शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
2
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
3
चीन समर्थक दिशानायके यांनी श्रीलंकेच्या राष्ट्रपती निवडणुकीत घेतली विजयी आघाडी   
4
ENG vs AUS : इंग्लंडचे पुनरागमन पण मिचेल स्टार्क भिडला! यजमानांचा पुन्हा पराभव; ऑस्ट्रेलियाची गाडी सुस्साट
5
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
6
सिनेट निवडणूक मंगळवारी होणार; सरकारच्या परिपत्रकाला स्थगिती
7
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
8
परतीचा पाऊस देणार महामुंबईला तडाखा; २६ ते २९ सप्टेंबर मुसळधारेचा अंदाज
9
१४ दिवसांतच संग्राम चौगुलेची 'बिग बॉस मराठी'मधून एक्झिट, पोस्ट शेअर करत म्हणाला- "मला..."
10
स्वाभिमानी मणका तंदुरुस्त करून घ्या!; राज ठाकरेंची पुन्हा मराठी माणसांना हाक
11
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: महत्त्वाचा निर्णय घेण्यास दिवस अनुकूल नाही!
12
याही वेळी मुंबईत अपक्षांची संख्या लक्षणीय असणार? इच्छुकांमध्ये तिकिटासाठी रस्सीखेंच
13
पाकिस्तान मोदींना घाबरतो; आज पाकिस्तान गोळीबाराची हिंमतही करणार नाही
14
राष्ट्रवादीचे कार्यालय शरद पवार गटाचेच; लोकसभा सचिवालयाने दिले स्पष्टीकरण
15
तिरूपती लाडूबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हा; भेसळयुक्त तूप ‘अमूल’चे असल्याच्या पोस्ट
16
मुख्य निवडणूक आयुक्त ३ दिवस मुंबई दौऱ्यावर; विधानसभा निवडणुकीसाठी घेणार बैठका
17
भारतातील चाकरमानी दबले फायलींच्या ढिगाऱ्याखाली; ६१ टक्के जण आठवड्याला ४९ तासांपेक्षा अधिक राबतात
18
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत दाखल, ‘क्वाड’ शिखर परिषदेत सहभागी होणार
19
आता मेडिकलच्या ‘पीजी’च्या जागा वाढणार; वैद्यकीय आयोगाने अर्ज मागविले
20
वरिष्ठांना लाच देण्याचा कनिष्ठाचा प्रयत्न; ‘प्रॉव्हिडंट फंड’ची सीबीआयकडे तक्रार

“सत्तेसाठी नितीश कुमार सोनिया गांधींच्या चरणी गेले, आता भाजपचे दरवाजे बंद”

By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2023 2:51 PM

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी नितीश कुमार यांच्यावर निशाणा.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह शनिवारी बिहार दौऱ्यावर आले होते. त्यांनी बिहारमधील पश्चिम चंपारण जिल्ह्यातील एका जाहीर सभेला संबोधित केलं. “आज मी चंपारणच्या पवित्र भूमीवर तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. पूर्ण बहुमत असलेलं भाजप सरकारच बिहारला विकास आणि समृद्धीच्या मार्गावर नेऊ शकतं. अजलौरिया, पश्चिम चंपारण येथे आयोजित केलेल्या या विशाल जनसभेला संबोधित करताना खूप आनंद होत आहे,” असं अमित शाह यावेळी म्हणाले. 

“गेल्या विधानसभा निवडणुकीत जनतेनं भाजपला सर्वात मोठा पक्ष बनवलं होतं. डबल इंजिनचं सरकार चांगल्या प्रकारे चालावं, यासाठी आम्ही आमच्या शब्दानुसार नितीश कुमार यांना मुख्यमंत्री बनवलं. परंतु नितीश बाबूंना दर तीन वर्षांनी पंतप्रधान बनण्याचं स्वप्न पडतचं. ते जंगलराजचे प्रणेते लालू प्रसाद यादव यांच्यासह गेले. सत्तेसाठी नितीश कुमार काँग्रेसच्या सोनिया गांधींच्या चरणी गेले. अनेक वर्ष ‘आयाराम गयाराम’ केलं. पण आता भाजपचे दरवाजे तुमच्यासाठी आयुष्यभरासाठी बंद आहेत,” असं अमित शाह म्हणाले. 

सोनिया गांधींच्या चरणी गेले“मी बिहारच्या जनतेला आवाहन करण्यासाठी आलोय, जेदयूआणि आरजेडीची अपवित्र आघाडी पाणी आणि तेलासारखी आहे. यामध्ये जदयू पाणी आमि आरजेडी तेल आहे. हे दोन्ही कधी एकत्र मिसळू शकत नाहीत. नितीश कुमार यांनी बनावट मद्यावरही आपलं तोंड बंद केलंय,” असं ते म्हणाले.

बिहारमध्ये अराजकता“आज संपूर्ण बिहारमध्ये अराजकता निर्माण झाली आहे. गुन्हेगारी पुन्हा डोकं वर काढत आहे. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होतोय. हत्या, अपहरण, बलात्कार, दरोड्यांसारखे गुन्हे वाढू लागलेत. यावेळी असा धडा शिकवा की बिहारमध्ये पक्ष बदलणारे शांत होतील. मोदींच्या नेतृत्वााखाली दोन तृतीयांश बहुमतानं भाजपचं सरकार बनवणं आणि मोदींना पंतप्रधान बनवणं हा यातून मुक्ती मिळवण्याचा मार्ग आहे,” असं अमित शाह यांनी स्पष्ट केलं.

टॅग्स :Amit Shahअमित शाहBiharबिहारNitish Kumarनितीश कुमारNarendra Modiनरेंद्र मोदी