शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
3
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
4
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
5
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
6
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
7
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
9
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
10
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
11
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
12
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
13
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
14
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
15
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
16
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
17
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
18
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
19
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
20
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!

सरकारे पाडण्यासाठी किती पैसे मोजले? निवडणूक रोख्यांतील पैशांतून सरकारे पाडली : काँग्रेसचा भाजपवर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2024 12:47 IST

इतर राज्यांप्रमाणे हिमाचल प्रदेशातही भाजपने लोकशाहीची हत्या करण्याचा प्रयत्न केला.

नवी दिल्ली : हिमाचलच्या जनतेने निवडून दिलेले सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न भाजपने का केला? अग्निपथ योजना रद्द करण्याचे आश्वासन मावळते पंतप्रधान देतील का? मोदी सरकारने रेल्वे प्रकल्पांवर काम का केले नाही?, असे प्रश्न काँग्रेसने पंतप्रधानांना विचारले आहेत.

इतर राज्यांप्रमाणे हिमाचल प्रदेशातही भाजपने लोकशाहीची हत्या करण्याचा प्रयत्न केला. राज्यसभेच्या निवडणुकीत भाजपच्या हाताने विकलेल्या सहा आमदारांना विधानसभेसाठी अपात्र ठरवण्यात आले. भाजपने निर्लज्जपणे त्यांना उमेदवारी दिली आहे, असा आरोप काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी केला आहे.

भाजपच्या १० वर्षांच्या राजवटीत घाणेरडे राजकारण हे भाजपचे तत्व झाले आहे. गोव्यापासून सिक्कीमपर्यंत, महाराष्ट्रापासून कर्नाटकपर्यंत आणि आता हिमाचल प्रदेश - कोणतेही राज्य त्यांच्या डावपेचांपासून सुरक्षित नाही. त्यांनी उघडपणे बेकायदेशीरपणे निवडणूक रोख्यांतून मिळालेल्या पैशांतून देशातील सरकारांना पाडण्याचा प्रयत्न केला. हिमाचल प्रदेश सरकार पाडण्याचा प्रयत्न करताना किती पैसे मोजावे लागले? पक्षांतरासाठी प्रत्येक आमदाराला किती पैसे दिले? मावळते पंतप्रधान अभिमानाने भारताला “लोकशाहीची जननी” म्हणतात. त्यांच्या दुटप्पीपणाचा आणि विश्वासघाताचा भारत मातेला अभिमान वाटेल का?, असा प्रश्न जयराम रमेश यांनी विचारला आहे.

 

टॅग्स :congressकाँग्रेसBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी