शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

CoronaVirus News: आजच्या घडीला मुंबईत यायची माझी हिंमत नाही, पण...; नितीन गडकरींची 'मन की बात'

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2020 14:35 IST

कोरोनाच्या संकटात बाजारात तरलता वाढवणे आवश्यक आहे. त्याशिवाय आपण पुन्हा अर्थव्यवस्थेला गती देऊ शकत नाही.

नवी दिल्लीः सध्याच्या परिस्थितीत मुंबईत येण्याचे धाडस नाही, पण ही परिस्थिती नक्कीच बदलेल, असं केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी म्हणाले आहेत. कोरोनाच्या संकटात देशात लॉकडाऊन असल्यानं उद्योगधंद्यांवर त्याचा परिमाण होत आहे. त्यावर नितीन गडकरी यांनी भाष्य केलं आहे. बँकांशी संबंधित प्रश्न, मागणी आणि पुरवठ्यासह तरलतेच्या समस्या आहेत हे मी स्वीकार करतो. सध्याच्या आर्थिक परिस्थितीत सर्वात महत्त्वाची समस्या तरलता आहे. कोरोनाच्या संकटात बाजारात तरलता वाढवणे आवश्यक आहे. त्याशिवाय आपण पुन्हा अर्थव्यवस्थेला गती देऊ शकत नाही.बाजारात तरलता वाढवणे आणि सार्वजनिक-खासगी भागीदारीतून एमएसएमई, पायाभूत सुविधा, रस्ते क्षेत्र, जहाज वाहतूक, बंदर इत्यादी क्षेत्रात परकीय गुंतवणूक आणण्यास आमचं प्राधान्य राहील. मार्चअखेरपर्यंत ग्रामीण भागातील उलाढाल 88,000 कोटी रुपये आहे. ती उलाढाल दोन वर्षांत ५ लाख कोटी रुपये करण्याचे आमचे लक्ष्य आहे. आमची प्राथमिकता कृषी, ग्रामीण आणि आदिवासी भागात रोजगाराची क्षमता निर्माण करण्यावर राहणार असल्याचंही नितीन गडकरींनी स्पष्ट केलं आहे.तत्पूर्वी कोरोनाच्या काळात अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी आवश्यक असलेल्या आर्थिक सुधारणा करण्यास केंद्र सरकारची भूमिका अत्यंत सकारात्मक आहे. आर्थिक सुधारणांच्या दृष्टीने सरकारने अनेक चांगले निर्णय घेतले असून त्याचे परिणाम लवकरच दिसतील, असा विश्वास केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक तसेच सूक्ष्म-लघु-मध्यम उद्योगमंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला होता.‘इंडियन बिझिनेस अँड प्रोफेशनल कौन्सिल’च्या पदाधिकाऱ्यांशी गडकरी यांनी रविवारी ‘व्हिडिओ कॉन्फरन्स’च्या माध्यमातून संवाद साधला होता. त्यावेळी ते बोलले होते. कोरोनाचे संकट हे तात्पुरते संकट आहे हे सर्वांनी लक्षात ठेवून निराशेतून बाहेर पडले पाहिजे, असेही गडकरी यांनी सांगितले. देशात आज सूक्ष्म-लघु-मध्यम उद्योगांचे महत्त्व वाढले आहे. उच्च आणि अद्ययावत तंत्रज्ञान, कौशल्य असलेले मनुष्यबळ आपल्याकडे उपलब्ध आहे. याचा उपयोग करून निर्यातवाढीवर भर दिला पाहिजे, असे ते म्हणाले होते.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीcorona virusकोरोना वायरस बातम्या