शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics : 'अमित शहांना पवार, ठाकरेंना राजकीयदृष्ट्या संपवण्याचे डोहाळे लागलेत'; ठाकरे गटाचा सामनातून हल्लाबोल
2
सदोष वेल्डिंग, कमकुवत ढाचामुळे कोसळला पुतळा; चौकशी समितीच्या अहवालात निष्कर्ष
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरी करणार्‍यांना लाभाच्या संधी मिळतील; नशिबाची साथ लाभेल
4
पोर्न स्टार रिया बर्डे निघाली बांगलादेशी, बनावट कागदपत्रांसह भारतात राहिल्या प्रकरणी केली अटक
5
विधानसभा निवडणुकीचे वेध; आयोगाची आज पक्षांशी चर्चा, मुख्य सचिव, वरिष्ठ अधिकारी यांची बैठकही घेणार
6
शेतमजूर, कामगारांच्या किमान वेतनात वाढ; केंद्र सरकारचा निर्णय
7
अग्रलेख : विकास किती पाण्यात?; ‘स्मार्ट सिटी’ बनणाऱ्या शहरांना किंचितही अधिकसा पाऊस सोसवेनासा
8
बिल्किस बानो प्रकरणी फेरआढाव्याची गरज नाही; सुप्रीम काेर्टाने फेटाळली गुजरात सरकारची याचिका
9
मेडिकलच्या तीन मुलींनी घेतली सहा जणांची रॅगिंग; मुली एमडी अभ्यासक्रमाच्या
10
लोकमतच्या व्यासपीठावर सर्वपक्षीय नेत्यांची जुगलबंदी; विधानसभेनंतर आणखी पक्ष आमच्याकडे येतील : मुनगंटीवार
11
ड्युटीवरून गायब झालेले १२ पोलिस निलंबित; आरबीआयच्या संरक्षणाची होती जबाबदारी
12
मेट्रोच्या भुयारी मार्गाचे लोकार्पण नरेंद्र मोदींच्या हस्ते ऑनलाईन होणार, नवीन तारीख घोषित
13
कॅन्सरवरील उपचार सुसह्य होण्यासाठी आता ‘डॉग थेरपी’; टाटा रुग्णालयात मुलांसाठी अनोखा उपक्रम
14
शेतकरी नेते रविकांत तुपकरांना पोलिसांकडून अटक, आंदोलन सुरू असतानाच कारवाई
15
हिजबुल्लाहला आणखी एक धक्का, हवाई हल्ल्यात ड्रोन कमांडर ठार, इस्रायलचा दावा
16
शासकीय रुग्णालयांत हृदयविकारांवर अत्याधुनिक उपचार; जे.जे. मध्येही आता ईपी लॅब, ३९ कोटी मंजूर
17
नऊ प्रकल्पांच्या निधीची चिंता मिटली; एमएमआरडीएला ‘पीएफसी’कडून ३१,६७३ कोटींचे कर्ज मंजूर
18
नवी मुंबई विमानतळ सुखोईच्या लँडिंगसाठी सज्ज; सिडकोचे विजय सिंघल यांची माहिती
19
‘काैटुंबिक हिंसाचार कायदा सर्व धर्मांतील महिलांना लागू’
20
मधुमेह, जीवनसत्त्वे, रक्तदाबावरील गोळ्यांसह ५३ औषधे ठरली निकृष्ट दर्जाची

बाबो! 3 मुलांच्या आईने प्रियकरासोबत घेतल्या सप्तपदी; 3 महिन्यांपूर्वीच पतीचा झाला मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: March 07, 2023 11:23 AM

तीन मुलांच्या आईने आता प्रेमविवाह केला आहे. एक महिन्यापूर्वी ओळख झाली आणि मग लग्न करण्याचा निर्णय घेतला.

पहिल्या पतीच्या निधनानंतर तीन मुलांच्या आईने आता प्रेमविवाह केला आहे. एक महिन्यापूर्वी ओळख झाली आणि मग त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. रविवारी छतरपूर येथे पालिकेने मुख्यमंत्री कन्यादान योजनेंतर्गत आयोजित सामूहिक विवाह परिषदेत या दोघांनी लग्न केलं. लग्नात मुलाच्या बाजूने संपूर्ण कुटुंब उपस्थित होते, परंतु वधूच्या बाजूने फक्त तिची तीन मुले उपस्थित होती. पानगर गावात राहणाऱ्या सुशीला कुशवाहाचा विवाह सर्वात अनोखा होता.

मिळालेल्या माहितीनुसार, लखनगुवां येथील रहिवासी अज्जू कुशवाहासोबत सुशीलाने सप्तपदी घेतल्या. सुशीलाने सांगितले की, तिच्या पतीने काही महिन्यांपूर्वी विष घेतले होते. अचानक पतीची तब्येत बिघडली आणि त्याचा मृत्यू झाला. कौटुंबिक वाद आणि कर्जामुळे पतीने हे पाऊल उचलले. त्याने तिला आणि मुलांना एकटे सोडले. कौटुंबिक वाद आणि कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी घेतलेले कर्ज हे पतीच्या मृत्यूचे कारण ठरले. 

तीन महिन्यांपूर्वी पतीने विष घेतले. त्याची प्रकृती खालावल्याने त्याला रुग्णालयात नेण्यात आले. त्याला वाचवता आले नाही. पतीच्या निधनानंतर एकाकी पडले आणि तीन मुलांची जबाबदारीही माझ्यावर आली असं महिलेने म्हटलं आहे. महिनाभरापूर्वी गावापासून आठ किलोमीटर अंतरावर राहणाऱ्या अज्जू कुशवाह ओळख झाली. दोघेही एकाच समाजाचे आहेत. पुढे ओळखीचं रुपांतर प्रेमात झालं. 

अज्जूचे लग्न झाले नव्हते. महिलेने तिची व्यथा सांगितली तर तो शांतपणे ऐकत असे. तो समस्येतून मार्ग काढण्याचा प्रयत्न करायचा. अज्जूने लग्नाची इच्छा व्यक्त केल्यावर क्षणाचाही विलंब न लावता महिलेने होकार दिला. अज्जूने मुलांना त्याचे नाव देण्यास होकार दिला. कुटुंबीयांना हे लग्न मान्य नव्हतं. पण दोघं लग्न करण्यावर ठाम होते. त्यांनी अखेर लग्न केलं. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :marriageलग्न