शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
3
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
4
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
5
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
6
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
7
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
8
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
9
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
10
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

पक्षाचे दोषी नेते उमेदवार कसे निवडू शकतात?, सुप्रीम कोर्टाचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2018 10:03 IST

सुप्रीम कोर्टाने सोमवारी गुन्ह्यात दोषी ठरवूनही पक्षाचं अध्यक्षपद सांभाळत असलेल्या राजकीय नेत्यांबद्दल चिंता व्यक्त केली आहे.

नवी दिल्ली- सुप्रीम कोर्टाने सोमवारी गुन्ह्यात दोषी ठरवूनही पक्षाचं अध्यक्षपद सांभाळत असलेल्या राजकीय नेत्यांबद्दल चिंता व्यक्त केली आहे. दोषी व्यक्ती निवडणूक लढवायला अपात्र असताना तो राजकीय पक्षाचा अध्यक्ष कसा राहू शकतो?' असा सवाल सुप्रीम कोर्टाने उपस्थित केला.  'दोषी व्यक्ती राजकीय पक्षाचे अध्यक्षपद सांभाळत असून निवडणुकीत उमेदवारांचीही निवड करत आहेत. तसंच या दोषी राजकारण्यांच्या पक्षाचे काही लोक सरकारमध्ये सहभागी होण्याची शक्यता असते, असं ही मत व्यक्त करत सुप्रीम कोर्टाने चिंता व्यक्त केली. 

जर एखादा व्यक्ती लोकप्रतिनिधी कायद्यानुसार निवडणूक लढवू शकत नाही तर तो राजकीय पक्षाची स्थापना कशी करू शकतो? तो पक्षाच्या उमेदवारांची निवडणूक लढविण्यासाठी निवड कसा करू शकतो?' असा सवाल सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला विचारला. कोर्टाने म्हंटलं, अशी लोक शाळा किंवा इतर कोणत्या संस्था निर्माण करत असतील तर काही अडचण नाही. पण तशी लोक पक्ष स्थापन करत आहेत. जो पक्ष सरकार चालवेल, हे एक गंभीर प्रकरण आहे.  

सरन्यायाधीश दीपक मिक्षा यांच्या अध्यक्षतेखालील तीन न्यायमूर्तींच्या खंडपीठाने यासंदर्भात सुनावणी सुरू आहे. डागाळलेल्या नेत्यांच्या विरोधात वकील अश्विनी उपाध्याय यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. त्यावर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे. गंभीर गुन्ह्यांसाठी जे राजकारणी दोषी ठरविण्यात आले आहेत. त्यांना निवडणूक लढविण्यावर बंदी आहे. असं असतानाही त्यांनी पक्ष स्थापन केले असून पक्षाचे अध्यक्ष आहेत. ओम प्रकाश चौटाला, शशिकला हे नेते आजही पक्षाचे प्रमुख बनलेले असल्याचं या याचिकेत नमूद करण्यात आलं आहे.

यावेळी निवडणूक आयोगाच्यावतीने अमित शर्मा यांनी आयोगाची भूमिका मांडली. 'अशा राजकारण्यांना अटकाव करण्याची भूमिका निवडणूक आयोग १९९८ पासूनच मांडत आहे. पण दोषी नेत्यांना पक्ष चालविण्यास बंदी घालण्याचे अधिकार आयोगाला नाहीत. जर लोकप्रतिनिधी कायद्यात दुरुस्ती करून अशा प्रकारची बंदी घातली जात असेल तर आम्ही त्याची तात्काळ अंमलबजावणी करू,' असं अमित शर्मा यांनी सुप्रीम कोर्टात सांगितलं. 

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयPoliticsराजकारण