शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

हॉलीवूडपासून हरिद्वारपर्यंत योग, आयुर्वेदाची चर्चा, कोरोनाविरोधातील लढाईत मोदींनी विषद केलं महत्त्व

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2020 12:34 IST

त्याबरोबरच कोरोनाविरोधातील लढाईमध्ये योग आणि आयुर्वेदाच्या उपयुक्ततेची जगभरात चर्चा असल्याचे मोदींनी सांगितले

नवी दिल्ली - सध्या संपूर्ण जग कोरोना विषाणूविरोधात लढाई लढत आहे. भारतातही कोरोनाचे संकट दिवसेंदिवस गंभीर रूप धारण करत आहे. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांशी संवाद साधला. आता देश हळूहळू अनलॉक होत असल्याने अधिक खबरदारी घेण्याची गरज असल्याचे मोदींनी सांगितले. त्याबरोबरच कोरोनाविरोधातील लढाईमध्ये योग आणि आयुर्वेदाच्या उपयुक्ततेची जगभरात चर्चा असल्याचे ते म्हणाले.

मन की बात च्या माध्यमातून देशवासियांशी संवाद साधताना मोदी म्हणाले की, कोरोनाच्या या संकटाच्या परिस्थितीत माझी जगातील अनेक नेत्यांशी चर्चा होत आहे. या काळात जगातील अनेक नेत्यांनी योग आणि आयुर्वेदाबाबत उत्सुकता व्यक्त केली आहे. अनेक जणांना योग आणि आयुर्वेदाबाबत अधिकाधिक जाणून घ्यायचे आहे. हॉलीवूडरपासून हरिद्वारपर्यंत याबाबत उत्सुकता दिसून येत आहे.  

ज्यांनी कधीही योग केला नाही ते योगचे ऑनलाईन धडे घेत आहेत. ऑनलाईन व्हिडिओमधून योग शिकत आहेत. कोरोनाच्या संकटकाळाता योगचे महत्त्व वाढत आहे कारण कोरोना विषाणू हा आपल्या श्वसनप्रणालीवर हल्ला करतो. योगमध्ये श्वसनप्रणाल मजबूत करणाऱ्या अनेक प्राणायामांचा उल्लेख आहे. ही टाइम टेस्टेड प्रणाली आहे. कपालभाती आणि अनुलोम विलोम प्राणायामाबाबत अनेकांना माहिती असेलच. पण भस्त्रिका, शीतली, भ्रामरीसारखे अनेक प्राणायामाचे प्रकार आहेत ज्याचे अनेक फायदे आहेत, असेही मोदींनी पुढे सांगितले.  

दरम्यान, आज मन की बातच्या माध्यमातून संवाद साधताना मोदीनी सांगितले की, मी गेल्या वेळी मन की बातच्या माध्यमातून जेव्हा संवाद साधला होता, तेव्हा देशातील बहुतांश व्यवहार बंद होते. मात्र आता देशाच्या अर्थव्यवस्थेचे चक्र पुन्हा एकदा फिरू लागले आहेत. सर्व खबरदारी घेऊन रेल्वे आणि विमान सेवा सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे आता अनलॉक-१ च्या काळात आपल्याला अधिक सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. आता सहा फुटांचे अंतर आणि मास्क परिधान करणे गरजेचे आहे.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीMan ki Baatमन की बातcorona virusकोरोना वायरस बातम्याYogaयोग