठेवले आहे.