शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

कथित नक्षलवाद्यांच्या तपासाचे कागदपत्र भाजपकडे कसे आले? काँग्रेसचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2018 17:19 IST

भाजपने ज्या पोलिसांकडील कागदपत्रांवरून आरोप केले आहेत, ते भाजपच्या प्रवक्त्याकडे कसे आले? ही अघोषित आणिबाणी आहे. पक्ष, सरकार आणि तपास यंत्रणा असा वेगळेपणा राहिलाच नाही, असा आरोप काँग्रेसने केला आहे.

नवी दिल्ली : कथित नक्षलवाद्यांच्या अटकेवरून काँग्रेस-भाजपमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. नक्षलवाद्यांसोबत काँग्रेसचे संबंध असल्याचा आरोप केल्यानंतर काँग्रेसने भाजपवर पलटवार केला आहे. भाजप ही देशाची तपास यंत्रणा म्हणून काम करतेय का, असा आरोप केला आहे. भाजपने ज्या पोलिसांकडील कागदपत्रांवरून आरोप केले आहेत, ते भाजपच्या प्रवक्त्याकडे कसे आले? ही अघोषित आणिबाणी आहे. पक्ष, सरकार आणि तपास यंत्रणा असा वेगळेपणा राहिलाच नाही, असा आरोप काँग्रेसने केला आहे.

कथित नक्षल समर्थकांच्या अटकेविरोधात बाजू मांडणाऱ्या काँग्रेसवर भाजपने आज जोरदार टीका केली. भाजपाचे प्रवक्ता संबित पात्रा यांनी काँग्रेसला नक्षलवाद्यांप्रती सहानुभूती असलेला पक्ष म्हटले आहे. तसेच जेव्हा काँग्रेस सत्तेत होती तेव्हा त्यांनी नक्षलवाद्यांबाबत दुटप्पी भुमिका घेतली होती. मनमोहन सिंह यांच्यासह काही जण नक्षलवाद्यांपासून देशाला मोठा धोका नसल्याचे म्हटले होते. तर निम्मे मंत्री नक्षलवाद्यांच्या विरोधात होते. यावरून काँग्रेस देशाच्या सुरक्षेबाबतही कोणत्याही थराला जाऊ शकते, असा आरोप केला.

विनायक सेन यांना 2010 मध्ये देशद्रोही घोषित केले गेले होते. यानंतर त्यांना नियोजन आयोगाच्या आरोग्य समितीमध्ये घेतले होते. यावरून काँग्रेस किती दुटप्पी होती, हे दिसते, असेही पात्रा म्हणाले. तसेच जयराम रमेश यांच्यावरही टीका करताना ज्या महेश राउत याला भीमा कोरेगाव प्रकरणात अटक केली होती. त्याला युपीए सरकानेही अटक केली होती. त्यावेळी जयराम रमेश यांनी तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना पत्र लिहिले होते. रमेश यांनी या व्यक्तीला चांगला माणूस म्हटले होते. पंतप्रधान ग्रामीण विकास योजनेत त्याने सहभाग घेतला होता, असे पात्रा यांनी म्हटले आहे.  

याविरोधात काँग्रेसचे प्रवक्ता मनीष तिवारी यांनी पत्रकार परिषद घेत भाजपच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले. याचबरोबर राफेल सौदा, इंधनाच्या वाढत्या किंमती, रशियासोबतचा ए-103 असॉल्ट रायफलच्या करारवरूनही जोरदार टीका केली. 

तपासाआधीच कागदपत्र कसे आले ?पोलीस नक्षलवाद्यांशी संबंधीत प्रकरणांचा तपास करत आहे. या तपासाची कागदपत्रे भाजपच्या प्रवक्त्याकडे कशी आली. याची आधी चौकशी व्हायला हवी. जर कोणत्याही पोलीस खात्याने तपासाचे कागदपत्र न्यायालयात सादर केले असल्यास ते कागदपत्र सार्वजनिक मानले जातात. मात्र, चौकशी सुरु असतानाच कथित कागद भाजपकडे येमे याला काय म्हणावे, अपप्रचार करण्यासाठीच हे कागद भाजपकडे येत असल्याचा आरोप तिवारी यांनी केला. 

नाझी सरकारशी मोदी सरकारची तुलना तामिळनाडूमध्ये भाजपविरोधात घोषणा देणाऱ्या व्यक्तीला 15 दिवसांची न्यायालयीन कोठडी मिळाली. अनुशासन हा खूप जटील शब्द आहे. अनुशासनवाद हुकुमशाही आणि फॅसिस्टविचारसरणी य़ांचे अर्थ एकसारखेच आहेत. जनतेला शब्दांच्या मायाजालात अडकविण्यात येत आहे. अनुशासनवाद हेच फॅसिस्टविचारसरणीचे दुसरे नाव आहे. मोदी यांनी याच अर्थाने शब्दप्रयोग केल्याचा आरोप तिवारी यांनी केला.

टॅग्स :naxaliteनक्षलवादीcongressकाँग्रेसSambit Patraसंबित पात्राBJPभाजपाPoliceपोलिस