शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
2
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
3
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
4
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
5
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
6
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
7
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
8
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
9
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
10
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
11
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
12
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
13
पहलगाम हल्ल्यानंतर भारतात होणारी मोठी स्पर्धा पुढे ढकलली
14
मायेची फुंकर! ब्रेकअप, स्ट्रेस, रागावर फक्त एकाच थेरपीने उपचार, उशी ठरतेय वेदनांवरची डॉक्टर
15
सलग ७ दिवसांच्या वाढीला ब्रेक! एफएमसीजी आणि रिअल्टीमुळे बाजार कोसळला; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
16
WhatsApp वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! अ‍ॅडव्हान्स्ड चॅट प्रायव्हसी फीचर आले, कसे वापरायचे जाणून घ्या
17
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार
18
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
19
दुसऱ्यांचा विनाश करणे हा धर्म नाही अधर्म आहे, शिक्षा झालीच पाहिजे - प्रेमानंद महाराज
20
‘पत्नीचे अनेक तरुणांशी अनैतिक संबंध, नशेच्या धुंदीत घालतात धिंगाणा, करतात अश्लील चाळे ’, पतीचे गंभीर आरोप, पुरावेही दिले   

कुणी आरोपी आहे म्हणून घरावर बुलडाेझर कसा काय चालवता? सर्वाेच्च न्यायालयाचा सवाल; सर्वच राज्यांसाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी करू

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2024 07:08 IST

Supreme Court News: एखादी व्यक्ती आराेपी आहे म्हणून फक्त या एका कारणावरून कुणाचे घर कसे काय पाडले जाऊ शकते, असा प्रश्न उपस्थित करून याबाबत देशपातळीवर लागू करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे निश्चित केली जातील, असे सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी स्पष्ट केले.

 नवी दिल्ली - एखादी व्यक्ती आराेपी आहे म्हणून फक्त या एका कारणावरून कुणाचे घर कसे काय पाडले जाऊ शकते, असा प्रश्न उपस्थित करून याबाबत देशपातळीवर लागू करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे निश्चित केली जातील, असे सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी स्पष्ट केले. अनेक राज्यांत स्थानिक प्रशासनाच्या वतीने गुन्हेगारी प्रकरणात सहभागी असलेल्या आरोपींची घरे बुलडोझरने पाडली जात आहेत. या पार्श्वभूमीवर न्यायालयाने हा प्रश्न उपस्थित केला.

न्या. के. व्ही. विश्वनाथन यांच्या खंडपीठासमाेर यासंदर्भातील प्रकरणावर सुनावणी झाली. त्यावेळी, केवळ कुणी आरोपी आहे म्हणून त्याचे निवासस्थान भुईसपाट कसे केले जाऊ शकते? किंबहुना एखाद्या प्रकरणात कुणी गुन्हेगार सिद्ध झाला तरी प्रशासकीय प्रक्रियेशिवाय आणि कायदेशीर बाबींच्या पूर्ततेशिवाय अशी कारवाई केली जाऊ शकत नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले. 

अनधिकृत बांधकामांना संरक्षण नाहीउत्तर प्रदेश सरकारच्या वतीने न्यायालयात उपस्थित असलेले महान्याय अभिकर्ता तुषार मेहता यांनी राज्य सरकारने यासंदर्भात दाखल केलेल्या शपथपत्राचा उल्लेख करून यात हाच संदर्भ नमूद केल्याचे स्पष्ट केले.ते म्हणाले, संबंधित नगरपालिका कायदा किंवा स्थानिक विकास प्रशासनासंबंधी कायद्यानुसारच एखादी स्थावर मालमत्ता पाडता येऊ शकते. केवळ एखाद्या गुन्ह्यात सहभागी असल्याच्या कारणावरून तसे केले जाऊ शकत नाही, हे शपथपत्रात नमूद आहे. यावर न्यायालयाने स्पष्ट केले की, ही बाब मान्य असेल तर सर्वच राज्यांसाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी करू  सार्वजनिक रस्त्यांवर होणारे अतिक्रमण किंवा अनधिकृत बांधकामांना संरक्षण देण्याचा आमचा हेतू नाही. अशा रस्त्यांवरील मंदिरांबाबतही हेच धोरण असेल. 

‘नाेटिसा दिल्या हाेत्या’ॲड. तुषार मेहता यांनी उत्तर प्रदेश सरकारची बाजू मांडताना नमूद केले की, कुणीतरी गुन्हा केला म्हणून त्याची मालमत्ता पाडली जात असल्याचे याचिककर्त्यांच्या वतीने भासवले जात आहे. मात्र, ही मालमत्ता पाडली जाण्यापूर्वी प्रशासनाने संबंधितांना रीतसर नोटिसा दिल्या असल्याचे मी दाखवू शकतो. कित्येक दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशने दाखल केलेल्या शपथपत्राच्या आधारेच हा वाद मिटायला हवा.

सर्वोच्च न्यायालयाचे निर्देशअशा मुद्द्यावर मार्गदर्शक तत्त्वे निश्चित करण्याची गरज आहे. अशा प्रकरणात असलेल्या कच्च्या दुव्यांचा कुणी वैयक्तिक लाभ मिळवू नये किंवा अधिकाऱ्यांनीही या कमतरतेच्या आधारे निर्णय घेऊ नयेत, असे न्यायालयाने सांगितले. 

प्रकरण काय?उत्तर प्रदेशात एखाद्या गुन्ह्यात सहभाग असलेला आरोपी किंवा गुन्हेगाराची मालमत्ता स्थानिक प्रशासन बुलडोझर लावून पाडली जात असल्याच्या विरोधात अनेकांनी न्यायालयात दाद मागितली आहे. अशाच एका याचिकर्त्याच्या वतीने हजर असलेले ॲड. दुष्यंत दवे यांनी बाजू मांडताना सांगितले, देशभरात या बुलडोझरच्या न्यायाबाबत मते जाणून घेतली तर लोकांना हा प्रकार मान्य होणारा नसेल.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयIndiaभारतHomeसुंदर गृहनियोजनCrime Newsगुन्हेगारी