शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
3
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
4
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
5
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
6
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
7
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
8
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
9
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
10
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
11
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
12
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
13
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
14
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
15
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
16
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
17
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
18
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
19
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
20
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!

होऊ दे खर्च... लग्नासाठी ५०० कोटींचा खर्च; नवरी मुलीची साडीच होती कोट्यवधींची

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2023 17:51 IST

कर्नाटकचे माजी मंत्री जनार्दन रेड्डी यांची कन्या ब्राह्मणी हिचा हा विवाहसोहळा होता

लग्न म्हटलं की खर्च आलाच, गरीबातील गरीब माणसालाही लग्नसोहळ्यासाठी खर्च करावाच लागतो. म्हणून तर म्हणतात की माणूस आयुष्यभर पै पै जमा करतो आणि लेकरांच्या लग्नात ती खर्च करतो. कारण, लग्नासाठी काही खर्च हा अपरिहार्य असाच मानला जातो. मात्र, देशातील काही गर्भश्रीमंत लोकांच्या लग्नाची कथाही तितकीच उत्कंठावर्धक असते. मग, ते उद्योगपती अंबानींचं घराणं असो की एखाद्या सेलिब्रिटीचं लग्न असोत. सध्या लग्नसराईला सुरुवात झाली आहे. त्यामुळे, कर्नाटकमधील एका माजी मंत्र्यांच्या मुलीचा लग्नसोहळ्याची आठवण आवर्जुन होतेय. या लग्न सोहळ्यासाठी तब्बल ५०० कोटी रुपयांचा खर्च झालाय. विशेष म्हणजे हे लग्न ७ वर्षांपूर्वी झालं होतं, पण आजही त्याची चर्चा होतेय. कारण, हा देशातील सर्वात महाग लग्नसोहळ्यांपैकी एक होता. 

कर्नाटकचे माजी मंत्री जनार्दन रेड्डी यांची कन्या ब्राह्मणी हिचा हा विवाहसोहळा होता. या लग्नासाठी तब्बल ५०० कोटींपेक्षा अधिक खर्च करण्यात आला होता. ६ नोव्हेंबर २०१६ साली हे लग्न झालं होतं, तब्बल ५ दिवस हा लग्नसोहळा सुरु होता, ज्यामध्ये ५० हजारांपेक्षा अधिक लोकं सहभागी झाले होते. बंगळुरुमधील ५ स्टार आणि ३ स्टार हॉटेलमध्ये जवळपास १५०० पेक्षा जास्त रुम्स बुकींग करण्यात आल्या होत्या. तर, विवाहस्थळी ३ हजारांपेक्षा अधिक सुरक्षा रक्षक व पोलीस बंदोबस्त होता. 

लग्नात वधुने कांजीवरम साडी परिधान केली होती, ज्याची किंमत १७ कोटी रुपये एवढी होती. साडीवर सोन्याचा थ्रेड वर्क करण्यात आला होता. तर, लग्नासाठी ५ कोटी रुपयांचे दागिने मुलीच्या अंगावर होते. मुलीच्या मेकअपसाठी तब्बल ५० मेकअप आर्टीस्ट आल्या होत्या, त्यासाठी, ३० लाख रुपये खर्च करण्यात आले होते. पाहुण्यांच्या ने-आण करण्यासाठी १५ हेलिकॉप्टर आणि २००० कार उभ्या होत्या. त्यासह ४० भव्य बैलगाडीवरुन पाहुणे मंडळी लग्नमंडपात येत होती. विशेष म्हणजे या लग्नसोहळ्याची निमंत्रण पत्रिका एलईडी स्क्रीनद्वारे देण्यात आली होती. बॉक्स उघडल्यानंतर या स्क्रीवर एक व्हिडिओ चालत होता, जे लग्नाचे निमंत्रण देत होता. 

दरम्यान, जनार्दन रेड्डी हे तेव्हा कर्नाटकमधील भाजपचे मंत्री होते. नोटीबंदीनंतर काही दिवसांतच हा विवाहसोहळा संपन्न झाला होता. काँग्रेससह अनेक विरोधी पक्षाच्या नेत्यांनी या लग्नसोहळ्यासाठी करण्यात आलेल्या खर्चाची चौकशी करण्याची मागणी केली होती.  

टॅग्स :Karnatakकर्नाटकmarriageलग्नBengaluruबेंगळूरDemonetisationनिश्चलनीकरण