शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

नितीशकुमार यांना गांधी व गोडसे यांचे विचार कसे चालतात -प्रशांत किशोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2020 02:56 IST

नितीशकुमार यांनी मला पक्षातून काढल्याने मी नाराज नाही. त्यांनी मला कायम मुलासारखे वागविले

एस. पी. सिन्हा पाटणा : बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांना महात्मा गांधी व त्यांचा मारेकरी नथुराम गोडसे या दोघांची विचारसरणी कशी मान्य होते, असा सवाल निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी मंगळवारी केला. सीएए, एनआरसी या मुद्यांबाबत नितीशकुमार यांनी घेतलेल्या भूमिकेवर टीका केल्याने प्रशांत किशोर यांची अलीकडेच संयुक्त जनता दलातून हकालपट्टी केली.

नितीशकुमार यांनी मला पक्षातून काढल्याने मी नाराज नाही. त्यांनी मला कायम मुलासारखे वागविले, पण माझे त्यांच्याशी वैचारिक मतभेद आहेत, असे सांगतच प्रशांत किशोर यांनी नितीश यांच्या राजकारणावर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, महात्मा गांधी व गोडसे यांची विचारसरणी परस्परविरोधी आहे. त्यामुळे नितीशकुमार यांना हे दोन्ही विचार कसे काय चालतात? ते भाजपच्या प्रत्येक निर्णयाचे समर्थन कसे काय करतात? भाजपच्या उमेदवारांसाठी सभा कशा घेतात? बिहारमध्ये नितीशकुमार यांनी खूप सुधारणा केल्या, हे खरे नाही. आजही बिहार देशातील मोठे व मागास राज्यच आहे. बिहारची २00५ मध्ये जी स्थिती होती, त्यात काहीच बदल झालेला नाही. बिहार आताही तितकेच मागास आहे, अशी टीकाही प्रशांत किशोर यांनी केली. ते म्हणाले की, बिहारमध्ये सुधारणा होणे आवश्यक आहे. त्यासाठी आपण राज्याच्या ८ हजारांहून अधिक गावांतील लोकांना संघटित करणार आहोत.आतापर्यंतचा प्रवासच्प्रशांत किशोर यांनी पाच वर्षांपूर्वी बिहार विधानसभा निवडणुकीसाठी नितीशकुमार यांच्या पक्षाची निवडणूक रणनीती ठरवली होती. त्याआधी २0१४ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांच्या कंपनीने भाजप व नरेंद्र मोदी यांची रणनीती ठरविण्याचे काम केले होते.च्दोन वर्षांपूर्वी प्रशांत किशोर यांनी संयुक्त जनता दलात अधिकृतपणे प्रवेशही केला. मात्र, नुकत्याच झालेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत त्यांनी आम आदमी पक्षासाठी रणनीती ठरविण्याचे काम केले. त्यामुळे संयुक्त जनता दलात अस्वस्थता होती.

टॅग्स :Nitish Kumarनितीश कुमारBJPभाजपा