शहरं
Join us  
Trending Stories
1
हर्षवर्धन पाटलांचा भाजपाला रामराम; शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची घोषणा
2
इंदापूरात भाजपाचे बॅनर्स हटवले; हर्षवर्धन पाटील 'तुतारी' चिन्हावर विधानसभा लढणार?
3
संयुक्त राष्ट्रात भारतानं काढली पाकिस्तानची खरडपट्टी; जगाला दाखवला 'दहशतवादी' चेहरा
4
Mumbai: बापच 5 वर्षांपासून करत होता बलात्कार; अल्पवयीने मुलीने व्हिडीओ बनवून...
5
भाजपा नेत्याने राष्ट्रवादीत प्रवेश केल्याचे जाहीरच केले; व्हिडीओ पाहून शरद पवारही चकीत
6
Supriya Sule : "दुर्दैवाने महाराष्ट्र महिलांसाठी सुरक्षित राहिलेला नाही"; सुप्रिया सुळेंनी व्यक्त केला संताप
7
राहु नक्षत्रात शनी गोचर: ६ राशींची प्रगती, बचतीत यश; व्यवसायात नफा, नवीन नोकरीची संधी!
8
Navratri 2024: देवीच्या आरतीतलं प्रत्येक कडवं जणू काही देवीशी प्रत्यक्ष संवादच; वाचा भावार्थ!
9
पुणे हादरलं! मित्रासोबत फिरायला गेलेल्या तरुणीवर लैंगिक अत्याचार, तिघांना पोलिसांनी घेतले ताब्यात
10
Navratri 2024: नवरात्रीत केवळ डिजेवर नाचून नाही तर 'अशी' करा शक्तीची उपासना!
11
"ट्रेनचा स्पीड कमी करुन..."; वंदे भारतवर दगडफेक करणाऱ्याने सांगितलं धक्कादायक कारण
12
Women's T20 World Cup, INDW vs NZW : कसा आहे दोन्ही संघातील रेकॉर्ड? जाणून घ्या सविस्तर
13
भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याने काय बदल होतात? नागपूरकरांनी लढलेला दीर्घ लढा अखेर यशस्वी
14
"त्या सिनेमाचा हिरो रात्री १२ वाजता मला...", मल्लिका शेरावतचा खुलासा, नेटकऱ्यांनी लावला अंदाज
15
"मला संपवू नका, मीच राहिलो नाही, तर तुम्ही...", अशोक चव्हाणांचे विधान चर्चेत
16
...तर शरद पवारांसोबत चर्चा करू; MIM च्या मविआतील प्रवेशावर ठाकरे गटाची भूमिका
17
खळबळजनक! "तुमची मुलगी एका..."; डिजिटल अरेस्ट, ८ कॉल, 'त्या' फोनने आईला हार्ट अटॅक
18
अभिजात दर्जासाठी पहिली समिती ते आतापर्यंतचा प्रवास... अखेर तेव्हापासूनच्या प्रयत्नांना यश
19
आता GPay युझर्सना मिळणार Gold Loan; 'या' कंपनीसह झाला करार, पाहा डिटेल्स
20
शेअर बाजार उघडताच पुन्हा विक्री सुरू, सेल ऑन राइजमध्ये अडकला बाजार; BPCL, एशियन पेंट्स आपटला

डिजिटल इंडियाचे स्वप्न विजेअभावी साकारणार कसे?

By admin | Published: September 04, 2015 10:46 PM

देशात अनेक गावांमध्ये वीजच नाही, मग डिजिटल इंडियाचे स्वप्न कसे साकारणार? असा रोकडा सवाल उत्तराखंडच्या सार्थक भारद्वाज

नवी दिल्ली : देशात अनेक गावांमध्ये वीजच नाही, मग डिजिटल इंडियाचे स्वप्न कसे साकारणार? असा रोकडा सवाल उत्तराखंडच्या सार्थक भारद्वाज याने शुक्रवारी शिक्षक दिनाच्या पूर्वसंध्येला माणेकशॉ सभागृहामध्ये आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विचारला. त्यावर मोदींनी २०२२ पर्यंत प्रत्येक गावात, प्रत्येक घरी २४ तास वीज राहील, अशी ग्वाही दिली. त्यांनी देशभरातील विद्यार्थी, शिक्षकांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधताना त्यांच्या रोखठोक प्रश्नांना मनमोकळी उत्तरे दिली. अनेकदा गुगली टाकत त्यांना हसवले, तर कधी ते आपल्या शालेय जीवनातील आठवणींमध्ये रमले. देश २०२२ साली ७५ वा स्वातंत्र्यदिन साजरा करणार असून त्यावेळी प्रत्येक घरी २४ तास वीज राहील, असे आश्वासन त्यांनी शाळकरी मुलांशी संवाद साधताना दिले. सध्या १८ हजार गावांमध्ये वीज नाही. येत्या एक हजार दिवसांमध्ये या गावांमध्ये वीज पोहोचविण्याचे प्रयत्न आम्ही सुरू केले आहेत. डिजिटल इंडियाचा ‘मार्च ’रोखला जाऊ शकत नाही. सौर ऊर्जेचा वापर करीतही हे उद्दिष्ट साध्य केले जाईल, असे ते म्हणाले. (वृत्तसंस्था) मोदींनी देशभरातील ८०० विद्यार्थी आणि दिल्लीच्या विविध शाळांमधील ६० शिक्षकांशी सुमारे १०५ मिनिटे संवाद साधला. नऊ राज्यांमधील विद्यार्थी सहभागी झाले होते. अनेक विद्यार्थ्यांनी चांगले वक्ता कसे बनलात? तुमच्या कपड्यांचे फॅशन डिझायनर कोण आहेत? कोणता खेळ आवडतो? यासारखे बालसुलभ प्रश्न विचारले. प्रश्न : योगदिन म्हणून २१ जूनचीच निवड का? उत्तर : हा भारतीय उपखंडातील सर्वात मोठा दिवस आहे. सूर्य हा ऊर्जेचा पृथ्वीवरील सर्वात मोठा स्रोत असून त्या दिवशी साहजिकच सर्वाधिक ऊर्जा मिळते. त्यामुळे या दिवसाची निवड केली. अनेकांनी याबाबत प्रश्न विचारले; मात्र प्रथमच मी त्याबाबत खुलासा करीत आहे.प्रश्न : चांगले वक्ते कसे बनलात? उत्तर : दिल्लीच्या पुष्पविहारमधील केंद्रीय विद्यालयाची विद्यार्थिनी श्रेया सिंग हिच्या या प्रश्नावर मोदी म्हणाले की, चांगला वक्ता बनण्यासाठी आधी चांगला श्रोता बनण्याची आवश्यकता आहे. कोण काय म्हणेल, कुणी हसेल काय याची चिंता नको. हसणार असतील तर हसू द्या, मात्र जे सांगायचे ते आत्मविश्वासाने बोला. तुम्ही तथ्य आणि माहितीच्या आधारावर बोलाल तेव्हा चांगले वक्ते बनाल. गुगल, यू-ट्यूबवर जगभरातील मान्यवरांची चांगली भाषणे असतात.