शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

लोकसभेतील विजयानंतर नरेंद्र मोदींची वाराणसीत धन्यवाद रॅली

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2019 11:15 IST

लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या ऐतिहासिक विजयानंतर सोमवारी (27 मे) मोदी पहिल्यांदाच आपला मतदारसंघ वाराणसीत पोहोचले आहेत. वाराणसीत धन्यवाद रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.

ठळक मुद्देलोकसभा निवडणुकीत मिळालेल्या ऐतिहासिक विजयानंतर सोमवारी (27 मे) मोदी पहिल्यांदाच आपला मतदारसंघ वाराणसीत पोहोचले आहेत.शपथविधी होण्याआधीच नरेंद्र मोदी मतदारांचे आभार मानण्यासाठी वाराणसीत दाखल झाले आहेत. वाराणसीत धन्यवाद रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.

नवी दिल्ली - भारतातील मतदारांनी देशाची सत्ता पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांच्याच हाती सोपविण्याचा ऐतिहासिक कौल दिला. मोदींच्या झंझावातात, काँग्रेसचे अनेक दिग्गज नेत्यांना पराभव पत्करावा लागला आहे. लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या ऐतिहासिक विजयानंतर सोमवारी (27 मे) मोदी पहिल्यांदाच आपला मतदारसंघ वाराणसीत पोहोचले आहेत. शपथविधी होण्याआधीच नरेंद्र मोदी मतदारांचे आभार मानण्यासाठी वाराणसीत दाखल झाले आहेत. वाराणसीत धन्यवाद रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. नरेंद्र मोदींच्या स्वागतासाठी शहरात सर्वत्र सजावट करण्यात आली आहे. नरेंद्र मोदी बाबा विश्वनाथ आणि कालभैरवाचं दर्शन घेणार आहेत. 

नरेंद्र मोदी पंतप्रधानपदाची शपथ घेण्याआधी मतदारांचे आभार मानण्यासाठी नरेंद्र मोदी वाराणसीत पोहोचले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, मोदी काशी विश्वेश्वराचे दर्शन घेणार आहेत. पोलीस लाईन ते विश्वनाथ मंदिरामधील सात किमीचं अंतर ते बंद गाडीतून पार करणार आहेत. हा एक रोड शो असून यानंतर नरेंद्र मोदी समर्थकांना संबोधित करणार आहेत. लोकसभा निवडणुकीतील देदीप्यमान विजयानंतर नरेंद्र मोदी 30 मे रोजी पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. संध्याकाळी 7 वाजता राष्ट्रपती भवनात मोदींचा शपथविधी सोहळा संपन्न होईल. यावेळी मंत्र्यांच्या शपथविधीदेखील पार पडेल. भाजपा आणि एनडीएच्या खासदारांनी त्यांचे नेते म्हणून एकमुखानं मोदींची निवड केली आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपाला 303, तर एनडीएला 353 जागा मिळाल्या आहेत.

30 मे रोजी संध्याकाळी 7 वाजता राष्ट्रपती रामनाथ कोविंद नरेंद्र मोदींना पद आणि गोपनीयतेची शपथ देतील, अशी माहिती राष्ट्रपती भवनाकडून देण्यात आली आहे. यावेळी मोदींच्या मंत्रिमंडळातील सदस्यांनादेखील शपथ दिली जाईल. मोदींच्या मंत्रिमंडळातील सदस्यांची नावं अद्याप जाहीर झालेली नाहीत. याबद्दल सध्या जोरदार चर्चा सुरू आहेत. भाजपाला सलग दुसऱ्यांदा स्पष्ट बहुमत मिळाल्यानं मित्रपक्षांना किती मंत्रिपदं दिली जाणार, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे. 

गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला 282 जागा मिळाल्या होत्या. तर एनडीएला एकूण 336 जागा मिळाल्या होत्या. यंदा भाजपा आणि एनडीएला मिळालेल्या जागांमध्ये वाढ झाली. भाजपाच्या 21, तर एनडीएच्या 17 जागा वाढल्या आहेत. एनडीएच्या बैठकीत मोदींची एकमतानं निवड झाल्यानंतर त्यांनी सर्व खासदारांना संबोधित केलं. कोणताही दुजाभाव न करता काम करण्याचा सल्ला त्यांनी खासदारांना दिला. अल्पसंख्याकांचा विश्वास जिंकण्यास प्राधान्य द्या, असं आवाहनदेखील त्यांनी केलं.

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालNarendra Modiनरेंद्र मोदीvaranasi-pcवाराणसी