शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

मला इंडिया आघाडी हे नाव द्यायचे नव्हते, दुसरे देणार होतो; नितीशकुमारांचा बाहेर पडताच मोठा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2024 13:41 IST

पलटीबाज मुख्यमंत्री म्हणून नितीशकुमारांना बिहारच्या राजकारणात ओळखले जात आहे. अशातच इंडिया आघाडीवर विचारले असता नितीश यांनी आम्ही तर नावही दिले नव्हते, आता इंडिया आघाडीच संपली आहे, असे म्हटले आहे. 

बिहारमध्ये राजकीय उलथापालथीनंतर लालू प्रसाद यादवांनी मुख्यमंत्री नितीश कुमारांना पुन्हा मैत्रीची ऑफर दिली आहे. यावर नितीश कुमारांनी त्यांची बाजू स्पष्ट केली आहे. पलटीबाज मुख्यमंत्री म्हणून नितीशकुमारांना बिहारच्या राजकारणात ओळखले जात आहे. अशातच इंडिया आघाडीवर विचारले असता नितीश यांनी आम्ही तर नावही दिले नव्हते, आता इंडिया आघाडीच संपली आहे, असे म्हटले आहे. 

लालू यांच्या ऑफरवर नितीश यांनी म्हटले की, कोण काय बोलतो त्याच्या भानगडीत पडू नका. आम्ही आता एकत्र आलो आहोत, जसे पहिले होतो. जो घोटाळा झालाय त्याची चौकशी होईल. गोष्टी ठीक सुरु नव्हत्या. यामुळे मी राजदला सोडले, असे नितीशकुमार म्हणाले.

लालू प्रसादांना नमस्कार केल्यावरून ते म्हणाले की, आता मला असे कोणी भेटले, मग तो माझ्या विरोधात असो वा विरोधी पक्षात, आम्ही नमस्कार करतो. बरोबर? ही माझी सवय आहे. आम्ही इथे होतो तेव्हा लालू समोरून येत होते, म्हणून नमस्कार केला, असा खुलासा नितीश कुमार यांनी केला.

इंडिया आघाडीबद्दल विचारले असता, मी खूप प्रयत्न केला होता. मी हे नावही दिले नव्हते, मला दुसरे नाव द्यायचे होते. त्या लोकांनीच इंडिया आघाडी हे नाव दिले. हे लोक सुरुवातीला नाराज होत होते म्हणून मी म्हटले की सोडून द्या तुम्हाला जे नाव द्यायचे ते द्या. मी जेव्हा वेगळा झालो तेव्हाच मी सगळे सांगितले होते. बिहारच्या हिताचे काम करणे हे माझे काम आहे, असे नितीशकुमार म्हणाले.  

टॅग्स :Nitish Kumarनितीश कुमारINDIA Opposition Allianceइंडिया आघाडीBiharबिहारLalu Prasad Yadavलालूप्रसाद यादव