शहरं
Join us  
Trending Stories
1
काश्मिरात अतिरेकी हल्ला, २८ ठार; 'टार्गेट किलिंग'मध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचाही समावेश
2
रुपचंदानी कुटुंबीय पहलगाममध्ये सुखरूप; काळजीनं नातेवाईकांचा जीव लागला होता टांगणीला
3
'यूपीएससी'त पुण्याचा अर्चित डोंगरे तिसरा; राज्यातील ९५ विद्यार्थ्यांनी घातली यशाला गवसणी
4
पोप फ्रान्सिस यांच्या निधनामुळे कर्मयोगी जवाहरलाल दर्डा यांच्या पुतळ्याचे अनावरण स्थगित
5
KL राहुलचं एकदम कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
6
मत्स्य व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा, मंत्रिमंडळाचा निर्णय; मच्छीमारांना ६ हजाराचा लाभ मिळणार
7
भिसेंवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची होणार चौकशी; महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचा निर्णय
8
एक मंदिर, एक विहीर, एक स्मशान...डॉ. भागवतांच्या संप्रदायाला ही एकता समजली तरी खूप बरे होईल
9
गुलफिशा फातिमाने तुरुंगात खितपत का पडावे?; २ वर्ष उलटली तरी जामीन नाही  
10
महानगरांमध्ये अघोषित पाणीबाणी लागू; तहान भागत नाही?, निमूट पैसे मोजा, टँकर मागवा!
11
अवघ्या ७७ चौरस फुटाच्या घरात राहते युवती; इवल्याशा खोलीनं संपवला जीवनातील संघर्ष
12
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
13
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
14
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
16
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
17
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
18
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
19
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
20
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल

"मला आनंद आहे की अमित शाहांनी..."; गृहमंत्र्यांनी निर्णय घेतल्यानंतर प्रियांका गांधींचं खास ट्विट

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2024 01:14 IST

काँग्रेसच्या खासदार प्रियांका गांधी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी घेतलेल्या निर्णयाबद्दल आनंद व्यक्त केला. 

केरळमधील वायनाड लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रियांका गांधी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी घेतलेल्या एका निर्णयाबद्दल आनंद व्यक्त केला. केंद्रीय गृह मंत्रालयाने वायनाडसंदर्भात एक निर्णय घेतला. वायनाडमध्ये भूस्खलन होऊन प्रचंड नुकसान झालं. जीवित हानीबरोबर मोठे आर्थिक नुकसान झाले. ही घटना नैसर्गिक आपत्ती म्हणून घोषित करण्यात आली. याबद्दलच प्रियांका गांधींनी पोस्ट केली. एक मागणीही त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे केली आहे. 

काँग्रेसच्या खासदार प्रियांका गांधी यांनी केंद्रीय गृह मंत्रालयाच्या निर्णयाचे स्वागत करत आनंद व्यक्त केला. सोशल मीडियावर प्रियांका गांधी यांनी एक पोस्ट केली. 

"मला आनंद होतोय की, गृहमंत्री अमित शाह यांनी वायनाडमधील दुर्घटनेला गंभीर नैसर्गिक आपत्ती म्हणून घोषित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पुनर्वसनाची गरज असलेल्या लोकांना बरीच मदत मिळेल आणि निश्चितपणे हे एक योग्य दिशेने उचलण्यात आलेले पाऊल आहे", असे प्रियांका गांधी यांनी म्हटले आहे. 

याचबरोबर प्रियांका गांधी यांनी एक मागणीही केली आहे. "यासाठी जर पुरेसा निधीही लवकरात लवकर उपलब्ध करून दिला, तर आम्ही सगळे आभारी असू", असेही त्यांनी म्हटले आहे. 

डिसेंबर महिन्याच्या सुरूवातीलाच खासदार प्रियांका गांधी यांच्या नेतृत्वाखाली केरळमधील खासदारांच्या एका शिष्टमंडळाने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. भूस्खलनाचा फटका बसलेल्या लोकांना केंद्र सरकारने मदत करण्याची मागणी केली होती. राजकारण बाजूला ठेवून मदत करण्यात यावी, अशी मागणी या शिष्टमंडळाने केली होती. 

२९ जुलै २०२४ रोजी निसर्गाचा प्रकोप वायनाडमध्ये बघायला मिळाला होता. वायनाडमध्ये भूस्खलन होऊन प्रचंड नुकसान झाले होते. मुंडक्कई, चूरलमाला, अट्टामाला आणि नूलपुजा ही चार गावे पूर्णपणे उद्ध्वस्त झाली होती. 

टॅग्स :Priyanka Gandhiप्रियंका गांधीAmit Shahअमित शाहcongressकाँग्रेसHome Ministryगृह मंत्रालय