शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs BAN 1st Test : भारताची विजयी सलामी! अश्विनचा 'षटकार', जड्डूची साथ लाखमोलाची; बांगलादेशचा करेक्ट कार्यक्रम
2
"तुम्हाला दुःख झाले नाही का? देशाला सांगा", केजरीवालांचे मोहन भागवतांना पाच सवाल
3
'गोळीला गोळीनेच उत्तर देणार; कलम 370 कधीही मागे घेणार नाही', अमित शाहंची गर्जना...
4
पुण्यातील नवीन विमानतळाला 'हे' नाव देण्यासाठी प्रयत्न करणार; गडकरींचं आश्वासन
5
Bengaluru Murder : फ्रीजमध्ये सर्वात खालच्या कप्प्यात होतं शिर, पोलिसांनाही फुटला घाम
6
"वर्षा उसगावकर कोण हे मला माहितच नव्हतं", निक्की पुन्हा बरळली, म्हणाली- "बिग बॉसमध्ये आल्यानंतर..."
7
शाब्बास पोरा! वडिलांसोबत चहा विकला, मोलमजुरी करून उदरनिर्वाह; IAS होऊन रचला इतिहास
8
तु्मच्या खाण्यामध्ये येत नाही ना चरबी असलेलं भेसळयुक्त तूप, ५ मिनिटांत असं तपासून घ्या
9
काँग्रेसच्या बड्या नेत्याला केंद्रीय मंत्र्याने दिली ऑफर, हरियाणात भाजपाने टाकला नवा डाव
10
श्रीगोंदा मतदारसंघातील उमेदवारावरून शरद पवार यांनी संजय राऊतांना सुनावले, म्हणाले...
11
५०० रुपयांची लाच घेणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला ५ वर्षांची शिक्षा; १० वर्षांनी कोर्टाने दिला निकाल
12
IND vs BAN : पहिला सामना जिंकताच BCCI ची मोठी घोषणा; दुसऱ्या कसोटीसाठी भारताचा संघ जाहीर
13
पाकिस्तानी फवाद खानचा 'लिजेंड ऑफ मौला जट' सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही; राज ठाकरेंचा इशारा
14
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
15
'वयस्कर' अश्विनला तोड नाय! भारताला अडचणीतून बाहेर काढले; सामना जिंकवला, विक्रमही नोंदवला
16
पु्ण्याकडे येत होती ट्रेन, अचानक आला मोठा आवाज आणि रुळांवरून घसरलं इंजिन
17
IND vs BAN 4th Day Live : बांगलादेशने लय पकडली पण अश्विन-जडेजाने डोकेदुखी वाढवली; भारताची विजयाकडे वाटचाल
18
मोठा अनर्थ टळला! रेल्वे ट्रॅकवर गॅस सिलिंडर; लोको पायलटच्या प्रसंगावधानामुळे अपघात टळला 
19
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
20
चीन समर्थक दिशानायके यांनी श्रीलंकेच्या राष्ट्रपती निवडणुकीत घेतली विजयी आघाडी   

लोकमान्यतेने मिळालेल्या पुरस्कारांचा सन्मान राखा- राष्ट्रपतींचा सबुरीचा सल्ला

By admin | Published: November 16, 2015 8:41 PM

लोकमान्यतेने मिळालेल्या पुरस्कारांचा आदर,सन्मान राखला पाहिजे असा सल्ला प्रणव पुरस्कार वापसी करणा-या मान्यवरांना मुखर्जींनी दिला.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली दि. १६ - एखाद्या गोष्टीशी, विचाराशी असहमत असाल तरी चर्चा करून वा संवाद साधून व्यक्त व्हा, पुरस्कार परत करणे हा योग्य मार्ग नव्हे असे सांगत लोकमान्यतेने मिळालेल्या पुरस्कारांचा सन्मान राखला पाहिजे असा सबुरीचा सल्ला राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी असहिष्णू वातावरणाविरोधात पुरस्कार वापसी करणा-या मान्यवरांना दिला.
राष्ट्रीय पत्रकार दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना त्यांनी पुरस्कार प्राप्त  पत्रकार व फोटो जर्नटलिस्ट्सचे अभिनंदन केले. 
देशातील वाढत्या असहिष्णुतेविरोधात निषेध नोंदवत सध्या अनेक नामवंत लेखक, दिग्दर्शक, विचारवंत, वैज्ञानिक आपले पुरस्कार परत करत आहेत. त्या पार्श्वभूमीवर बोलताना त्यांनी पुरस्कार परत करणे हा योग्य मार्ग नसल्याचे स्पष्ट केले. 'मिळालेला राष्ट्रीय पुरस्कार म्हणजे तुमची बुद्धी, कलागुण, परिश्रम, कष्ट यांना मिळालेली पावती, लोकमान्यता असते. त्यामुळे या सन्मानाचा आदर राखून त्यांचा सांभाळ करायला हवा, असे ते म्हणाले.
समाजातील काही घटनांमुळे संवेदशनशील लोकं अस्वस्थ होतात, पण त्यावरील प्रतिक्रिया ही संयमी असायला हवी. एखाद्या गोष्टीवरील आपली असहमती चर्चा आणि संवादाच्या माध्यमातून पुढे यायला हवी, असे राष्ट्रपतींनी सांगितले. तसेच वादांवर तोडगा निघू शकेल अशा अनेक तरतूदी आपल्या राज्यघटनेत आहेत. त्यांच्या वापरातून सामाजिक संतुलन अबाधित राखले गेले पाहिजे, असा सूचक इशारा राष्ट्रपती मुखर्जी यांनी सरकारला दिला.