शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
2
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
3
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
4
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
5
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
6
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
7
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
8
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
9
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
10
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
11
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
12
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
13
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
14
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
15
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
16
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
17
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
18
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
19
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
20
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...

पाच ट्रिलियनवर किती शून्य ? या प्रश्नाने गोंधळले भाजप प्रवक्ते संबित पात्रा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2019 15:12 IST

हाच प्रश्न कार्यक्रमाचे एँकर यांनी वल्लभ यांना विचारला. त्यावर त्यांनी पाचवर १२ शून्य लागल्यावर पाच ट्रिलियन होतात, असं उत्तर दिलं. यावेळी जीडीपीवरून वल्लभ यांनी पुन्हा पात्रा यांना लक्ष्य केले.

नवी दिल्ली - देशावर सध्या आर्थिक मंदीचे सावट आहे. वाहन क्षेत्रात मोठ्या प्रमाणात मंदी असून अनेक लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. तर वाहन विक्री घटल्यामुळे देशातील अनेक शहरातील गाड्यांचे शोरूम बंद होत होत आहेत. या मुद्दावरून राजकारण तापले आहे. त्यामुळे विविध वृत्तवाहिन्यांवर सत्ताधारी आणि विरोधी पक्षाचे प्रवक्ते चर्चा करताना दिसत आहेत. मात्र अशाच एका चर्चेत भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांना अडचणीच्या प्रसंगाला सामोरे जावे लागले.

एका वृत्तवाहिनीवर संबित पात्रा भाजपची बाजू मांडत होते. यावेळी त्यांनी अर्थव्यवस्थेवर मंदीचा काहीही परिणाम होत नसल्याचे सांगितले. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपच्या भारताला ५ ट्रिलयन डॉलर अर्थव्यवस्था करण्यासाठीच्या प्रयत्नाविषयी सांगितले. मागील पाच वर्षांत अर्थव्यवस्थेने मोठी झेप घेतली असून पाच ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे लक्ष्य पार करणे सहज शक्य असल्याचे त्यांनी सांगितले.

यावर काँग्रेसचे प्रवक्ते गौरव वल्लभ यांनी संबित पात्रा यांची बोलती बंद केल्याचे दिसून आले. सुरुवातीला गौरव वल्लभ यांनी काँग्रेसने मागील ७० वर्षांत काय केले त्याविषयी माहिती दिली. त्यानंतर संबित पात्रा यांच्यावर अर्थव्यवस्थेतील मंदीवरून टीका केली. त्याचवेळी संबित पात्रा पुन्हा ५ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचा करत होते. त्यामुळे वल्लभ यांनी पाच ट्रिलियनवर किती शून्य असतात, असा प्रश्न पात्रा यांना विचारला. त्यावर पात्रा यांनी उत्तर देणे टाळून उलट राहुल गांधींना हा प्रश्न विचारा अशी मागणी केली. त्यामुळे कार्यक्रमात एकच हशा पिकला होता. संबित पात्रा यांनी या प्रश्नाचे उत्तर ऑफ कॅमेरा देखील देण्याचे टाळले.

दरम्यान  हाच प्रश्न कार्यक्रमाचे एँकर यांनी वल्लभ यांना विचारला. त्यावर त्यांनी पाचवर १२ शून्य लागल्यावर पाच ट्रिलियन होतात, असं उत्तर दिलं. यावेळी जीडीपीवरून वल्लभ यांनी पुन्हा पात्रा यांना लक्ष्य केले.