शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीला मिळाली तिसरी महिला मुख्यमंत्री! आतिशी यांच्यासह आणखी ५ मंत्र्यांनी घेतली शपथ
2
"म्यानमारमधून ९०० कुकी अतिरेकी मणिपूरमध्ये घुसले", सुरक्षा सल्लागारांनी दिला दुजोरा, चिंता वाढली
3
“ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री हे सूत्र मविआत नाही”; संजय राऊत स्पष्टच बोलले
4
हवाई दल प्रमुखपदी एअर मार्शल अमरप्रीत सिंग यांची नियुक्ती; जाणून घ्या, त्यांच्याविषयी...
5
"या तीन घराण्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशत पसरवली" अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल
6
भारतात WANTED असलेला फरार इस्लामिक धर्मगुरू झाकिर नाईक पाकिस्तानात 'पाहुणा'
7
IND vs BAN, 1st Test Day 3 Stumps : वेळेआधी थांबला खेळ; ढगाळ वातावरणातही चित्र एकदम स्पष्ट
8
तिरुमला तिरुपती लाडू वाद: प्रकाश राज यांचा DCM पवन कल्याण यांना मोलाचा सल्ला; म्हणाले...
9
बाबो! इन्स्टावर सूत जुळलं, एकमेकांवर प्रेम जडलं; पंक्चरवाल्यासाठी नवऱ्याला सोडलं अन्...
10
लेडीज टॉयलेटमध्ये कॅमेरा लावला; मुलीने रंगेहाथ पकडला, विद्यार्थ्याला अटक, अनेक व्हिडीओ सापडले
11
ऐश्वर्या-करीश्मादेखील वाचवू शकले नाहीत सुपरस्टारच्या मुलाचं करिअर, आता इंडस्ट्रीतून आहे गायब
12
मोठी बातमी: विधानसभेसाठी वंचितचा धमाका; ११ उमेदवारांची पहिली यादी जाहीर
13
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; विहिरी, शेततळे, वीज जोडणीसाठीच्या अनुदानात वाढ
14
TV वर खूप नाव कमावलं पण मोठ्या पडद्यावर चालली नाही जादू; प्रसिद्ध अभिनेत्याला ओळखलं का?
15
IND vs BAN : डोळ्याची पापणी लवण्याच्या आत खेळ खल्लास! यशस्वीनं घेतलेला भन्नाट कॅच बघाच (VIDEO)
16
"काशीचा प्रसाद मिळाला, तेव्हा माझ्या मनात तिरुपतीचा विचार आला", लाडू वादावर माजी राष्ट्रपतींनी व्यक्त केली चिंता
17
IND vs BAN : Rishabh Pant चे झंझावाती शतक! गर्लफ्रेंड ईशाने मानले आभार, म्हणाली...
18
काय सांगता! ६०० ब्राह्मण करतात तिरुपतीचा प्रसाद; १ लाख लाडू रामलला चरणी केले होते अर्पण
19
LLC 2024 : इरफान पठाणची जादू अन् विजयी सलामी; जुन्या आठवणींना उजाळा, भज्जीचा संघ हरला
20
BSNL नं जिओ, एअरटेल, Vi ला दिला 'जोर का झटका'; एकाच महिन्यात वाढले लाखो ग्राहक

'IB चा रिपोर्ट आला तेव्हा तुम्ही झोपला होता का? तुम्ही हिंसाचार थांबवायला हवा होता', असदुद्दीन ओवेसींचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2022 6:46 PM

Gujarat Ram Navami Violence: गेल्या 20-25 वर्षांच्या चौकशी आयोगाचा अहवाल सांगतो की, राज्य सरकारांची इच्छा नसेल तर हिंसाचार पसरत नाही, असे भाष्य गुजरातमध्ये रामनवमीच्या मिरवणुकीत झालेल्या हिंसाचारावर असदुद्दीन ओवेसी यांनी केले. 

नवी दिल्ली : हिंसाचार होत असेल तर तो कोणासाठीही योग्य नाही. हिंसाचार झाला तर त्याची जबाबदारी राज्य सरकारवर आहे. गेल्या 20-25 वर्षांच्या चौकशी आयोगाचा अहवाल सांगतो की, राज्य सरकारांची इच्छा नसेल तर हिंसाचार पसरत नाही, असे भाष्य गुजरातमध्ये रामनवमीच्या मिरवणुकीत झालेल्या हिंसाचारावर असदुद्दीन ओवेसी यांनी केले. 

हिंसाचार ही राज्य सरकारची जबाबदारी आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यात राज्य सरकार अपयशी ठरले आहे, असे असदुद्दीन ओवेसी यांनी म्हटले आहे. आरोपींना अटक करून योग्य तपास करून कारवाई व्हावी, अशी आमची इच्छा आहे. तुमच्याकडे आयबी रिपोर्ट होता तर तुम्ही का झोपले होते? तुम्ही त्याचा पर्दाफाश करायला हवा होता, तिथे पोलिस बंदोबस्त तैनात करून हिंसाचार थांबवायला हवा होता. तुमची गुंतागुंतीची वागणूक लपविण्यासाठी तुम्ही संध्याकाळी कथा आणता. अशा कथा आता जुन्या झाल्या आहेत, असेही म्हणत असदुद्दीन ओवेसी यांनी गुजरात राज्य सरकारवर हल्लाबोल केला. 

याचबरोबर, किती दिवस तुम्ही जुन्या गोष्टी समोर आणत राहणार? आपले अपयश स्वीकारा. तुम्ही स्वतः सहभागी आहात. भजने वाजवली पाहिजेत, पण कसल्या घोषणा दिल्या? 50-100 तलवारी फिरवण्यात आल्या. पोलिसांच्या उपस्थितीत हे करण्यात आले. सरकारला हिंसाचार हवा होता आणि त्यात मिलीभगत आहे, असा आरोपही असदुद्दीन ओवेसी यांनी केला आहे. 

हिंसाचारात 11 जणांचा सहभाग रविवारी रामनवमीच्या दिवशी उसळलेल्या हिंसाचार आणि जाळपोळीबाबत गुजरात पोलिसांनी बुधवारी मोठा खुलासा केला आहे. हा हिंसाचार पूर्वनियोजित असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. खंभातमध्ये झालेल्या हिंसाचारात स्लीपर मॉड्यूलखाली कट रचण्यात आला होता. दरम्यान, या हिंसाचारात 11 जणांचा सहभाग आहे. आरोपी परदेशात बसलेल्या लोकांच्या संपर्कात होते. आरोपींनी 3 दिवस बैठक घेऊन कट रचला होता. रझाक नावाच्या मौलवीने या हिंसाचाराची योजना आखली होती. 11 गुन्हेगारांची चौकशी सुरू आहे, असे एसपी अजित राजियन यांनी सांगितले. 

टॅग्स :Asaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीGujaratगुजरात