शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ चौकशी नको, आता पायउतार व्हा; बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर शरद पवार आक्रमक!
2
Baba Siddique: राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दिकी यांची मुंबईत गोळ्या झाडून हत्या; घटनेनं राज्यभर खळबळ
3
१५ दिवसांपूर्वी धमकी अन् Y दर्जाच्या सुरक्षेतही बाबा सिद्दिकींची हत्या; मुंबईतील रस्त्यावर नेमकं काय घडलं?
4
टीम इंडियाची 'विजया दशमी'! दहाव्यांदा प्रतिस्पर्धी संघाला क्लीन स्वीप देत जिंकली मालिका
5
सत्ता येताच प्रत्येक जिल्ह्यात शिवरायांचं मंदिर बांधणार; दसरा मेळाव्यातून उद्धव ठाकरेंची घोषणा
6
पहिल्या षटकातील पहिल्या चेंडूवर विकेट! Mayank Yadav ची खास क्लबमध्ये एन्ट्री
7
"...तोपर्यंत माझ्या आईचा मृत्यू झाला होता", CM शिंदे दसरा मेळाव्यात झाले भावूक
8
Suryakumar Yadav नं साधला मोठा डाव; किंग कोहलीनंतर असा पराक्रम करणारा दुसरा भारतीय
9
"आज इतकी वर्षे झाली, पण...", उद्धव ठाकरे दसरा मेळाव्यात आरक्षण वादावर काय बोलले?
10
ओव्हरमध्ये ६ सिक्सर मारायला चुकला; पण Sanju Samson नं या गोलंदाजाला लय वाईट धुतलं! (VIDEO)
11
"होती दाढी म्हणून उद्ध्वस्त केली महाविकास आघाडी’’, शिंदेंचा विरोधकांना आठवलेस्टाईल टोला
12
"मुंबईबाहेर गेलेल्या मुंबईकरांना मुंबईत परत आणणार’’, दसरा मेळाव्यातून एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा
13
रेकॉर्ड तोडफोड मॅच! ३०० पारची संधी हुकली, पण २९७ धावांसह टीम इंडियानं नोंदवले अनेक विक्रम
14
"मी बाळासाहेबांचा शिवसैनिक, आनंद दिघेंचा चेला, मी मैदानातून पळणारा नाही तर...’’, एकनाथ शिंदेंचा इशारा
15
"मंत्रालय हागणदारी मुक्त करायचंय"; संजय राऊतांचा महायुतीच्या कारभारावर घणाघात
16
"मनोज जरांगेंनी वेळीच सरकारला ओळखलं अन्..."; भास्कर जाधवांनी महायुतीला घेरलं
17
IND vs BAN : संजू-सूर्याची जोडी जमली; पॉवर प्लेमध्ये टीम इंडियानं सेट केला नवा रेकॉर्ड
18
"भाजपा हा दहशतवाद्यांचा पक्ष"; मल्लिकार्जून खरगेंचा PM मोदींवर पलटवार
19
Masaba Gupta Satyadeep Misra welcomes Baby Girl: मसाबा गुप्ता-सत्यजीत मिश्राला 'कन्यारत्न'; सोशल मीडियावरून शेअर केली 'गोड बातमी'
20
मनोज जरांगे विधानसभा लढवणार? दसरा मेळाव्यातील 'त्या' विधानाची चर्चा

मोठी बातमी! आसाम आणि मेघालयमध्ये ऐतिहासिक करार, अमित शाह यांच्या उपस्थितीत सीमा वाद सोडवला

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2022 4:18 PM

आसाम आणि मेघालयमधील ५० वर्षांपासून सुरू असलेला सीमावाद अखेर संपुष्टात आला आहे. दोन्ही राज्यांमध्ये ऐतिहासिक करार झाला आहे.

आसाम आणि मेघालयमधील ५० वर्षांपासून सुरू असलेला सीमावाद अखेर संपुष्टात आला आहे. दोन्ही राज्यांमध्ये ऐतिहासिक करार झाला आहे. दिल्लीत गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी या कराराला सहमती दर्शवली आहे. मंगळवारी आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा, खासदार दिलीप सेकिया आणि मेघालयचे मुख्यमंत्री कोनार्ड संगमा यांनी राजधानी दिल्लीत गृहमंत्री शाह यांची भेट घेतली. यादरम्यान सीमा विवाद सोडवण्यासाठी करार करण्यात आला आहे.

दोन्ही राज्यांच्या सीमावादाच्या १२ पैकी ६ मुद्द्यांचे निराकरण करण्यात आले आहे, ज्यात सीमेच्या जवळपास 70% भागांचा समावेश आहे. उर्वरित 6 मुद्दे लवकरात लवकर सोडवले जातील, अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिली आहे. दोन्ही राज्यांमधील ७० टक्के सीमा आज वादमुक्त झाली आहे. यापुढील वाद आम्ही चर्चेनेच सोडवू, असे दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितले. आज मोठे काम झाले आहे. शाह यांनी पंतप्रधान मोदी आणि भारत सरकारच्या वतीने दोन्ही राज्यांचे मुख्यमंत्री आणि त्यांच्या टीमचे आभार मानले. "पंतप्रधान मोदींनी पाहिलेले विकसित ईशान्येचे स्वप्न लवकरच पूर्ण होईल. आतापर्यंत ४,८०० हून अधिक शस्त्रांचं कायदेशीररित्या अधिकार्‍यांसमोर आत्मसमर्पण करण्यात आले आहे, असे अमित शाह यांनी सांगितले. 

 

टॅग्स :Amit Shahअमित शाह