शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
3
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
4
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
5
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
6
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
7
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
8
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
9
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
10
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
11
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
12
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
13
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
14
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
15
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!
16
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
17
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
18
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
19
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
20
शिमला कराराने सुटलेले भारत-पाकिस्तानमधील वाद; आता पाक देतोय रद्द करण्याची धमकी...

'त्यांचे मानसिक संतुलन ढासळलंय', हरयाणाचे मुख्यमंत्री सैनी अरविंद केजरीवालांवर का भडकले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2025 12:29 IST

Delhi Election 2025: दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात अरविंद केजरीवालांनी हरयाणाला ओढल्याने मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांनी पलटवार केला. केजरीवालांचा दावा सैनी यांनी फेटाळून लावला. 

Delhi Assembly Elections 2025: दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी मोजकेच दिवस शिल्लक राहिले असून, राजकीय वार-प्रतिवाराच्या फैऱ्या झडत आहेत. दिल्लीच्या प्रचारात माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी हरयाणाला ओढल्याने हरयाणाचे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी भडकले. अरविंद केजरीवालांचं मानसिक संतुलन ढासळलं आहे, असे म्हणत त्यांनी पलटवार केला. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

दिल्ली विधानसभा निवडणुकीत आता यमुनेच्या दूषित पाण्याचाही मुद्दाही ऐरणीवर आला आहे. माजी मुख्यमंत्री आणि आपचे नेते अरविंद केजरीवाल यांनी यमुनेच्या विषारी पाण्यासाठी हरयाणा जबाबदार असल्याचा आरोप केला. हरयाणामधून यमुना पात्रात विषारी पाणी सोडले जात असल्याचा दावा केजरीवालांनी केला.

हरयाणाच्या मुख्यमंत्र्यांनी दिले उत्तर 

अरविंद केजरीवालांच्या विधानाला हरयाणाचे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांनी उत्तर दिले. केजरीवालांच्या विधानाचा निषेध करत मुख्यमंत्री सैनी म्हणाले, 'केजरीवालांनी सांगावं की, कोणते विष टाकले गेले. किती टन विष टाकले गेले?'

'नीच राजकारणात केजरीवालांची बरोबरी करू शकत नाही'

"दिल्ली हरयाणा सीमेवर पाणी कसे रोखले आहे? भिंत बांधली आहे. कुठे बनवली आहे? जर पाणी विषारी आहे, तर त्या पाण्यात किती मासे मरण पावले. नीच आणि खोटे राजकारण करण्यात केजरीवालांची कोणी बरोबरी करू शकत नाही", अशा शब्दात मुख्यमंत्री सैनी यांनी केजरीवालांवर हल्ला चढवला.    मुख्यमंत्री सैनी यांनी केजरीवालांवर हरयाणाचा अपमान केल्याचा आरोप केला. ते  म्हणाले, "केजरीवालांनी त्या मातीचा अपमान केला आहे, जिथे त्यांचा जन्म झाला आहे."

"हरयाणातील लोक यमुनेला पवित्र नदी मानतात आणि तिची पूजा करतात. हरयाणाचे लोक मग नदीत विषारी पाणी का मिसळवतील? अरविंद केजरीवाल यांनी २०२० मध्ये खोटं आश्वासन दिले होते की, जर यमुन नदीला दूषित होण्यापासून वाचवू शकलो नाही, तर परत मत मागणार नाही", अशी टीकाही मुख्यमंत्री सैनी यांनी केली. 

मुख्यमंत्री सैनी म्हणाले, "निवडणुकीत पराभव दिसू लागल्याने केजरीवालांचे मानसिक संतुलन ढासळलं आहे. केजरीवालांनी लगेच हरयाणा आणि दिल्लीतील लोकांची माफी मागायला हवी. नाहीतर आम्ही मानहानीचा दावा दाखल करू", असा इशाराही सैनी यांनी दिला आहे. 

टॅग्स :Delhi Assembly Election 2025दिल्ली निवडणूक 2025delhi electionदिल्ली निवडणूकHaryanaहरयाणाBJPभाजपाAAPआप