शहरं
Join us  
Trending Stories
1
"दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार"; बिहारमधून PM मोदींचा इशारा
2
फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; पहलगाम हल्ल्यातील पीडितांनी सांगितली आपबीती
3
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
4
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन
5
काश्मीरमध्ये तणाव असतानाच छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई, १००० नक्षल्यांना जवानांनी घेरले, ५ ठार  
6
पहलगाम दहशतवादी हल्लाः पाकिस्तानी उच्चायोगात मागवण्यात आला केक; बॉक्स पाहून एकच प्रश्न, हे 'सेलिब्रेशन' कसलं?
7
पाकिस्तान पुरता अडकणार? पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा एक निर्णय अन् शेअर बाजार धडाम
8
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
9
डोळ्यात अश्रू, कपड्यांवर रक्ताचे डाग..! दहशतवादी हल्ल्यात डोळ्यादेखत वडिलांना गमावलेल्या लेकीनेच केले अंत्यसंस्कार
10
IPL 2025: दिल्ली कॅपिटल्सचा युवा स्टार म्हणतो- "मला टीम इंडियाकडून खेळायचंय, पण..."
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या शुभमला परत आणा, मी माझं दुःख कोणाला सांगू, त्याने कोणाचं काय नुकसान केलं होतं?"
12
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?
13
पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर खेळाडूही संतापले! सचिन तेंडुलकर ते नीरज चोप्रा.. कोण काय म्हणाले?
14
मुलगी झाली हो..! ; अभिनेता चिराग पाटील दुसऱ्यांदा झाला बाबा, पोस्ट शेअर करत दिली खुशखबर
15
Indus Waters Treaty: ६५ वर्षे जुना सिंधू पाणी करार काय आहे? पाकिस्तानवर किती परिणाम होईल?; वाचा सविस्तर
16
"मला पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल आधीच माहित होतं"; 'त्या' व्यक्तीचा पोलिसांना फोन अन्...
17
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
18
"तुला ठार मारू’’, भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरला दहशतवादी संघटनेकडून धमकी
19
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
20
दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना इन्शुरन्स क्लेम मिळतो का? काय आहेत विमा नियम?

देशातील रस्ते असुरक्षित? दर तासाला 53 अपघात, वर्षाला दीड लाख लोकांचा मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2019 15:16 IST

2017 मधील आकड्यांवरुन भारतात दर तासाला 53 रस्ते अपघात होतात.

नवी दिल्ली : मोटर वाहन(संशोधन) विधेयक मंगळवारी लोकसभेत मंजूर करण्यात आले. त्यानंतर आता हे विधेयक राज्यसभेत मांडले जाणार आहे. या विधेयकासाठी मोटर वाहन कायदा 1988 मध्ये सुधारणा करुन मंजूर करण्यात आले आहे. याआधी हे विधेयक 2017 मध्ये संसदेत सादर करण्यात आले होते. मात्र, त्यावेळी या विधेयकाला मंजूरी मिळाली नव्हती. 

दरम्यान, लोकसभेत रस्ते अपघातासंदर्भात काही आकडे सादर करण्यात आले. त्यावरुन असे समजते की भारतात रस्ते असुरक्षित आहेत. 2017 मधील आकड्यांवरुन भारतात दर तासाला 53 रस्ते अपघात होतात. ज्यामध्ये 17 लोकांचा मृत्यू होतो. तर देशात वर्षाला 1,47,913 लोकांचा मृत्यू होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.  

याशिवाय, राज्यानुसार पाहिले तर भारतात सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या उत्तर प्रदेशात रस्ते अपघात अनेक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर, तामिळनाडू दुसऱ्या स्थानावर आहे. तिसऱ्या स्थानावर महाराष्ट्र आणि चौथ्या स्थानावर आहे. विशेष म्हणजे, भारतातील लक्षद्वीप या केंद्रशासित प्रदेशात एकही रस्ते अपघात झाला नाही. तर अंदमान-निकोबार, दमन-दीव, नागालँड आणि दादर नगर हवेली यासारख्या केंद्रशासित प्रदेशात रस्ते अपघातात 50 पेक्षा कमी लोकांचा मृत्यू झाल्याचे समजते.  

दरम्यान, रस्ते अपघात टाळण्यासाठी केंद्र सरकारने मोटर वाहन(संशोधन) विधेयकात अनेक गाइडलाइन्स घातल्या आहेत. या विधेयकात रस्ते वाहतुकीचे नियम मोडल्यास कठोर दंड ठोठावण्याची तरतूद करण्यात आलेली आहे. रस्त्यावर गाडी चालवताना थोडीशी चूक झाल्यास चालकाला मोठा दंड भरावा लागणार आहे. बेदरकारपणे गाडी चालवणे किंवा हेल्मेटशिवाय गाडी चालवणे, सीट बेल्ट न बांधणे आणि दारूच्या नशेत गाडी चालवण्यासारख्या नियमांचे उल्लंघन केल्यास कठोर दंड भरावा लागणार आहे.

टॅग्स :Accidentअपघातroad safetyरस्ते सुरक्षा