शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 3rd T20I : टीम इंडियानं मॅच जिंकत दक्षिण आफ्रिकेला टाकले मागे; पण सूर्या-गिल पुन्हा फेल!
2
"मोदी, शाह, राजनाथ, नड्डा...!" भाजपचे कार्यकारी अध्यक्ष होताच काय म्हणाले नितीन नवीन?
3
पंतप्रधान मोदी, रशियाचे पुतिन यांच्या खास मैफलीत झंकारली नागपूरकर लावण्य अंबादे यांची सतार
4
मीरा भाईंदर महापालिका, परिवहन ठेकेदाराच्या वादात बससेवा डबघाईला; सामान्य नागरिकांना मनस्ताप
5
महिनाभर आधी झालेलं प्रेयसीचं लग्न, पहिल्या प्रियकराने नवऱ्याला भेटायला बोलवलं अन् संपवलं...
6
VIDEO: आधी गणपती बाप्पाचा जयजयकार, नंतर CM देवेंद्र फडणवीसांनी मेस्सीला केलं एक 'प्रॉमिस'
7
U19 Asia Cup, IND vs PAK : टीम इंडियाने उडवला पाकचा धुव्वा; हायव्होल्टेज मॅचमध्ये काय घडलं?
8
"राहुल गांधींचे सैनिक बणून मोदींविरोधात...!" रामलीला मैदानावरून रेवंत रेड्डीची गर्जना
9
IND vs SA : पांड्याच्या 'सेंच्युरी'सह चक्रवर्तीची 'फिफ्टी'! शेवटच्या षटकात बर्थडे बॉयचा जलवा अन्....
10
VIDEO : क्रिकेटचा 'देव' सचिन आणि फुटबॉलचा 'जादूगार' मेस्सीची ग्रेट भेट; खास गिफ्ट अन् बरंच काही
11
"दिल्ली को दुल्हन बनाएंगे..., आमच्या समोर S-400, राफेल...!"; लश्करच्या दहशतवाद्यानं ओकली गरळ 
12
"हनुकाची पहिली मेणबत्ती...!", ऑस्ट्रेलियात ज्यूंच्या उत्सवादरम्यान झालेल्या गोळीबारावर इस्रायलची पहिली प्रतिक्रिया 
13
सत्याच्या बळावर मोदी-शाह अन् RSS ची सत्ता उलथून लावू; राहुल गांधीचे टीकास्त्र
14
सिडनी गोळीबारावर PM मोदी म्हणाले, "हा मानवतेवर हल्ला, भारत ऑस्ट्रेलियासोबत खंबीर उभा..."
15
रेस्टॉरंटमध्ये लपला..; ऑस्ट्रेलियातील गोळीबारात इंग्लंडचा माजी कर्णधार थोडक्यात बचावला
16
नितिन नबीन यांची नड्डांच्या जागी BJP अध्यक्षपदी निवड होताच PM मोदींची पोस्ट, म्हणाले...
17
U19 Asia Cup 2025 : कोण आहे Aaron George? पाक विरुद्धच्या सामन्यात टीम इंडियासाठी ठरला ‘संकटमोचक’
18
भाजपचा मोठा निर्णय; नितीन नबीन यांची राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती, जेपी नड्डांची जागा घेणार
19
IND vs SA T20: स्टेडियममध्ये दिसलेल्या 'मिस्ट्री गर्ल'ची रंगली चर्चा, जाणून घ्या 'ती' कोण?
20
Sydney Shooting: समोर मृत्यू नाचत होता, पण तो घाबरला नाही; गोळीबार करणाऱ्याला पकडले अन्...
Daily Top 2Weekly Top 5

भारत कसा असावा? देशवासीयांना नेमके काय वाटते? PM नरेंद्र मोदींनी वाचून दाखवली यादी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2024 08:56 IST

PM Narendra Modi Speech on 78th India Independence Day: विकसित भारताच्या संकल्पासाठी सरकारने नागरिकांकडून सूचना मागवल्या होत्या, असे सांगत देशवासीयांना नेमके काय वाटते, ते पंतप्रधान मोदींनी सांगितले.

PM Narendra Modi Speech on 78th India Independence Day: संपूर्ण देशभरात स्वातंत्र्य दिन साजरा केला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून ११ व्यांदा तिरंगा फडकवला. ध्वजारोहण झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित केले. विकसित भारत, समृद्ध भारत, व्होकल फॉर लोकल यासह अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. तसेच देशवासीयांना आपला भारत कसा असावा, याबाबत नेमके काय वाटते, याची एक यादीत पंतप्रधान मोदी यांनी आपल्या संबोधनात वाचून दाखवली.

जागतिक विकासात भारताचे योगदान वाढले आहे. भारताची निर्यात सातत्याने वाढत आहे. परकीय चलनाचा साठा पूर्वीच्या तुलनेत दुप्पट होत चालला आहे. जागतिक संस्थांचा भारतावरील विश्वास वाढला आहे. भारत वेगाने प्रगतीच्या मार्गावर अग्रेसर होत आहे. शासन, प्रशासनाच्या प्रत्येक विभागात दोन सुधारणा होण्याची आवश्यकता आहे. पंचायत स्तरावर असेच व्हायला हवे. असे केल्यास लाखो सुधारणा काही वेळातच घडतील. सामान्यांचे जीवन सुकर होईल. असे झाले तर आपल्या देशातील युवक नवीन उंची गाठतील, असा विश्वास पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केला. 

देशाची वाटचाल योग्य दिशेने होत असल्याचे दिसते

जाती-पातीच्या वरती उठून प्रत्येक घराघरात तिरंगा फडकवला जातो, तेव्हा देशाची वाटचाल योग्य दिशेने होत असल्याचे दिसते. मध्यमवर्गीय कुटुंबांना उत्तम जीवन जगण्याची अपेक्षा असते. मी एक स्वप्न पाहिले आहे की, २०४७ पर्यंत विकसित भारताचा संकल्प पूर्ण झाला, तर त्याचा एक घटक असा असेल की, सरकारने सर्वसामान्यांच्या जीवनात हस्तक्षेप करू नये. सरकारची गरज भासल्यास अशी व्यवस्था निर्माण करण्याचा संकल्प केला जातो की, सरकारमुळे कोणताही त्रास, अडथळा निर्माण होऊ नयेत. परंतु सरकारची गरज भासल्यास प्रशासन समस्यांमध्ये मदतीला उपलब्ध असेल, असे मोदी म्हणाले.

दरम्यान, विकसित भारतासाठी सरकारने सर्वसामान्य नागरिकांकडून सूचना मागवल्या होत्या. हजारो देशवासीयांनी सल्ला, सूचना सरकारला पाठवल्या, असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले आणि काही यादी वाचून दाखवली.

भारत कसा असावा? देशवासीयांना नेमके काय वाटते? 

- भारत हे जगाचे स्किल कॅपिटल बनावे. 

- भारत जागतिक उत्पादन केंद्र बनायला हवे.  

- भारतीय विद्यापीठे जागतिक दर्जाची व्हायला हवीत. 

- भारतीय मीडिया जागतिक बनला पाहिजे 

- भारतातील कुशल युवक ही जगाची पहिली पसंती बनली पाहिजे. 

- भारताने जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात लवकरात लवकर स्वावलंबी व्हावे. 

- सुपरफूड्स जगातील प्रत्येक डायनिंग टेबलवर पोहोचवायला हवेत. जगाचे पोषित करून भारतातील शेतकऱ्याला समृद्ध केले पाहिजे. 

- छोटे विभागांचा कारभार आणि प्रशासन सुधारले पाहिजे. 

- न्याय मिळण्यास विलंब होत आहे, ही चिंताजनक आहे; आपल्या देशाच्या न्याय व्यवस्थेत सुधारणा करण्याची नितांत गरज आहे. 

- वाढत्या नैसर्गिक संकटात प्रशासनासाठी मोहिमा राबवायला हव्यात. 

- अंतराळात भारताचे स्पेस स्टेशन असावे. 

- भारत पारंपारिक औषधे आणि समृद्ध आरोग्याचे केंद्र म्हणून विकसित व्हावा. 

- भारत लवकरात लवकर तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनायला पाहिजे, अशा अनेक सूचना देशवासीयांनी दिल्याचे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.

 

टॅग्स :Independence Dayस्वातंत्र्य दिनNarendra Modiनरेंद्र मोदीRed Fortलाल किल्ला