शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद गंभीर धोका; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावरुन पीएम नरेंद्र मोदींनी दिला इशारा
2
"शाळेचे संचालक अजूनही का सापडलेले नाहीत?", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर आदित्य ठाकरेंचा सवाल
3
"जगन मोहन रेड्डींचे मन शुद्ध असेल तर...", तिरुपती लाडू वादावरून पवण कल्याण यांचा निशाणा
4
Devendra Fadnavis on Badlapur Case Akshay Shinde Encounter: "पोलिसांवर गोळ्या चालवल्या तर..."; देवेंद्र फडणवीसांचे अक्षय शिंदे एन्काऊंटरवर रोखठोक मत
5
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी व्हावी, नातलगांची मागणी 
6
बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदे एन्काऊंटरवर नाना पटोले यांचे सरकारला ३ महत्त्वाचे प्रश्न
7
Sharad Pawar on Akshay Shinde Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर शरद पवारांचे ट्विट, काय म्हणाले?
8
"प्रकरण दडपण्यासाठी हे एन्काऊंटरचे फेक नॅरेटिव्ह", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर अनिल देशमुखांचा आरोप
9
"पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आहे का?", बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार, विजय वडेट्टीवारांचा सवाल
10
CM Eknath Shinde on Akshay Shinde Encounter: "ज्याने माणुसकीला काळीमा फासला..."; CM एकनाथ शिंदे अक्षयच्या एन्काऊंटरवर स्पष्टच बोलले
11
अक्षय शिंदे आणि पोलिसांची चकमक ठाण्यात नेमकी कुठे झाली? Inside Story
12
Badlapur Case Accused Akshay Shinde, Police Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: आरोपी अक्षय शिंदे पोलीस चकमकीत ठार! पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केला गोळीबार
13
बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार! उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
14
अनिल अंबानी यांच्या मुलावर SEBI ची कारवाई; 'या' प्रकरणात ठोठावला कोट्यवधीचा दंड
15
"माझ्या पोराला पैसे देऊन मारून टाकलं", अक्षय शिंदेच्या आईचे गंभीर आरोप, दुपारीच घेतली होती भेट
16
भारतात मंकीपॉक्सचा रुग्ण आढळला, क्लेड १ बी व्हायरसची लागण, आरोग्य यंत्रणा सतर्क
17
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
18
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
19
Video: बापरे! अजगराचा महिलेला विळखा, दोन तास मृत्यूशी झुंज, श्वास घेणेही कठीण; अखेर...
20
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा

जेएनयू आंदोलनामागे हाफिज!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2016 4:19 AM

जेएनयूतीलअफजल गुरूच्या उदात्तीकरणास लष्कर-ए-तोयबाचा संस्थापक हाफिज सईद याचा पाठिंबा असल्याचा दावा करीत केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी रविवारी नव्या वादाला जन्म दिला.

नवी दिल्ली : जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (जेएनयू) अफजल गुरूच्या उदात्तीकरणास लष्कर-ए-तोयबाचा संस्थापक हाफिज सईद याचा पाठिंबा असल्याचा दावा करीत केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी रविवारी नव्या वादाला जन्म दिला. त्यांच्या या दाव्यानंतर डाव्यांसह विविध राजकीय पक्षांनी त्यांना यासंदर्भात पुरावे देण्याची मागणी केली.जेएनयूतील अफजल गुरूचे उदात्तीकरण करणारा कार्यक्रम आणि या कार्यक्रमात लागलेले भारतविरोधी नारे यामागे सईदचा पाठिंबा आहे, हे आपण समजून घेतले पाहिजे. देशाच्या एका प्रतिष्ठित विद्यापीठात जे काही घडले ते दुर्दैवी आहे. मात्र अशावेळी संपूर्ण देशाने एकजूट होऊन सौहार्दाचे दर्शन घडवायला हवे. राजकीय पक्षांनीही या मुद्द्यावरून राजकारण करणे थांबवावे, असे आवाहन राजनाथ सिंह यांनी पत्रकारांशी बोलताना केले. दरम्यान, राजनाथ सिंह यांच्या दाव्यानंतर राजकीय गोटात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. राजनाथ सिंह यांचा दावा अतिशय गंभीर आहे. जेएनयूतील घटनेमागे हाफिज सईद असेल तर त्यांनी याचे पुरावे द्यावेत, असे टिष्ट्वट नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांनी केले. माकपाचे महासचिव सीताराम येचुरी, भाकपा नेते डी राजा यांनीही याबाबातचे पुरावे सार्वजनिक करण्याची मागणी केली. राजनाथ यांचा दावा गंभीर आहे. त्यांच्याकडे या दाव्याच्या समर्थनार्थ ठोस पुरावे असावेत, अशी आम्ही आशा करतो. सईदने कथितरीत्या टिष्ट्वट करून पाकिस्तानी नागरिकांना जेएनयूतील घटनेचे समर्थन करण्याचे आवाहन केले गेले आहे. पोलिसांनी तत्काळ या टिष्ट्वटचा तपास सुरू केला. शिवाय यानंतर लगेच दिल्ली पोलिसांच्या पोलीस आयुक्त कार्यालयाने आपल्या अधिकृत टिष्ट्वटर अकाऊंटवरून अलर्ट जारी करीत, जेएनयू व देशातील विद्यार्थी समुदायास सतर्क आणि दक्ष राहण्याचे तसेच कुणाच्याही बहकाव्यात न येण्याचे आवाहन केले होते. या संपूर्ण पार्श्वभूमीवर राजनाथसिंह यांनी उपरोक्त दावा केला. (लोकमत न्यूज नेटवर्क)..................सात विद्यार्थ्यांवर वर्गबंदीविद्यापीठातील विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हय्या कुमार याच्यासह सात विद्यार्थ्यांना सोमवरपासून वर्गांमध्ये बसू न देण्याचा निर्णय विद्यापीठाच्या उच्चस्तरीय चौकशी समितीने घेतला आहे. दरम्यान कन्हय्या वगळता यापैकी सात विद्यार्थ्यांना चौकशी समितीपुढे हजर राहण्याचेही बजावण्यात आले आहे, असे. जेएनयूचे निबंधक भूपिंन्दर जुटशी यांनी रविवारी सांगितले. कन्हय्या कुमार सध्या पोलिस कोठडीत आहे.—————————विद्यापीठाची अप्रतिष्ठा नकोविद्यापीठात घडलेल्या या एका घडामोडीवरून सरसकट संपूर्ण विद्यापीठास ‘देशद्रोही’ ठरवू नका, असे आवाहन विद्यापीठातील प्राध्यापकांनी केले आहे. समाजशास्त्राच्या एका प्राध्यापकाने नाव गोपनीय ठेवण्याच्या अटीवर संपूर्ण विद्यापीठास बदनाम करणे गैर असल्याचे मत मांडले. विद्यापीठ परिसरात वादग्रस्त कार्यक्रमात भारतविरोधी नारेबाजी झाली असेल नसेल. पण या घटनेनंतर जेएनयू म्हणजे राष्ट्रविरोधी कारवायांचा गढ असल्याचे सांगून विद्यापीठाची प्रतिमा मलीन केली जात आहे. आम्ही अनेक वर्षांपासून येथे शिकवत आहोत. जेएनयू कायम शैक्षणिक आणि लोकशाही संस्कृतीचे प्रतीक राहिले आहे. अशास्थितीत एका घटनेवरून संपूर्ण जेएनयूला राष्ट्रविरोधी म्हणणे गैर आहे, असे ते म्हणाले. भाषाशास्त्राच्या अन्य एका प्राध्यापकांनीही असेच मत व्यक्त केले. विद्यापीठाने संबंधित प्रकरणाची चौकशी आरंभली आहे. पोलीस चौकशी करीत आहेत. दिल्ली सरकारनेही दंडाधिकारी चौकशीचे आदेश दिले आहेत. ही चौकशी पूर्ण होईपर्यंत आपण प्रतीक्षा करू शकणार नाही का? विद्यापीठाला अतिरेक्यांचा गढ म्हणण्याची घाई का? असे सवाल त्यांनी केले. विद्यार्थी संघटनेचा नेता कन्हय्या कुमार याला अटक करणे गैर असल्याचे मतही या प्राध्यापकांनी मांडले. विद्यार्थ्यांनी काही चुकीचे केले असेल तर तो शिस्तभंगाचा मुद्दा आहे देशद्रोहाचा नाही, असे ते म्हणाले.................माझा मुलगा तसा नाहीया प्रकरणी अटक करण्यात आलेल्या कन्हय्या कुमाराच्या आईने ‘माझ्या पोराला अतिरेकी ठरवू नका’, अश्ी विनंती पाणावलल्या डोळ््यांनी केली.बिहारच्या बेगुसराय जिल्ह्यात राहणाऱ्या कन्हय्याची आई मीनादेवी यांच्या डोळ्यांतून, श्ेजाऱ्यांच्या घरी टीव्ही पाहताना अश्रूधारा वाहू लागल्या. कन्हय्याला अटक केल्याचे मला कळले. मी टीव्हीवर पाहिले. माझ्या मुलाने कधीही वडिलधाऱ्यांचा अपमान केला नाही. देशाचा अपमान तर नाहीच नाही. माझ्या मुलाला अतिरेकी ठरवू नका. तो असे करूच शकत नाही, असे सांगताना मीनादेवींचा कंठ दाटून आला. मीनादेवी अंगणवाडी कार्यकर्त्या आहेत. त्या महिन्याला साडेतीन हजार रुपये कमावतात. त्या आणि त्यांचा मोठा मुलगा मणिकांत हे दोघेचे घराच कमावते आहेत. त्यांचे ६५ वर्षीय पती लकवाग्रस्त असून अंथरुणाला खिळलेले आहेत.